अजूनकाही
हार्दिक पटेल यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतरचे कवित्व
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मुलाखती-प्रवचनं ऐकून, त्यांच्या पुस्तकांच्या वाचनामुळे माणसाला जटील प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत व्हायची. सुखाचा, आनंदाचा, दुःखाचा अर्थ कळायला लागायचा, माणुसकीची, चांगुलपणाची महत्ता लक्षात यायला मदत व्हायची. इतकंच नाही तर त्या चांगुलपणाचा, माणुसकीचा, सहानुकंपेचा झेंडा खांद्यावर घेणारा नवा माणूस त्यांच्या प्रेरणेमुळे तयार व्हायचा!.......
पत्रकारितेच्या साडेचार दशकांच्या काळात दत्ताभाऊंसारखा सहृदयी राजकारणी अपवादानेच पाहण्यात आला. आणखी एक म्हणजे, पाय जमिनीवर ठेवून लोकांशी वागणं, हाही त्यांचा दुर्मीळ गुण होता. अशी माणसं राजकारणात फार अपवादानं पाहायला मिळतात. दत्ताभाऊ त्यापैकी एक होते. माणसं काळाच्या पडद्याआड जातात... उरतात त्या त्यांच्या आठवणी. दत्ताभाऊ गेले, पण त्यांच्या असंख्य आठवणी माझ्या मनात आहेत.......
भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......
बाबांचा खरा लढा म. फुल्यांच्या स्त्री शूद्रातिशूद्रांसाठी होता. त्यांच्या जीवनात समग्र परिवर्तन घडवण्यासाठी होता. हेच बाबांचे समाजवादी समाजरचनेचे स्वप्न होते. त्या अर्थाने ते समाजवादी होते आणि ते सत्यशोधकही होते. लोकशाही समाजवादाला अभिप्रेत असणारा संघर्ष ते आयुष्यभर करत राहिले. हा संघर्ष करीत असताना कुटुंबाची जबाबदारी शीलाकाकींच्या समर्थ खांद्यांवर सोपवून तुरुंगाच्या वाऱ्या करत राहिले.......
मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा अजित पवार यांनी कधीच लपवून ठेवली नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं संयुक्त सरकार येण्याआधीच त्यांनी त्यांचं स्थान शरद पवार यांच्या खालोखाल आहे, हे स्पष्ट करून टाकलेलं होतं. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर ते स्थान त्यांनी पहिल्या बारा-पंधरा वर्षांत चांगलं बळकट केलेलं होतं. स्वत:चं रांगडं नेतृत्व प्रस्थापित व्हायला मुंबईबाहेरच वाव आहे, हे ते चांगलं जाणून होते.......
या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......
नीट लक्ष दिलं तर, हा माणूस चारचौघात असला तरी आत्ममग्न असतो. त्याचे डोळे काही तरी टिपत आणि कान काही तरी रेकॉर्ड करत असतात, हे लक्षात यायचं. अर्थात आपण बारकाईनं निरीक्षण करतोय, हे लक्षात आलं तर, धनंजयच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच संकोचत असत. धनंजय चिंचोलीकर याच्यासारखी सूक्ष्म निरीक्षण क्षमता असलेला कुणीही लेखक, पत्रकार आजवर माझ्या पाहण्यात आलेला नाहीये.......
सुंस्कारित असल्यामुळे नाना तसे स्वयंभू आणि सार्वभौम होते. आपण जे कार्य करतो ते थेट ईश्वरी कार्य असल्याचा त्यांचा पक्का समज झालेला होता. तसा तो शाखांमधल्या सर्वांचाच असतो. त्यांना आपण कधीही चुकीचे असू, याची अपराधजाणीव होत नसते. परमेश्वर सतत त्यांच्या ‘सोबत’ असतो. मग चुकीचे असे काय घडणार हातून, असा त्यांचा हेका असतो. शंका, संशय, संभ्रम अथवा दुविधा कधीही त्यांच्या वाट्याला येत नसते.......
‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......
परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment