गजानन खातू : मूल्य पेरणारा, विधायक संघर्ष करत रचनात्मक कामांचा डोंगर उभा करणारा माणूस
पडघम - राज्यकारण
राजा कांदळकर
  • गजानन खातू
  • Fri , 25 December 2020
  • पडघम राज्यकारण गजानन खातू Gajanan Khatu महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार अपना बाजारची गोष्ट Apna Bazarchi Gosht

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन खातू यांना नुकताच महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चा समाजकार्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख...

..................................................................................................................................................................

काही माणसं वेगळ्याच गुणांची असतात. त्यांना पदं, खुर्च्या मिळो वा ना मिळो; नाव, मानमरातब प्राप्त होवो, ना होवो ती चारचौघांत उठून दिसतात. समाजवादी विचारवंत गजानन खातू हे अशा वेगळ्या माणसांपैकी एक.

चळवळीतले लोक त्यांना ‘खातूभाई’ म्हणतात. २०१६मध्ये त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त मुंबईत १५ ऑक्टोबर २०१६ रोजी शिवाजी मंदिरात दिमाखदार सोहळा झाला. हा सोहळाही वेगळाच होता. ‘वेध बदलत्या जगाचा’ या विषयावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, अच्युत गोडबोले, मकरंद साठे यांची वेध घेणारी भाषणं झाली. सौमित्र आणि नीरजा यांच्या राजकीय कवितांनी सोहळ्यात रंग भरला. त्यानंतर डॉ. बाबा आढाव, मेधाताई पाटकर आणि पुष्पाताई भावे यांनी खातूभाईंबद्दल मनोगतं व्यक्ती केली. खातूभाईंचा चळवळीतला गोतावळा मोठा आहे. या सोहळ्यात त्याचं प्रतिबिंब दिसत होतं.

प्रा. संजय मंगला गोपाळ, संजीव साने, दत्ता इस्वलकर, प्रमोद निगुडकर, युवराज मोहिते, सुधीर देसाई, जीवराज सावंत, दत्ता बाळसराफ यांचा सोहळ्यात पुढाकार दिसत होता. सोहळ्यात सारं काही शिस्तबद्ध, आखीव-रेखीव होतं. खातूभाईंच्या ७५ वर्षांच्या तरल जीवनासारखं.

मुंबईत ‘अपना बाजार’च्या व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून खातूभाईंची कर्तबगारी समोर आली. गिरणगावात कामगारांच्या वस्तीत ‘अपना बाजार’ची भरभराट झाली. त्याआधी खातूभाई एका बड्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत होते. ते सोडून कमी पगारातली ‘अपना बाजार’ची नोकरी त्यांनी पत्करली. मन रमेल त्या कामात जीव ओतायचा, हा त्यांचा स्वभाव. त्याप्रमाणे त्यांनी ‘अपना बाजार’ वाढवला. फुलवला. नफ्यात आणला. त्याची आर्थिक उलाढाल वाढवली. ग्राहक चळवळीत वेगवेगळे प्रयोग केले. ग्राहकांना स्वस्तात दर्जेदार जीवनावश्यक गरजेच्या वस्तू दिल्या.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

‘अपना बाजार’मध्ये कामगारांच्या सोबतीने कसा चमत्कार घडवला, याविषयी खातूभाईंनी पुस्तक लिहिलंय. हे आहे चरित्रात्मक पुस्तक, पण त्यात खातूभाईंनी स्वतःबद्दल कमी आणि ‘अपना बाजार’च्या सहकारी प्रयोगाविषयी भरभरून लिहिलंय. हे पुस्तक वाचण्यासारखं आहे.

‘अपना बाजार’सारखा महत्त्वाचा ‘न भूतो’ प्रयोग साकार करूनही तो प्रयोग ऐनभरात चांगलं चाललेलं असताना खातूभाईंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. लोक कुजबुजत बोलायला लागले की, काहीतरी गडबड झाली असावी. खातूंचं अपना परिवारात काहीतरी बिघडलं असावं. पण तसं काही नव्हतं. खातूभाईंनी ते पुस्तकात लिहिलंय. ‘अपना बाजार’ सोडताना खातूभाई किती तटस्थ होते. पुष्पाताईंनी सोहळ्यात पुस्तकातल्या शेवटच्या वाक्याचा उल्लेख केला. खातूभाईंचं ते वाक्य असं, ‘अपना बाजारचा राजीनामा दिला. मुक्त झालो. बसस्टॉपवर पुढच्या बसची वाट पाहात थांबलो.’ खातूभाईंचं हे खास वैशिष्ट्य आहे. त्यांचं मन प्रतिष्ठेच्या नोकरीत गुंतलं नाही.

