टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोहन भागवत, उद्धव ठाकरे, अमरसिंग आणि किरेन रिजीजू
  • Tue , 14 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या मोहन भागवत Mohan Bhagwat उद्धव ठाकरे Uddhav Thackeray अमरसिंग Amar Singh किरेन रिजीजू kiren rijiju

१. कोणालाही दुसऱ्या व्यक्तीची देशभक्ती मोजण्याचा अधिकार नाही. मलाही तो अधिकार नाही. कोणी स्वत:ला या देशाचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता समजत असेल, तरी ती व्यक्ती कोणाची देशभक्ती मोजू शकत नाही. : सरसंघचालक मोहन भागवत

कोण तो गाणं म्हणतोय, ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना…’ 'देशाचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता' समजू लागलेला एक स्वयंसेवक सगळ्यांच्या परिचयाचा आहे. गंमत म्हणजे, तोही हेच म्हणतो! म्हणजे मग देशभक्ती मोजणार तरी कोण आणि देशाचा रोजचा कारभार इटालियन  फासिस्टांकडून आयात मापकाने केलेल्या देशभक्तीमापनाविना चालणार तरी कसा?

………………………………….

२. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले की, भाजपचे सरकार सत्तेत आले तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. ही घोषणा तुम्ही महाराष्ट्रात का करत नाही? तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, तर तुम्हाला माझा कायमचा पाठिंबा राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

अरे अरे अरे, आम्ही इकडे मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागलो, मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरू लागले, मुख्यमंत्री तुमच्या बेनामी कंपन्यांच्या याद्या देऊन राहिले आणि तुम्ही लढाईआधीच पांढरं निशाण फडकवून मोकळं झालात? मुख्यमंत्र्यांना काय, नुसती घोषणाच करायची आहे ना? गरज पडली तर करतील घोषणा. शेतकऱ्याला काही दिलं पाहिजे, असा नियम थोडाच आहे?

………………………………….

३. अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव या पितापुत्रांत झालेला वाद ठरवून करण्यात आला होता. अखिलेश यादव यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी केलेला तो केवळ एक राजकीय स्टंट होता. सायकल चिन्ह हे अखिलेशकडेच जावे असे मुलायम यांना वाटत होते. : अमरसिंह

अमरसिंह काका, वयोपरत्वे तुमचा साबण स्लो झालाय का? हे भांडण सुरू झाल्यापासून नेताजी आणि बेटाजी यांच्यातली ही नूरा कुस्ती आहे, हे यूपीतल्याच नव्हे, तर देशभरातल्या चौथीच्या पोरांनाही माहिती होतं. आप लोग अगर अॅक्टर अच्छे है, तो हम भी ऑडियन्स बुरे नहीं है.

………………………………….

४. हिंदू सक्तीने धर्मांतर करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांची लोकसंख्या घटते आहे आणि भारतात अल्पसंख्यांक समुदाय वाढतो आहे.  केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू 

असेही तुम्ही भारताचे मंत्री असण्यापेक्षा 'हिंदुस्थान'चे मंत्री असल्यासारखेच वागता, तर एकदा या धर्मासाठी फतवे काढणाऱ्या सर्व साधू, महंत, संघचालक, आखाडाचालक वगैरेंना बोलवा आणि स्पष्ट काय ते आदेश द्या. एक सांगतो, ब्रह्मचर्य हेच जीवन, दुसरा सांगतो, १० मुलं जन्माला घाला. माणसं कन्फ्यूज होतात ना हो?

………………………………….

५. जगभरात व्हॅलेंटाईन डेनिमित्त बाजारपेठा लाल रंगात रंगल्या असतानाच पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाने प्रेमात भंग आणला आहे. इस्लामाबाद हायकोर्टाने पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे म्हटले आहे.

तरीच एरवी याला पाकिस्तानात पाठवा, त्याला पाकिस्तानात पाठवा म्हणणारे प्रमोद मुतालिक छाप प्रेमद्वेष्टे पाकिस्तानकडे निघालेले आहेत. आता यांना कायमचं तिकडे स्थायिक करून टाका. यांचे धर्मविचार तिकडच्या विचारांशी जुळतात तंतोतंत. धर्म जुळत नाही, तेवढा बदलून घ्या म्हणावं.

………………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......