करोनाचा तात्पुरता ‘साईड इफेक्ट’ : पर्यावरणपूरक जीवनशैली
पडघम - विज्ञाननामा
अनुज घाणेकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 16 March 2020
  • पडघम विज्ञाननामा करोना विषाणू करोना व्हायरस Coronavirus

करोना विषाणूच्या संसर्गाचा एक अनपेक्षित ‘साईड इफेक्ट’ जग कदाचित अनुभवू लागलेलं आहे ते म्हणजे जागतिक पर्यावरण बदलास काही प्रमाणात आळा बसत आहे. हा युक्तिवाद वाचून कुणी असं म्हणू शकेल की, इथं लोक मृत्युमुखी पडत आहेत, मानवजातीच्या अस्तित्वावर बेतलं आहे आणि तुम्ही पर्यावरण बदलाचं काय सांगत आहात! अर्थात पर्यावरण बदल रोखण्यासाठी करोनासारखे उपाय समाज म्हणून आपल्याला नक्कीच नको आहेत.

माणसाला नजीकचं संकट नेहमीच जास्त महत्त्वाचं वाटत असतं, पण दूरगामी विचार केला तर करोनाच्या परिणामाची मीमांसा ही मुळात माणसाच्या आरोग्यदायी भविष्याचाच विचार आहे.

बेसुमार औद्योगिकीकरण, शहरांची वाढ, वृक्षतोड आणि आपल्या सगळ्यांची कार्बन उत्सर्जन पुरस्कृत करणारी जीवनशैली, या सगळ्याचा परिपाक म्हणजे पर्यावरण बदल, पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान, नैसर्गिक आपत्तींच्या आणि विविध आजारांच्या प्रमाणात वाढ. करोना विषाणूचा पर्यावरण बदलाशी तसा काही प्रत्यक्ष संबंध नाही, पण त्याच्या फैलावामुळे अप्रत्यक्षपणे पर्यावरण बदलास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक कृती मात्र कमी नकळत कमी होताना दिसत आहेत.

जागतिक पातळीवर कमी कार्बन उत्सर्जन

नासानं फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये जिथं करोना संसर्गाची सुरुवात झाली तेथील काही उपग्रहाद्वारे टिपलेले नकाशे प्रसिद्ध केले. हे नकाशे दर्शवतात की, जानेवारी महिन्यानंतर तेथील नायट्रोजन ऑक्साईड या घातक वायूच्या हवेतील प्रमाणात कमालीची घट झाली आहे. गेल्या काही महिन्यांत चीनमधील उत्पादन, वाहतूक कमी झाली. त्याचा हा परिणाम आहे. इटलीमध्ये, जिथं संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, तिथं प्रदूषणाची पातळी आश्चर्यकारकरित्या कमी झाली आहे. 

विमान प्रवास हे एक महत्त्वाचं कारण आहे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतो. स्वीडनमधील पर्यावरण बदलाचे अभ्यासक डॉकटर निकोलस यांच्या मते, न्यूयॉर्क ते लंडन दरम्यान ये-जा केलेला विमान प्रवास इतका हरितगृह वायू निर्माण करतो, जितका घटवण्यासाठी आठ वर्षे वस्तूंचा पुनर्वापर करावा लागेल. 

करोना जेव्हा जागतिक आरोग्य परिषदेनं ‘वैश्विक संकट’ म्हणून जाहीर केला, तेव्हा अनेक देशांनी आपल्या विमान प्रवासावर बंधनं घातली आणि अनेक प्रवासी तर स्वतःच विमान प्रवास रद्द करत आहेत. साहजिकच याचा खूप मोठा फायदा पर्यावरण बदलास सध्या तरी होत आहे.

अनेक जागतिक परिषदा, कार्यशाळा या प्रत्यक्ष भेटून करण्यापेक्षा वेबिनार, व्हिडिओ परिषद या मार्गानं करण्याचा कल वाढत आहे. चीनमध्ये तर अनेक शाळा व्हिडिओ माध्यमांद्वारे सुरू आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये होणारी बेसुमार ऊर्जा वाचत आहे. आणि या पर्यावरण पूरक मार्गांची नकळत जगाला कदाचित सवयसुद्धा होत आहे.

