टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोदी आणि त्यांची आई, मायावती आणि आनंदकुमार, कॅशलेस विवाह, मोदी, मुलायमसिंग यादव
  • Wed , 11 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi मायावती Mayawati आनंदकुमार Anand Kumar मुलायमसिंग यादव Mulayam Singh Yadav

१. आता सर्व काही अखिलेशकडे आहे, माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार आहेत. : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची खंत.

नेताजी, ही खंत आहे की टाकला डाव सफल झाल्याचा आनंद? तुम्ही अशी विधानं केलीत, तर आता जे बोटावर मोजण्याइतके सोबत आहेत, तेही इथे काही खरं नाही म्हणून तिथेच जातील ना? की तीच नेपथ्यरचना आहे?

…………………………………….

२. ज्याची लायकी असेल त्याला निवडणुकीसाठी उमेदवारीचं तिकीट मिळेल. त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकू नये. : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वपक्षीयांना इशारा

कसली पात्रता? निवडणूक जिंकण्याचीच ना? ती ठरवणार कोण? अमित शाहच ना? मग ठीक आहे. तुमच्याकडेही कुटुंबाकुटुंबांनी ती पात्रता कमावलेली आहेच. त्यामुळे हा इशारा सतरंजी उचलणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उद्देशून आहे बहुतेक. कारण, निवडून येण्याची क्षमता अर्थात इलेक्टोरल 'मेरिट' असलेल्या बाहेरच्या पक्षाच्या आयात उमेदवारांना हा निकष लावला जाताना दिसत नाही.

…………………………………….

३. नियमित योगासने करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी या नियमाला छेद देऊन गुजरातेत आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर नाश्ताही केला. खुद्द पंतप्रधानांनीच याची ट्विट करून माहिती दिली. 

म्हाताऱ्या-कोताऱ्यांना लायनीत उभे करण्याचा उद्योग थांबल्याशिवाय घरात पाऊल टाकायचं नाही, असा आईने दम दिला होता की काय? ती माऊली बिचारी आताही धास्तावली असेल, आता लेकासाठी फोटो काढून घ्यायला कुठे जावं लागतंय याचा नेम नाही म्हणून.

…………………………………….

४. मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांची संपत्ती सात वर्षांत सात कोटींवरून थेट १,३०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

ती मुळात शून्यातून सात कोटींवर किती वर्षांत पोहोचली, याचीही माहिती खरंतर मिळायला हवी. बहीण सत्तेबाहेर असताना एवढी प्रगती होत असेल, तर सत्तेत असतानाचा उत्कर्ष किती असेल? व्यवसायात यशस्वी होण्याचं तंत्र या विषयावर खरंतर राजकारणी उद्योजकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पुस्तकं लिहायला हवीत. लोक उगाच कष्ट आणि व्यावसायिक कौशल्यांच्या मार्गाने यशस्वी होण्याचा प्रयत्न करत बसतात.

…………………………………….

५. पश्चिम बंगालच्या सिंगभूम जिल्ह्यातील बादीया गावात एकाच वेळी दोन सामाजिक हेतू साध्य करणारा अनोखा विवाह पार पडला. लग्नाच्या काही तास आधी वधु-वर पक्षांनी एकत्र येऊन नवरदेवाच्या घरात शौचालय बांधलं आणि एका पैशाचाही रोखीने व्यवहार न करता कॅशलेस विवाहसोहळा पार पाडला.

यांच्यात ते मेहुणीने जोडे लपवणं, मुँहदिखाई वगैरे नसतं का? तेही पेटीएमनेच केलं असेल. आता नवरदेव हनीमून संपवून गृहस्थाश्रमात प्रवेश करतील, तेव्हा कोथिंबीर, मिरच्याही कॅशलेस खरेदी करतील, यात शंका नाही. हे लग्न होतं की सरकारी जाहिरातपटाचं शूटिंग?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......