हे नववर्ष एक मनमौजी प्रसन्नपणा घेऊन आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्यातही वास करो! और क्या?  
संकीर्ण - ललित
रेखा शहाणे
  • लेखातील सर्व छायाचित्रं - रेखा शहाणे
  • Sat , 01 January 2022
  • संकीर्ण ललित मनमौजी Manmauji प्रजापती Prajapati फुलपाखरू Butterfly साईक वांडरिंग स्नोफ्लेक Wandering Snowflake Leptosia nina

नवीन वर्षातली ही नवीनवी सकाळ. समोर उन्हात न्हालेलं शुभ्र धवल फुलपाखरू भिरभिरतंय. कोवळ्या हलक्या सोनसळी किरणांमध्ये उजळलाय, याचा मोहक, स्वच्छ पांढरा शुभ्र रंग. एक नेत्रसुखद भिरभिर मी न्याहाळतेय. आहा!

नुक्त्यानुक्त्या जन्मलेल्या तान्ह्या वर्षाची सुरुवात तर अगदी ‘मन करा रे प्रसन्न’ म्हणत झालीय. समोर ही चार-पाच उडती फुलपाखरं म्हणजे जणू ऊनकोवळं, शुभ्र सतेज, लोभस चैतन्यच समोर नाचतंय.

असं वाटेपर्यंत गोळा झालेल्या माहितीनं लगेच सूचित केलं- ‘रेखाबाई, माहिती आहे ना, शुभ्र फुलपाखरू देवदूताचा सांगावा घेऊन आलेलं असतं.’

‘कोणता?’

‘ते सांगत असतं की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.’

बरं, असू देत बाबा. सगळेच सन्मार्गावर असू देत एकदाचे.

तर हे साईक. याचं शास्त्रीय नाव आहे लेप्टोसिया निना. (Psyche : Leptosia nina, Family : Pieridae) मराठीतलं याचं नाव फार गोड आहे- मनमौजी!

पायरीडी कुळातलं हे फुलपाखरू भारतीय उपखंड, दक्षिणपूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्येही आढळतं.

याचा शुभ्र पांढरा रंग नजरेला सुखावणारा आहे. पण ऐकलंय की, उन्हाबरोबर हा रंग जसा लख्ख उजळून निघतो, ते पाहून याला ‘वांडरिंग स्नोफ्लेक’ असंही नाव दिलं होतं कधी कुणी. वापरात नाहीये ते, पण मला मात्र आवडतं!

हे तसं चिमुकलंसं फुलपाखरू आहे. याचा पंख विस्तार ३५ ते ५० मिमी आहे. याच्या पुढल्या शुभ्र पंखांवरचा मोठ्ठा गोलाकार काळा ठिपका वेधक आहे आणि पंखांची खालची बाजूसुद्धा तशीच शुभ्र असते. पण नीट निरखून पाहिलं तर त्यावर हलकी हिरवट छटा असलेली, दिसेल न दिसेल अशी, पण नक्षीही असते.

ही तीन-चार फुलपाखरं उडतायत इथं आणि आमचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड आयझॅक केहीमकर यांनी कधी उल्लेख केलेली एक छोटीशीच गोष्ट उगाउगा मनावर तरळतेय. ती गोष्ट याच्या वैशिष्टपूर्ण उडण्याच्या लकबीशी जोडलेली आहे, म्हणून सहज उल्लेख करतेय इतकंच. तशा तर गोष्टी फार गोड असतात. पौराणिक असतात. साधारण ढाचा बहुदा तोच राहिला तर राहतो, पण अनेक बदल संभवतात.

तर मी वाचते नि सोडून देते. पण सहज आठवतात मात्र.

आणि उल्लेख केलेली गोष्ट आत्ता मला आठवतंय ती अशी की, साइकी किंवा साईक ही कथेतील परी आहे. तिचा प्रियकर जंगलात हरवलेला आहे. ती त्याच्या शोधात सैरभैर झालेली आहे. आणि शोधतेय त्याला. या फुलपाखराचं नाव आहे- साईक. याचं उडणं म्हणजे जणू सततची एक अस्वस्थ भिरभिरच.

तर तसंही हे ‘मनमौजी’ एकाजागी बसणं अवघडच. आधीच शुभ्रसफेद. त्यात अस्थिर. चांगलं छायाचित्र अभावानेच टिपता येतं. फुलाफुलांतला मध याला अतिशय प्रिय आहे. मग इकडून तिकडे, तिकडून इकडे, जमिनीलगत, कधी गवत तुऱ्यावर, तर कधी इवल्याइवल्या रंगीबेरंगी रानफुलांवर भिरभिरत असतं. पण जरा चाहूल लागली की, ते लग्गेच त्या ठिकाणापासून दूर उडून जातं. याचा आढळ बाराही महिने असला तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात दिसतं.

आमच्या सोसायटीचं आवार हे त्याचं वस्तीस्थानच आहे. आमच्या इथल्या निळ्या तीळवणीवर अंडी घालताना मी याला दोनदा कॅमेऱ्यात टिपलंय. थोडी सावली असलेल्या जागी मादी वाघाटी वर्गीय वनस्पतींवर अंडी घालते. अंड्याचा रंग छानसा निळसर हिरवा असतो. एकेक सुटं सुटं अंडं कोवळ्या पानांवर घातलेलं असतं.

अळी गडद हिरव्या रंगाची आणि कोष मातकट तपकिरी अथवा हिरवाही असतो. आणि जमिनीलगत इवल्याशा फांद्यांवर लटकलेला असतो. या कोषातून दहा-बारा दिवसांत पूर्ण वाढ झालेलं शुभ्र फुलपाखरू बाहेर पडतं. ते पाहणं हा एक मनभावन क्षण असतो. त्याची पहिली गिरकी पाहणं म्हणजेही निरागस, निखळ आनंदाचाच अनुभव!

ग्रीक, रोमन पौराणिक कथेमध्ये फुलपाखराला ‘अमर्त्य आत्म्याचं प्रतीक’ मानलंय. बंगालमध्ये तर फुलपाखराला ‘प्रजापती’च म्हणतात! त्याचा संबंध प्रजानानाशी जोडलेला आहे. आपण लग्नपत्रिकेत जसं ‘श्री गजानन प्रसन्न लिहितो, ते स्थान बंगालमध्ये फुलपाखराचं आहे.

अशा किती तरी गोष्टी या इवल्याशा फुलपाखरामुळे, त्याच्या नावा-रंगामुळे, मनमौजीपणामुळे मनात आल्या. सकाळची सुरुवातही सुरेख झालीय.

हे नववर्षही एक मनमौजी प्रसन्नपणा घेऊन आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्यातही वास करो.

और क्या?  

..................................................................................................................................................................

लेखिका रेखा शहाणे या कवयित्री व पर्यावरण अभ्यासक आहेत.

rekhashahane@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......