टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोदी आणि त्यांची आई, मायावती आणि आनंदकुमार, कॅशलेस विवाह, मोदी, मुलायमसिंग यादव
  • Wed , 11 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi मायावती Mayawati आनंदकुमार Anand Kumar मुलायमसिंग यादव Mulayam Singh Yadav

१. आता सर्व काही अखिलेशकडे आहे, माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार आहेत. : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची खंत.

नेताजी, ही खंत आहे की टाकला डाव सफल झाल्याचा आनंद? तुम्ही अशी विधानं केलीत, तर आता जे बोटावर मोजण्याइतके सोबत आहेत, तेही इथे काही खरं नाही म्हणून तिथेच जातील ना? की तीच नेपथ्यरचना आहे?

…………………………………….

२. ज्याची लायकी असेल त्याला निवडणुकीसाठी उमेदवारीचं तिकीट मिळेल. त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकू नये. : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वपक्षीयांना इशारा

कसली पात्रता? निवडणूक जिंकण्याचीच ना? ती ठरवणार कोण? अमित शाहच ना? मग ठीक आहे. तुमच्याकडेही कुटुंबाकुटुंबांनी ती पात्रता कमावलेली आहेच. त्यामुळे हा इशारा सतरंजी उचलणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उद्देशून आहे बहुतेक. कारण, निवडून येण्याची क्षमता अर्थात इलेक्टोरल 'मेरिट' असलेल्या बाहेरच्या पक्षाच्या आयात उमेदवारांना हा निकष लावला जाताना दिसत नाही.

…………………………………….

३. नियमित योगासने करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी या नियमाला छेद देऊन गुजरातेत आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर नाश्ताही केला. खुद्द पंतप्रधानांनीच याची ट्विट करून माहिती दिली. 

म्हाताऱ्या-कोताऱ्यांना लायनीत उभे करण्याचा उद्योग थांबल्याशिवाय घरात पाऊल टाकायचं नाही, असा आईने दम दिला होता की काय? ती माऊली बिचारी आताही धास्तावली असेल, आता लेकासाठी फोटो काढून घ्यायला कुठे जावं लागतंय याचा नेम नाही म्हणून.

…………………………………….

४. मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांची संपत्ती सात वर्षांत सात कोटींवरून थेट १,३०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

ती मुळात शून्यातून सात कोटींवर किती वर्षांत पोहोचली, याचीही माहिती खरंतर मिळायला हवी. बहीण सत्तेबाहेर असताना एवढी प्रगती होत असेल, तर सत्तेत असतानाचा उत्कर्ष किती असेल? व्यवसायात यशस्वी होण्याचं तंत्र या विषयावर खरंतर राजकारणी उद्योजकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पुस्तकं लिहायला हवीत. लोक उगाच कष्ट आणि व्यावसायिक कौशल्यांच्या मार्गाने यशस्वी होण्याचा प्रयत्न करत बसतात.

…………………………………….

५. पश्चिम बंगालच्या सिंगभूम जिल्ह्यातील बादीया गावात एकाच वेळी दोन सामाजिक हेतू साध्य करणारा अनोखा विवाह पार पडला. लग्नाच्या काही तास आधी वधु-वर पक्षांनी एकत्र येऊन नवरदेवाच्या घरात शौचालय बांधलं आणि एका पैशाचाही रोखीने व्यवहार न करता कॅशलेस विवाहसोहळा पार पाडला.

यांच्यात ते मेहुणीने जोडे लपवणं, मुँहदिखाई वगैरे नसतं का? तेही पेटीएमनेच केलं असेल. आता नवरदेव हनीमून संपवून गृहस्थाश्रमात प्रवेश करतील, तेव्हा कोथिंबीर, मिरच्याही कॅशलेस खरेदी करतील, यात शंका नाही. हे लग्न होतं की सरकारी जाहिरातपटाचं शूटिंग?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......