टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • तिरुपती बालाजी, शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, आमीर खान आणि मोहन भागवत
  • Thu , 29 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या तिरुपती बालाजी Tirupati Balaji शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती Shankaracharya Vasudevanand Saraswati आमीर खान Aamir Khan मोहन भागवत Mohan Bhagwat

१. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात आधार कार्ड बंधनकारक करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठीही आधार कार्डाची आवश्यकता भासणार आहे. विना आधार कार्ड मंदिरात प्रवेश करता येईल परंतु देवाचे दर्शन आणि प्रसाद म्हणून दिला जाणारा लाडू घेण्यासाठी मात्र आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

अरे वा! आता लौकरच भाविकांच्या स्वप्नात दृष्टान्त देतानाही देव म्हणणार, खरं तर मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो होतो आणि तुझ्यावर कृपेचा वर्षाव करणार होतो- पण, तुझ्याकडे आधार कार्ड नसल्याने मी तुला कृपाप्रसादही देऊ शकत नाही आणि आधार देऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने निराधार होतील ना आता 'निराधार' भक्त!

…………………………………

२. जे लोक हिंदू धर्मापासून दूर गेले आहेत. त्यांची घरवापसी करावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

मोहनराव, हिंदू धर्मातून दूर गेलेल्यांनाच नव्हे, तर अन्यधर्मियांनाही सहिष्णु, प्रगतिशील, आध्यात्मिक जगद्गुरू वगैरे वगैरे असलेल्या हिंदू धर्माची जाम ओढ लागलेली आहे. त्यांना फक्त एकच प्रश्न पडलाय… घरवापसी केल्यावर त्यांची जात कोणती असणार? सगळ्यांना ब्राम्हण किंवा अन्य तथाकथित उच्च जातीच हव्या आहेत. काय सांगू त्यांना?

…………………………………

३. आज हिंदुत्व धोक्यात आले असून, हिंदूंची संख्याही वेगाने कमी होत आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर हम दो हमारे दो, हे सरकारी आवाहन नजरेआड करून एकेका हिंदू दाम्पत्याने किमान दहा अपत्यं जन्माला घालणे आवश्यक आहे. त्यांचं पोट भरण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. : ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती

आजकाल एक गंमत होऊन बसलेली आहे. घरदार त्यागून सोयीस्कर फकिरी स्वीकारलेले भोट संसारी जनांना सल्ले देत फिरतात. या शंकराचार्यांनी उंटावरून शेळ्या न हाकता आधी संसारात उतरावं, आपण दहा पोरं जन्माला घालावीत आणि त्यांच्या लालनपालनाचं कर्तव्य पार पाडल्यानंतर त्या अनुभवातून सिद्ध झालेलं ग्यान लोकांना द्यावं. स्त्रियांना मुलं जन्माला घालण्याचं मशीन समजतात की काय हे शंकराचार्य?

…………………………………

४. नक्षल कमांडर आणि चळवळीतल्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही पैसे देऊन खरेदी केले आहे; त्यामुळे आमचे आता कुणी काही बिघडवून शकत नाही, अशी मग्रुरीची भाषा लॉयड मेटल्स व्यवस्थापनाने सुरू केल्याने संतापलेल्या ३०-३५ नक्षलवाद्यांनी सूरजागड येथे या कंपनीची ७८ वाहने काही मिनिटांत जाळून टाकली आणि नक्षलवाद्यांची हिंस्त्र चळवळ जिवंत असल्याचं दाखवून दिलं.

अरेच्चा, पण, नोटाबंदीमुळे या चळवळीचं कंबरडं पुरतं मोडलं होतं ना? मग नेत्यांना पैसे देऊन विकत घेण्याची व्यवस्था कंपनीने कशी केली असेल? पेटीएममधून पाठवले की जनधन खात्यांत भरले? की नक्षलवाद्यांनीही कॅशलेस चळवळ चालवायला सुरुवात केली? तसं असेल तर मग हे केंद्र सरकारचं केवढं मोठं यश म्हणायचं!

…………………………………

५. अभिनेता आमीर खान याच्या एका वक्तव्याचा संदर्भहीन विपर्यास करून त्याच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारल्यानंतर स्नॅपडील या रिटेल वेबसाइटच्या ब्रॅंड अम्बेसिडर पदावरून त्याला हटवण्यासाठी देशभर चालवली गेलेली ऑनलाइन मोहीम सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखानेच सुरू केली होती, असा आरोप त्याच्याच एका माजी सहकारी महिलेने केला आहे. साध्वी खोसला ही महिला याच आयटी सेलची स्वयंसेवक होती. आयटी सेलचे प्रमुख अरविंद गुप्ता यांनी सोशल मीडियाचा वापर करून आमिरच्या विरोधात मोहीम चालवली आणि स्नॅपडीलवर दबाव आणला, असा आरोप साध्वीने 'आय अॅम अ ट्रोल' या स्वाती चतुर्वेदी लिखित पुस्तकात केला आहे.

साध्वीताई, इतक्या उशिराने इतका निरर्थक गौप्यस्फोट करण्यात काय हशील? सोशल मीडियावर या असल्या मोहिमा, नोटेतल्या चिपांपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातल्या छुप्या हेरगिरी यंत्रणांपर्यंतच्या विनोदी बातम्या कुठून प्रसृत होतात, हे सोशल मीडियावरच्या सगळ्यांना ठाऊक आहेच की! शिवाय, दिवंगत राजीव दीक्षितांना स्मरून चाललेलं महान वैज्ञानिक कार्यही लोकांपर्यंत त्याच वाटेने पोहोचत असणार, हो ना?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......