टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोदी आणि त्यांची आई, मायावती आणि आनंदकुमार, कॅशलेस विवाह, मोदी, मुलायमसिंग यादव
  • Wed , 11 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi मायावती Mayawati आनंदकुमार Anand Kumar मुलायमसिंग यादव Mulayam Singh Yadav

१. आता सर्व काही अखिलेशकडे आहे, माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार आहेत. : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची खंत.

नेताजी, ही खंत आहे की टाकला डाव सफल झाल्याचा आनंद? तुम्ही अशी विधानं केलीत, तर आता जे बोटावर मोजण्याइतके सोबत आहेत, तेही इथे काही खरं नाही म्हणून तिथेच जातील ना? की तीच नेपथ्यरचना आहे?

…………………………………….

२. ज्याची लायकी असेल त्याला निवडणुकीसाठी उमेदवारीचं तिकीट मिळेल. त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकू नये. : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वपक्षीयांना इशारा

कसली पात्रता? निवडणूक जिंकण्याचीच ना? ती ठरवणार कोण? अमित शाहच ना? मग ठीक आहे. तुमच्याकडेही कुटुंबाकुटुंबांनी ती पात्रता कमावलेली आहेच. त्यामुळे हा इशारा सतरंजी उचलणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उद्देशून आहे बहुतेक. कारण, निवडून येण्याची क्षमता अर्थात इलेक्टोरल 'मेरिट' असलेल्या बाहेरच्या पक्षाच्या आयात उमेदवारांना हा निकष लावला जाताना दिसत नाही.

…………………………………….

३. नियमित योगासने करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी या नियमाला छेद देऊन गुजरातेत आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर नाश्ताही केला. खुद्द पंतप्रधानांनीच याची ट्विट करून माहिती दिली. 

म्हाताऱ्या-कोताऱ्यांना लायनीत उभे करण्याचा उद्योग थांबल्याशिवाय घरात पाऊल टाकायचं नाही, असा आईने दम दिला होता की काय? ती माऊली बिचारी आताही धास्तावली असेल, आता लेकासाठी फोटो काढून घ्यायला कुठे जावं लागतंय याचा नेम नाही म्हणून.

…………………………………….

४. मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांची संपत्ती सात वर्षांत सात कोटींवरून थेट १,३०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

ती मुळात शून्यातून सात कोटींवर किती वर्षांत पोहोचली, याचीही माहिती खरंतर मिळायला हवी. बहीण सत्तेबाहेर असताना एवढी प्रगती होत असेल, तर सत्तेत असतानाचा उत्कर्ष किती असेल? व्यवसायात यशस्वी होण्याचं तंत्र या विषयावर खरंतर राजकारणी उद्योजकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पुस्तकं लिहायला हवीत. लोक उगाच कष्ट आणि व्यावसायिक कौशल्यांच्या मार्गाने यशस्वी होण्याचा प्रयत्न करत बसतात.

…………………………………….

५. पश्चिम बंगालच्या सिंगभूम जिल्ह्यातील बादीया गावात एकाच वेळी दोन सामाजिक हेतू साध्य करणारा अनोखा विवाह पार पडला. लग्नाच्या काही तास आधी वधु-वर पक्षांनी एकत्र येऊन नवरदेवाच्या घरात शौचालय बांधलं आणि एका पैशाचाही रोखीने व्यवहार न करता कॅशलेस विवाहसोहळा पार पाडला.

यांच्यात ते मेहुणीने जोडे लपवणं, मुँहदिखाई वगैरे नसतं का? तेही पेटीएमनेच केलं असेल. आता नवरदेव हनीमून संपवून गृहस्थाश्रमात प्रवेश करतील, तेव्हा कोथिंबीर, मिरच्याही कॅशलेस खरेदी करतील, यात शंका नाही. हे लग्न होतं की सरकारी जाहिरातपटाचं शूटिंग?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......