नोटबंदी @ ५० : शेतकऱ्याने जगावं की मरावं? की आहे तसंच खितपत पडावं?
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण मनोहर तोरडमल
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Wed , 28 December 2016
  • अर्थकारण नोटा रद्दीकरण Demonetization शेतकरी Farmers भाजीपाला Vegetables बाजारभाव Agricultural And Food Markets

केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर निघावा यासाठी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड-पावणे दोन महिन्यांत घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांवर झाल्याचा बातम्या सतत प्रसारमाध्यमांतून येत आहेत. ज्याविषयी फारशा बातम्या येत नाहीत, अशा शेतीक्षेत्रालाही या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. सध्या रब्बी हंगाम चालू आहे. पैशाची उपलब्धता होत नसल्याने शेतकऱ्यावर खतं व बियाणं उधारीवर खरेदी करण्याची वेळ आली आहे. नोटबंदीनंतर राज्य सरकारने शेतमाल विक्रीची कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. त्यामुळे कवडीमोल भावाने शेतमालाची विक्री करावी लागत आहे. शेतकरी आधीच कर्जबाजारी त्यात ही भर!

नोटबंदीनंतर जवळपास पावणे दोन महिने उलटूनही पैसा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मजूर वर्गाला देण्यासाठी पैसाच उपलब्ध होत नसल्याने शेतीतली कामं कशी उरकावी असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यापुढे आ वासून उभा राहिला आहे. अल्पभूधारक शेतकरी आणि मजुरांकडून शेती करून घेणारे शेतकरी धान्य किंवा पैसे नंतर मिळतील या बोलीवर कामं करून घेत आहेत.

सध्या शेतकरी, व्यापारी आणि खरीददार या सर्वांच्याच अडचणी वाढल्या आहेत. आतापर्यंत उधारीवर व्यवहार सुरू होते. सुट्या पैशांच्या तुटवड्यामुळे जावक बऱ्याच प्रमाणात घटली आहे, परंतु आवक वाढत आहे. शेतमाल नाशवंत असल्याने त्याच्या किमती वेगाने उतरल्या आणि शेतकऱ्याला माल रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

शेतकरी गावकीच्या संबंधावर, नात्यागोत्याच्या मदतीने आणि आजवरच्या आपल्या व्यवहारातून निर्माण केलेल्या आपल्या ‘पती’वर कसे तरी पैसा गोळा करतो आहे. परंतु कित्येकदा ‘उघडा गेला नागड्याकडे’ अशी गत होते. थोड्याफार रकमेने किती दिवस भागणार? त्यामुळे त्याला रोज अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. घरखर्च, शेतातील मजुरांचा पगार, शेतीमधील औषधपाणी, खतं, पाळीव जनावरांचं खाद्य, औषधपाणी अशा अनेक गोष्टींची तोंडमिळवणी करता करता तो टेकीला आला आहे.

या वर्षी रब्बी हंगामासाठी चांगल्या पाऊसपाण्याची सोय झाली. त्यामुळे उत्साहाने शेतकऱ्यांनी फळभाज्यांची लागवड केली गेली. फळभाज्यांचे पीक हमखास पैसे देतं. मुबलक पाणी, औषधं आणि खतं यांचा वापर केल्याने यंदा ही पिकेही चांगली आली होती. पण ती काढणीला आली आणि ऐन हंगामाच्या तोंडावर सरकारने आडत बंदीचा निर्णय जाहीर केला. मग काय, व्यापाऱ्यांनी काही दिवस बाजार समित्यांतील व्यवहार बंद पाडले. ते मनमानी पद्धतीने व्यवहार करू लागले. त्याचा फटका शेतकरी सहन करतो न करतो तोच केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आधीच आगीत सापडलेला शेतकरी, या निर्णयाने फुफाट्यात पडला! व्यापाऱ्यांची मनमानी अधिकाधिक वाढत गेली आणि बाजारभाव त्यांच्या मनासारखे उतरू लागले. शेतमालाची ज्या त्या वेळीच विक्री करणे भाग असल्याने शेतकऱ्याला या दिव्यातूनही जावं लागत आहे.