देशांतर्गत परिस्थिती

महाराष्ट्र, दिल्ली अशा अनेक ठिकाणी सरकारने सार्वजनिक जीवनावर बंदी घातली आहे. जितकी कमी गर्दी, तितका कमी संसर्ग, असा हा साधा सोप्पा उपाय आहे. अनेक मॉल्स, सिनेमागृहं, उद्यानं, व्यायामशाळा आता बंद आहेत. या ठिकाणी बऱ्याचदा गरज नसतानाही उधळली जाणारी वीज, या निमित्तानं वाचत आहे. लग्न कार्य आणि असे सोहळे आपोआपच कमी खर्चात, ऊर्जेच्या कमी वापरानं घडत आहेत.

शहरांमधील वाहतूकदेखील तुरळक झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाला तर विशेष फरक पडत नाही, कारण त्यातून कित्येक लोक प्रवास करतात, पण खाजगी वाहतुकीवर निर्बंध आल्यानं साहजिकच कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण घटतं.

नुकत्याच झालेल्या एका जगातील सर्वेक्षणामध्ये भारतातील बंगळूर, मुंबई आणि पुणे ही शहरं वाहन संख्येमध्ये अग्रगण्य होती. परंतु आता नाईलाजानं रस्त्यावर वाहनं काढणं लोक स्वतःच टाळत आहेत. अनेक कंपन्या ‘घरी बसून काम’ करण्याच्या सूचना आपल्या कामगारांना देत आहेत. त्यामुळे अर्थातच कामगारांची वाहतूक, कार्यालयातील वीज अशा अनेक गोष्टी वाचत आहेत. यातून होणारं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण आपोआप कमी होत आहे.

तात्पुरती का होईना, पर्यावरणपूरक जीवनशैली

वास्तविक पाहता पर्यावरण पूरक जीवनशैलीचा आग्रह पर्यावरणवादी नेहमीच करत असतात. ज्यामध्ये या सर्व गोष्टी सुचवल्या जातात की, वाहनांचा वापर कमी करा, वीज वाचवा, इत्यादी. पण वस्तुस्थिती अशी आहे की, जोपर्यंत एक समाज म्हणून आपल्याला निसर्गाचा तडाखा बसत नाही, तोवर आपण जागे होत नाही.

आत्ता करोनामुळे या कृती घडत आहेत, परंतु हा म्हणजे ‘जुलमाचा रामराम’ आहे. हे बदलत्या जीवनशैलीचं स्थित्यंतर आपण कायम ठेवू, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. कारण इतके आपण नैसर्गिक संसाधनं उधळपट्टी करण्याच्या जीवनशैलीमध्ये गुंग झालेलो आहोत. तसंच जागतिक पातळीवर सध्याचा आर्थिक तुटवडा भरून काढण्यासाठी पुढे आपण कोणत्या थरास जाऊ आणि त्यातून पर्यावरणाचं किती नुकसान होईल, हे आत्ता सांगणं कठीण आहे.

परंतु निदान सध्या तरी एक समाज म्हणून संसाधनं अत्यल्प वापरण्याचा अनुभव आपल्याला मिळतो आहे. हात कसे धुवावेत याचं मूलभूत शिक्षण आपण घेतो आहोत आणि त्याचा वापर करतो आहोत. आपल्याहून आकारानं कितीतरी छोटा असणारा एक विषाणू आपल्याला धारेवर धरू शकतो, याचा प्रत्यय आपल्याला येतो आहे. यानिमित्तानं निसर्ग नेहमीच आपल्याहून जास्त शक्तिमान आहे, याची एक सामाजिक जाणीव आपल्या सामूहिक मनःस्थितीमध्ये रुजत आहे, अशी आशा ठेवायला हरकत नाही. 

संदर्भ -

१. https://abcnews.go.com/International/severe-reduction-emissions-coronavirus-mitigate-climate-change-long/story?id=69334246

२. https://www.axios.com/pollution-levels-italy-coronavirus-30ce759a-c4f2-4517-832d-59facef2f5c6.html

३. https://www.nytimes.com/2020/03/13/climate/coronavirus-habits-carbon-footprint.html

४. https://www.edutopia.org/article/what-teachers-china-have-learned-past-month

५. https://www.indiatoday.in/india/story/bengaluru-is-world-s-most-traffic-congested-city-report-1641466-2020-01-30

.............................................................................................................................................

लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.

anujghanekar2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......