‘अपना बाजारा’तून बाहेर पडल्यानंतर खातूभाईंनी विविध प्रयोग केले. काही फसले, काही फुलले. कोकणात माणगावजवळ वडघर इथं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत खातूभाईंचा मोलाचा वाटा आहे. ५० एकर जमिनीवर हे स्मारक उभं राहिलंय. १५-१६ वर्षे खपून त्यासाठी पैसा जमा करून, कार्यकर्ते जोडून जवळपास पाच कोटी रुपयांच्या उलाढालीतून हे स्मारक उभं राहिलंय. तिथं वर्षभर बाल, किशोर शिबिरं चालतात. कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग होतात. विविध चळवळींच्या बैठका होतात. शाळा-कॉलेजातल्या हजारो मुलांची उपस्थिती या शिबिरात असते. खातूभाई म्हणतात, ‘मुलं इथं यावीत. त्यांनी साने गुरुजींचं नाव  ऐकावं. फोटो बघावा. गुरुजी त्यांच्यात रुजावेत. हे खरं माझं पॉलिटिक्स आहे.’

खातूभाईंशी गप्पा मारणं हा एक भारावलेला अनुभव असतो. त्यांच्या बोलण्यात आर्थिक विचार, चळवळींपुढचे प्रश्न, शहरांचे प्रश्न, खेड्यांचे प्रश्न, परिसर विकासाचे प्रश्न एकमेकांत गुंफत येत जातात. ते बोलत असताना जाणवतं की, बदलणाऱ्या जगाबद्दल या माणसाला खूप कुतूहल आहे. ते समजून घेण्याचा अट्टहास त्यांच्याजवळ आहे. त्यांचे विचार ऐकताना जाणवतं की, हा माणूस ठोकळेबाज नाही. ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करणारा आहे. हे आहे म्हणूनच खातूभाई वेगळे आणि सतत नवनवे वाटत राहतात. त्यांच्या प्रयोगात नावीन्य येत गेलं ते त्यामुळेच.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अच्युत गोडबोले सोहळ्यात बोलताना म्हणाले, “मी तंत्रज्ञान, अर्थकारण या विषयांकडे वेगळ्या दृष्टीने कसं पाहावं हे खातूभाईंकडून शिकलो.” त्यांनी पुढे सांगितलं की, “तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भविष्यात सर्व कामं यंत्रमानव करतील. ड्रायव्हर, शिक्षक, वेटर, रिसेप्शनिस्ट, कामगार, सफाई कर्मचारी यंत्रमानव असतील. त्यामुळे अनेकांचा रोजगार जाईल. पुढे पुढे तर ऑफिस ही संकल्पनाच बाद होईल. सर्व कामं कर्मचारी आपल्या मोबाइलवरून करतील. मोबाईल हेच ऑफिस होईल. ऑफिसला प्रवास करून जाणंयेणं वाचेल. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान पुढारलेलं झाल्याने माणसाचं आयुष्य वाढेल. ते २०० वर्षे सहज होईल. पुढे हजारो वर्षे माणूस जगू शकेल. त्यात अतिशयोक्ती काही नाही.”

प्रकाश आंबेडकर यांनी ‘धर्म आणि जात यामुळे उभे राहिलेले प्रश्न देशाच्या एकतेला मारक कसे आहेत. समाजात एकोपा निर्माण व्हायला, आणि प्रगती करायला अडथळे आहेत. आपण त्याला सामोरं कसं जायचं. त्यावर मात कशी करायची हे शोधून काढू शकलो नाही.’ याबद्दल खंत व्यक्त केली. मकरंद साठे यांनी कला, साहित्य या क्षेत्रात निर्माण झालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि सांस्कृतिक आक्रमणाचे पेच मांडले. तीनही वक्ते खातूभाईंच्या चिंतनाचा विषय असलेल्या विषयांवर बोलले.

बाबा आढावांनी ‘मूल्य पेरणारा माणूस, विधायक संघर्ष करत रचनात्मक कामांचा डोंगर उभा करणारा खातूभाईंचा स्वभाव’ कसा आहे, हे या वेळी सांगितलं. मेधा पाटकरांनी सर्वच चळवळींचे मार्गदर्शक म्हणून खातूभाईंचं अभ्यासू व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवलं.