शेतकऱ्यांनी जी फळपिकं घेतली होती, त्यातून मजुरांना व शेतकऱ्यांना रोजगार मिळणार होता. पुढील शेतकामासाठी भांडवल उपलब्ध होणार होतं. पण नोटबंदीनंतर बाजारात मंदी आली आणि त्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी शेतमालाचे भाव पाडले. परिणामी शेतकऱ्याला नाईलाजाने आपला शेतमाल रस्त्यावर फेकावा लागला. या फळभाजी पिकासाठी त्याने केलेला खर्च व्यर्थ गेला. आता त्याचे पुढचे पीकपाण्याचे आणि इतर नियोजन कशाच्या जोरावर होणार?

ही इतकी वाईट स्थिती फक्त शेतकऱ्यांचीच झाली आहे, कारण त्यांची कोणती मजबूत संघटना नाही की, त्यांचा कोणी एक नेता नाही, आमदार नाही की खासदार नाही... त्याची कोणती एक जात नाही! थोडक्यात त्याला कोणीच वाली नाही. सध्या व्यापाऱ्यांकडे रोख पैसे नसल्याने अनेक भाजीवाल्यांचे सौदे पूर्ण होत नाहीत. कमी प्रमाणात भाजीपाला असणाऱ्यांना धनादेश द्यायचेही बंद केले आहे. अनेक वेळा भाजीपाल्याची खरेदी-विक्री केली जात नाही. त्यामुळे त्याचा फटका सरळ शेतकऱ्याला बसतो आहे. तसंच दर पंधरवड्याने येणारी दुधाची बिलं (ज्यावर शेतकऱ्याचा रोजचा खर्च तोलला जातो! ) बँकेच्या खात्यात असल्याने शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चावरच गदा आली आहे. नोटबंदीने किती काळा पैसा गोळा केला याचं सोयरसुतक शेतकऱ्याला असणं दुरापास्त आहे. एवढं खरं की, नोटबंदी मात्र त्याच्या मुळावर आली आहे.

हे झालं शेतकऱ्यांविषयी. जनावरांच्या बाजाराची स्थितीही याहून वेगळी नाही. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील मध्यस्त (दलाल) सर्वसाधारणपणे अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याच्याकडून जनावरे विकत घेतली जातात आणि पुढच्या बाजारात एक-दोन हजाराच्या फरकाने विकली जातात. हाच या लोकांचा पोटपाण्याचा व्यवसाय आहे. हा बाजार पूर्णपणे रोखीनं केला जातो. तो तसाच करावा लागतो. या बाजारात चेकचा वापर करणं केवळ अशक्य आहे. मग विचार करा नोटबंदीचा या बाजारावर काय परिणाम झाला असेल? अशीच स्थिती शेळ्या-म्हशीच्या बाजाराचीही आहे. एकतर मंदी, किमती उतरलेल्या, विकणारा हातघाईवर आलेला, परंतु गिऱ्हाईकाचीच वानवा. पाचशेच्या जुन्या नोटा घेऊन गिऱ्हाईक येतं, परंतु शेतकरी त्या घ्यायला तयार नाहीत. कारण बँकाच्या रांगांची भीती. घेतलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनंत कसरती अडाणी शेतकरी कशा करणार?

फळे, फुले, भाज्या यांचे दर ५० टक्क्यांनी उतरले आहेत. फळे, फुले, भाज्या विक्रीसाठी ज्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी पाठवल्या जात होत्या, तिथं मागणी कमी झाली म्हणून ही विक्री स्थानिक बाजारपेठेत सुरू झाली. पण तिथं सुट्या पैशांची टंचाई म्हणून दर घसरले. फुलशेती तर पूर्णपणे तोट्यात गेली. एका फुलशेतकऱ्याने पांढऱ्या शेवंतीचे पिक घेतलं होतं. नोटबंदीआधी शेवंतीचा दर किलोमागे साधारण १०० रुपये होता. नोटबंदीनंतर तीच शेवंती ४०-५० रुपये किलो झाली. काढणी खर्च आणि वाहतूक खर्च मात्र तोच राहिला. त्यात व्यापाऱ्यांनी आपले हात मारणं चालूच ठेवलं. परिणामी जी शेवंती १०० रुपये किलोने विकली जायची, तो १० रुपयांवर आला. शेवटी त्या शेतकऱ्याने शेवंतीची बाग आहे तशी नांगरून काढली.

