टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोहन भागवत, उद्धव ठाकरे, अमरसिंग आणि किरेन रिजीजू
  • Tue , 14 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या मोहन भागवत Mohan Bhagwat उद्धव ठाकरे Uddhav Thackeray अमरसिंग Amar Singh किरेन रिजीजू kiren rijiju

१. कोणालाही दुसऱ्या व्यक्तीची देशभक्ती मोजण्याचा अधिकार नाही. मलाही तो अधिकार नाही. कोणी स्वत:ला या देशाचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता समजत असेल, तरी ती व्यक्ती कोणाची देशभक्ती मोजू शकत नाही. : सरसंघचालक मोहन भागवत

कोण तो गाणं म्हणतोय, ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना…’ 'देशाचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता' समजू लागलेला एक स्वयंसेवक सगळ्यांच्या परिचयाचा आहे. गंमत म्हणजे, तोही हेच म्हणतो! म्हणजे मग देशभक्ती मोजणार तरी कोण आणि देशाचा रोजचा कारभार इटालियन  फासिस्टांकडून आयात मापकाने केलेल्या देशभक्तीमापनाविना चालणार तरी कसा?

………………………………….

२. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले की, भाजपचे सरकार सत्तेत आले तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. ही घोषणा तुम्ही महाराष्ट्रात का करत नाही? तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, तर तुम्हाला माझा कायमचा पाठिंबा राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

अरे अरे अरे, आम्ही इकडे मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागलो, मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरू लागले, मुख्यमंत्री तुमच्या बेनामी कंपन्यांच्या याद्या देऊन राहिले आणि तुम्ही लढाईआधीच पांढरं निशाण फडकवून मोकळं झालात? मुख्यमंत्र्यांना काय, नुसती घोषणाच करायची आहे ना? गरज पडली तर करतील घोषणा. शेतकऱ्याला काही दिलं पाहिजे, असा नियम थोडाच आहे?

………………………………….

३. अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव या पितापुत्रांत झालेला वाद ठरवून करण्यात आला होता. अखिलेश यादव यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी केलेला तो केवळ एक राजकीय स्टंट होता. सायकल चिन्ह हे अखिलेशकडेच जावे असे मुलायम यांना वाटत होते. : अमरसिंह

अमरसिंह काका, वयोपरत्वे तुमचा साबण स्लो झालाय का? हे भांडण सुरू झाल्यापासून नेताजी आणि बेटाजी यांच्यातली ही नूरा कुस्ती आहे, हे यूपीतल्याच नव्हे, तर देशभरातल्या चौथीच्या पोरांनाही माहिती होतं. आप लोग अगर अॅक्टर अच्छे है, तो हम भी ऑडियन्स बुरे नहीं है.

………………………………….

४. हिंदू सक्तीने धर्मांतर करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांची लोकसंख्या घटते आहे आणि भारतात अल्पसंख्यांक समुदाय वाढतो आहे.  केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू 

असेही तुम्ही भारताचे मंत्री असण्यापेक्षा 'हिंदुस्थान'चे मंत्री असल्यासारखेच वागता, तर एकदा या धर्मासाठी फतवे काढणाऱ्या सर्व साधू, महंत, संघचालक, आखाडाचालक वगैरेंना बोलवा आणि स्पष्ट काय ते आदेश द्या. एक सांगतो, ब्रह्मचर्य हेच जीवन, दुसरा सांगतो, १० मुलं जन्माला घाला. माणसं कन्फ्यूज होतात ना हो?

………………………………….

५. जगभरात व्हॅलेंटाईन डेनिमित्त बाजारपेठा लाल रंगात रंगल्या असतानाच पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाने प्रेमात भंग आणला आहे. इस्लामाबाद हायकोर्टाने पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे म्हटले आहे.

तरीच एरवी याला पाकिस्तानात पाठवा, त्याला पाकिस्तानात पाठवा म्हणणारे प्रमोद मुतालिक छाप प्रेमद्वेष्टे पाकिस्तानकडे निघालेले आहेत. आता यांना कायमचं तिकडे स्थायिक करून टाका. यांचे धर्मविचार तिकडच्या विचारांशी जुळतात तंतोतंत. धर्म जुळत नाही, तेवढा बदलून घ्या म्हणावं.

………………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......