खातूभाईंनी संस्था उभ्या केल्या, पण त्या ताब्यात ठेवण्यासाठी कधी आटापिटा केला नाही. उलट माणगावच्या साने गुरुजी स्मारकाची घटना त्यांनी अशी बनवली की, कुणीही कायम विश्वस्त वा पदाधिकारी राहणार नाही. खातूभाईंनी स्मारक उभं केलं आणि ते त्यातून बाजूला झाले. सल्लागाराच्या भूमिकेत गेले. या तटस्थपणाबद्दल खातूभाई म्हणतात, “संस्थेची अशी रचना ठेवल्याने घराणेशाहीला जागा नसते. चुकीची माणसं आपोआप बाहेर जातात. भ्रष्ट माणसं संस्थेच्या कामात मारक ठरत नाहीत. सतत नवेनवे लोक येतात. नव्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. संस्थेचे डबके होणे टळते. नवे काही सतत घडत राहते. संस्था नवी, ताजी राहते. तेच आपलं उद्दिष्ट आहे. माणसं येतील जातील, संस्था स्वच्छ आणि गतिमान असल्या पाहिजेत.”

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

खातूभाई म्हणजे काय? तर सतत नवं राहणं, ताजं राहणं. त्यांचे खादीचे झब्बे, त्यांचे रंग न्याहाळले तर आपण काही एक नवं बघतोय हे जाणवतं. आपण एका उत्सवाच्या आसपास फिरतोय आणि या उत्सवाचाच एक भाग बनतो.

खातूभाईंना हे कसं जमत असावं? त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघितलं की, जाणवतं, हा माणूस प्रचंड वाचतो. आवडलेल्या विषयांची वर्तमान पत्रांची कात्रणं दाखवत ते आपल्याशी नव्या नव्या विषयांवर बोलत राहतात. नवी पुस्तकं, नवं काही मांडणारी माणसं याबद्दल ते खूप जागरूक असतात. नवी भेटणारी माणसं, तरुण पोरं, कार्यकर्ते यांच्याशी ते सतत संवाद साधतात. त्यांचं नवं वेगळं काय चाललंय, हे जाणून घेण्याचा खातूभाईंना भारी नाद असावा. नवख्या प्रयोगशील तरुणांचं ते कौतुक करून सतत शाबासकी देताना दिसतात. आणखी त्याला हे करून बघ. यावर लिहिता आलं तर बघ. हे पुस्तक वाच. अशा काही मौलिक सूचना इतक्या सहज करतात की, त्यामुळे खूप मोलाचा ठेवा त्या तरुणाला मिळून जातो.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

खातूभाईंच्या सहवासात राहणाऱ्याला सहज जाणवतं की, हा माणूस जाम आशावादी आहे. व्यक्ती, संस्था, प्रक्रिया याकडे निराशेने, नकारात्मकतेने बघायचं नाही, हा जणू त्यांनी निर्णय घेतलाय की, काय इतके ते स्वगतशील असतात. पण निराशावादी नसणं ही त्यांची स्ट्रॅटेजी नाही. ते जीवनमूल्य म्हणून त्यांनी स्वीकारलंय. राष्ट्र सेवा दलाचं अध्यक्ष होणं टळलं तरी खातूभाई सेवादलाच्या नावानं बोटं मोडताना दिसले नाहीत. आम आदमी पक्षात जाऊन काही वेगळं करता आलं नाही, तरी तो एक वेगळा अनुभव होता, असं या घटनेला ते हसण्यावारी नेऊ शकतात. हा आशावाद खातूभाईंचं जगणं समृद्ध असल्यामुळे आलाय. ते कुटुंबवत्सल आहेत. घरात जसे समरसून जगतात तसेच चळवळीत, शिबिरात वागतात. समृद्ध जगण्यातून भरलेपण येतं. रितेपण जातं. रितेपणा नाही तिथं निराशावाद कसा असेल?

पंचाहत्तरीच्या सोहळ्यात उत्तर देताना खातूभाई म्हणाले, “मी चळवळीत राहिलो म्हणूनच समृद्ध झालो. मोठ्या परिवाराचा घटक होऊन मला विविधांगी जगता आलं.” खातूभाईंचं हे जगणं आणखी समृद्ध होत जावं, अशी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची भावना आहे.

..................................................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर मुक्त पत्रकार आहेत.

rajak2008@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......