 शेतमालाचे नाव

 नोटबंदीआधीचा किलोमागे बाजारभाव

 नोटबंदीनंतर किलोमागे बाजारभाव

 टोमॅटो

 १० ते १२ 

 २ ते ३

 ढोबळी मिरची

 १५ ते २०

 ५ ते १०

 घेवडा

 २० ते २५

 ५ ते १०

 फ्लॉवर

 १३ ते १६

 २ ते ३

 फुलकोबी

 १८ ते २२

 ८ ते १०

 स्वीट कॉर्न

 ७५ रु डझन

 ३० ते ३५ रु. डझन

 पांढरी शेवंती

 १०० ते ११०

 ४० ते ५०

 डाळिंब

 ८५ ते १००

 ४० ते ५०

 तूर

 ५०५० प्रती क्विंटल

 ४००० प्रती क्विंटल

 हे भाव शेतकऱ्याच्या मालाचे आहेत.

केंद्र सरकारने या हंगामासाठी तुरीचा दर ५०५० रुपये प्रती क्विंटल जाहीर केला होता, परंतु नोटांच्या अभावामुळे क्विंटलामागे शेतकऱ्याच्या हाती ४००० रुपयेच पडत आहेत.

मला भाजीबाजारात आलेला अनुभव विलक्षण विदारक आहे. बाजाराच्या दिवशी मी मित्रासोबत गेलो होतो. त्याने पाच रुपयाला मेथीच्या दोन जुड्या घेतल्या. दहा रुपये दिले. त्यावर शेतकरी म्हणू लागला, ‘पाचची चिल्लर कुठून देऊ? त्यापेक्षा आणखी तीन जुड्या घ्या.’ दहा रुपयाला पाच जुड्या या भावाने जर मेथी विकावी लागत असेल तर त्या शेतकऱ्याला काय उरत असेल, या प्रश्नानं माझं डोकं भणाणत राहिलं. हीच स्थिती सगळ्या भाज्यांची झाली आहे. टोमॅटो, वांगी, गाजर, घेवडा, मिरची याचे भाव ऐकून तर मी खूपच अस्वस्थ झालो. शेतकऱ्याला सगळ्यांनी मिळून फासावरच चढायचं ठरवून टाकलं आहे का? कशासाठी शेतकरी शेती करण्याचा हा वेडेपणा करत आहेत?

सत्ताधाऱ्यांची उदासीनता तर चक्रावून टाकणारी आहे. नोटबंदीमुळे शेतमालाचे कोसळलेले भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळग्रस्तांसाठीचं गेल्या वर्षातील रखडलेलं मदतीचं वाटप, पीक विम्याची प्रतीक्षा आदींसह ज्वलंत प्रश्न शेतीपुढे असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचं जवळपास नाकारल्याचंच चित्र आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्या नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात यावर काहीही ठोस उपाय सरकारने केला नाही. दुर्दैवाने विरोधकसुद्धा या मुद्द्यावर राज्य सरकारला जाब विचारण्याच्या बाबतीत उदासीन असल्याचंच दिसलं

थोडक्यात शेतकरी सर्व पातळीवरील उदासीनतेचा बळी ठरत आहे. याचा त्यामुळे जाब विचारावा तर कोणाला, हा प्रश्न माझ्यासारख्या शेतकऱ्याला पदोपदी गर्भगळीत करत आहे!

 

लेखक कृषी पदवीधर असून पूर्णवेळ शेती करतात.

Post Comment

Samarth Family

Thu , 29 December 2016

नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर नक्की किती आला ते माहीत नाही, परंतु गरीब व मध्यमवर्गाचे मात्र चांगलेच कंबरडे मोडले आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......