टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार
  • Mon , 20 February 2017
  • विनोदनामा टपल्या शरद पवार Sharad Pawar देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis नितीन गडकरी Nitin Gadkari हाफिज सईद Hafiz Saeed पाकिस्तान Pakistan अफगाणिस्तान Afghanistan

१. पाकिस्तानमध्ये सुफी दर्ग्यावर झालेल्या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना टिपण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून तेथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानच्या दूतांना बोलावून ७६ दहशतवाद्यांची यादी सोपवली होती. लाल शहबाज कलंदर दर्ग्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ८८जणांचा बळी गेल्यानंतर पाकिस्तानने हे धाडसी पाऊल उचललं.

पक्का कॉपीकॅट आहे पाकिस्तान. भारताची नक्कल करण्यासाठी तो चक्क आपणच पोसालेल्या दहशतवाद्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल मारू शकतो, पाहा. अफगाणिस्तान मात्र फारच बिच्चारा आहे. आपल्याकडच्या दहशतवादाला प्रोत्साहन आणि आश्रय देणाऱ्या पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची ताकदच नाही त्याच्याकडे; मग आपला सत्यानाश करणाऱ्या रशिया आणि अमेरिका या देशांचा समाचार घेणं तर दूरच राहिलं.

…………………………….

२. नागपूर शहराचा विकास होत आहे. मोठे उद्योग येत असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. काँग्रेसने गेल्या ४० वर्षांत उद्योग उभारले नाहीत आणि रोजगार निर्माण करून दिले नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा राहुल गांधी जरी आमच्याकडे आले तरी त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ. : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ज्या 'मिहान'ने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या आधारावर गडकरी हे बोलत होते, त्या मिहानच्या संकल्पनेपासून, स्थापनेपर्यंत आणि विस्तारापर्यंतच्या गेल्या १५ वर्षांच्या काळात पहिली १३ वर्षं तर राज्यात आघाडीचं सरकार होतं आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. वयोमानपरत्वे विस्मरण होतंय की, निव्वळ व्यवसायाचा भाग म्हणून अंगीकारलेली कृतघ्नता?

…………………………….

३. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे, त्या लोकांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्या शब्दाला जागण्याची भारतीय जनता पक्षाची परंपरा लक्षात घेऊन मुख्यमंत्री खरोखरच तलवार घेऊन येतील, या भयाने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांच्या सभेकडे लोकांबरोबरच पक्षाच्या उमेदवारांनीही पाठ फिरवली बहुतेक. त्यामुळे ती रद्द करण्याची पाळी आली. भाजपामध्ये काहीही रेटून (कंपोझिटर… रे टू न… रेकून नव्हे!) बोलायची पद्धत असते, हे बहुतेक उमेदवारांना माहिती नसावं… आत्ताच आलेत ना राष्ट्रवादीतून ते.

…………………………….

४. राज्य सरकार पडल्यास मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे. त्याची एक प्रत मी राज्यपालांनाही देईन. मग उद्धव ठाकरे यांनीदेखील आमचा राज्य सरकारला पाठिंबा नाही, असे लेखी स्वरूपात राज्यपालांना द्यावे. : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार

उद्धव असं काही करणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरही तसं काही करण्याची वेळ येणार नाही, हे पवारांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ते 'लिखित'मध्ये वचनं द्यायला तयार झाले आहेत. शेवटी अमित शाहच बरोबर ठरणार म्हणायचं तर.

…………………………….

५. पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद याची दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत (एटीए) नोंदणी केली आहे. त्यामुळे तो एक दहशतवादी आहे याची कबुलीच पंजाब सरकारने म्हणजेच पर्यायाने पाकिस्तानने दिली आहे.  हाफिज सईद आणि त्याचा सहयोगी काजी काशिफ यांच्या दोघांची नावे एटीएच्या यादीमध्ये चौथ्या परिशिष्टात टाकण्यात आली आहेत.

या यादीची एक प्रत कृपया माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडे पाठवून द्या. मात्र, सईद दहशतवादी आहे, ही माहिती मुशर्रफ यांच्या कोमल मनावर आघात करणार नाही, अशा पद्धतीने, सौम्यपणेच त्यांना सांगितली जावी. नाहीतर त्यांच्या एकदम धक्का बसायचा आणि डोक्यावर काही परिणाम वगैरे व्हायचा.

…………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......