इब्राहिम अल्काझी : आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक, नाटकाच्या क्षेत्रातला ‘ऋषी’
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • इब्राहिम अल्काझी (१८ ऑक्टोबर १९२५ - ४ ऑगस्ट २०२०)
  • Thu , 06 August 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली इब्राहिम अल्काझी Ebrahim Alkazi

‘आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक’, केंद्रीय नाट्य विद्यालयाचे पहिले संचालक इब्राहिम अल्काझी यांचं परवा दिल्लीत वयाच्या ९५व्या वर्षी निधन झालं. अल्काझी ४०-५०च्या दशकांत मुंबईतल्या इंग्रजी नाट्यक्षेत्रातली एक दिग्गज हस्ती होते. ‘बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप चे एक प्रवर्तक, ‘थिएटर युनिट बुलेटिन’चे संस्थापक, ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे सलग १५ वर्षं संचालक, ‘आर्ट हेरिटेज गॅलरी’ (दिल्ली)चे सहसंस्थापक, ‘तुघलक’, ‘अंधायुग’, ‘आषाढ का एक दिन’, ‘आधेअधुरे’ अशा अनेक नाटकांचे दिग्दर्शक... पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांचे मानकरी, पहिल्या तन्वीर सन्मानाचे मानकरी... अशी विविधांगी ओळख असलेल्या अल्काझींच्या कारकिर्दीची ही व्हिडिओ झलक...

..................................................................................................................................................................

२०१३मध्ये अल्काझी यांनी ‘उत्तुंग जीवन कला योगदान पुरस्कार’ देण्यात आला. अल्काझींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाहीर सोहळा न होता हा पुरस्कार त्यांना घरगुती कार्यक्रमातच देण्यात आला. त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राचं वाचन...

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

नाट्यदिग्दर्शक आणि एनएसडीच्या माजी चेअरपर्सन (२००४-१२) अमल अल्लाना वडील अल्काझींविषयी...

..................................................................................................................................................................

‘राज्यसभा टीव्ही’वर ‘गुफ्तगू’ नावाचा मान्यवरांच्या मुलाखतीचा एक कार्यक्रम असतो. त्यात झालेली अल्काझी यांची ही मुलाखत. यात त्यांनी आपल्या बालपणापासून ते एनएसडीपर्यंतच्या आठवणी सांगितल्या आहेत.

..................................................................................................................................................................

हेही वाचा :  राममंदिराच्या निर्माणाचं श्रेय इतिहासात कुणाच्या नावावर जमा होईल?

..................................................................................................................................................................

प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शहा एनएसडीमधल्या एका कार्यक्रमात अल्काझींविषयी...

..................................................................................................................................................................

फेब्रुवारी १९९२मधील अल्काझींची एक मुलाखत

..................................................................................................................................................................

पत्रकार करण थापर यांनी अल्काझी यांची बीबीसीसाठी १५ मे २००२ रोजी घेतलेली एक मुलाखत...

..................................................................................................................................................................

हा व्हिडिओ १९८५ सालचा आहे. यात नसरुद्दीन शहा अल्काझी यांच्या कामाबद्दल, त्यांच्या काम करण्याच्या शैलीबद्दल आणि त्याविषयी असलेल्या आक्षेपांबद्दल बोलले आहेत. नाटक हा मुळात लोकशाहीच्या तत्त्वाने चालणारा उपक्रम नसतो आणि अल्काझी हुकूमशाही प्रवृत्तीचे नव्हते, हे सांगताना नसरुद्दीन शहा यांचा आवाज थोडासा चढला आहे. कारण त्यांच्या गुरूविषयी नाहक शेरेबाजी त्यांना सहन झालेली दिसत नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नाटक, चित्रकला या क्षेत्रांतल्या अल्काझींच्या समग्र कारकिर्दीची ओळख करून देणाऱ्या छायाचित्र-प्रदर्शनाचा हा व्हिडिओ

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......