चीनने भारताची खोडी का काढली? भारताचं परराष्ट्र धोरण चुकलं का?
पडघम - देशकारण
परिमल माया सुधाकर
  • परिमल माया सुधाकर
  • Thu , 25 June 2020
  • पडघम देशकारण भारत India चीन China परराष्ट्र धोरण Foreign Affairs परिमल माया सुधाकर Parimal Maya Sudhakar

गेल्या काही दिवसांपासून चीनने भारताच्या गलवान खोऱ्यात केलेल्या घुसखोरीबद्दल देशात जोरदार चर्चा चालू आहे. प्रसारमाध्यमे त्याविषयी बोलताहेत, सर्वसामान्य भारतीयांच्या भावनाही तीव्र झालेल्या आहेत. ‘चायन बॅन’चा नारे दिले जात आहेत. मात्र केंद्र सरकारकडून पुरेसं आणि नेमकं स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही. चीनने भारताचे २० जवान क्रूरपणे मारलेत. काही जवानांना पकडलंही होतं. त्यांची नंतर सुटका करण्यात आली. नेमकी आणि अचूक माहिती ना प्रसारमाध्यमांकडे आणि ना केंद्र सरकारने त्याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. उलट गलवान खोऱ्यात काहीही हालचाली झालेल्या नाहीत, असा खुलासा केल्यामुळे चीनच्या आगळिकीविषयी वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. देशाचे जनमानस नेहमीच परकीय आक्रमणांबाबत आक्रमक असते. पण सीमाप्रश्न वा त्यावरील हालचाली शांतपणे समजून घेणे गरजेचे असते.

या पार्श्वभूमीवर ‘अक्षरनामा’चे लेखक आणि चीनचे एक अभ्यासक परिमल माया सुधाकर यांनी केलेली चर्चा दोन भागात.

..................................................................................................................................................................

पहिला भाग - चीनने भारताची खोडी का काढली? त्यामागे चीनचा नेमका काय हेतू आहे?

दुसरा भाग - भारताचं परराष्ट्र धोरण चुकलं का? त्यामागची नेमकी कारणं काय?

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......