माझा ‘नथुराम-मोहन टीव्ही चॅनेल’ अर्थात ‘नमो टीव्ही’!
संकीर्ण - व्यंगनामा
जयदेव डोळे
  • ‘नमो टीव्ही’चं एक प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 17 April 2019
  • संकीर्ण व्यंगनामा नमो टीव्ही NaMo TV

मी संतोष घनश्याम परिवारे अर्थात सं.घ. परिवारे असे जाहीर करू इच्छितो की, आमचे ‘नथुराम-मोहन टीव्ही चॅनेल’ अर्थात ‘नमो टीव्ही’ हिच्याविषयी नाना शंका-कुशंका प्रसृत केल्या जात असून तिच्याविषयी नाहक अपप्रचार केला जात आहे. मी सदर वाहिनीचा संस्थापक, व्यवस्थापक, प्रचारक म्हणून सांगू इच्छितो की, देशाची सेवा करणाऱ्या वहिनीला असो की वाहिनीला असो, अशा प्रकारच्या छळाची सवय करवून घ्यावीच लागते. किती नि:शंक, निरभ्र, नि:स्वार्थ व निष्कपट हेतूंनी मी ‘नमो टीव्ही’ वाहिनी सुरू केली.

तिने सतत देशाचा विचार करत राहावा म्हणून जाहिराती घ्यायच्या नाहीत असे मी ठरवले! एवढेच काय तिने बातम्या, बातम्यांच्या वेळा, बातमीदार, न्यूज अँकर, संपादक, न्यूज एडिटर, कॅमेरापर्सन आदी ‘देशद्रोही’ लोकांवर विसंबून राहू नये अशी व्यवस्थासुद्धा मी केली. काय सांगता येते हो, कोणाच्या मनात काय येईल ते! एकवेळ ‘मन की बात’ आम्ही करू, परंतु हे पत्रकार लोक फार मनकवडे! त्यांना मनातल्या गोष्टी कशा काय समजतात कोण जाणे! म्हणून आमची वाहिनी मनुष्यविरहित आहे. तसे पाहिले तर एक शाखाच ती, पण ती सामान्य मानवी नसेल असा क्रांतिकारक प्रयोग मी सुरू केला.

जमिनीशी निगडीत कोणतेच व्यवहार मी या वाहिनीत आणले नाहीत, हेही फार धक्कादायक व थक्क करणारे तुम्हाला वाटेल. मी आहेच तसा कल्पक आणि अफलातून काही करणारा! म्हणजे इमारत, पत्ता, कार्यालय, माठ, टेबल-खुर्च्या अशा भौतिक गोष्टींची गरजच पडणार नाही, असे मी ठरवून टाकले. नाही तरी आमच्या शाखांना कोठे टेबल-खुर्च्या, पत्ता अन इमारत लागते? या वाहिनीच्या उभारणीवेळी मी सायबर स्पेसमध्ये जागा पक्की घेतली आणि सुरू केले प्रक्षेपण!

तसा माझा नावनोंदणी, करभरणा, सदस्यांची पावती, ध्येयधोरणे अशा तद्दन फालतू गोष्टींवरही विश्वास नसल्याने मी या वाहिनीचे प्रक्षेपण तसेच केले. शत्रूला नमस्कार करण्याच्या निमित्ताने हातात लपवलेल्या पिस्तुलीने गोळ्या घालाव्यात या मताचा मी आहे. गाफील ठेवून हल्ला करावा म्हणजे जय आपलाच असे माझे ठाम मत आहे.

म्हणून ही वाहिनी मी सर्वांना गाफील ठेवून सुरू केली आहे. त्यातून गोळ्या, इजा करणाऱ्या वस्तू मी झाडणार नाही. मी झाडणार भाषणे, मुलाखती! मी म्हणजे मी व्यक्तिश: नाही, बरे का! या देशात चांगली भाषणे करणारी जी माणसे आहेत, त्यांनाच फक्त मी नमो टीव्हीत दाखवणार आहे.

फार शोध घ्यावा लागला यासाठी! एक ‘भाषणबाज जनता पार्टी’ देशात आहे. तीत सगळे लोक अत्यंत बोलके, बोलघेवडे किंबहुना वाचाळ आहेत. त्यातून निवडून काढून मी त्यांना बोलते केले. म्हणजे त्यांचे आधीचे जे बोल होते, तेच मी या वाहिनीमधून ऐकवले.

भाषण ऐकताना कसा समृद्ध अनुभव यायला हवा. तो मी संपूर्ण देतो. भाषण देणारे खूप दाखवले की, लक्ष विचलित होते, तुलना होऊ लागते, मुद्दे डळमळतात, म्हणून मी सध्या दोन-तीन लोकांनीच बोलत राहावे असे निश्चित केले आहे. शिवाय ही बोलणारी तोंडे सत्तेतील असतील तर आणखी मजा येईल असेही मी ठरवले. कारण सत्ता नेहमी ‘सत्याच्या बाजूने’ उभी असते आणि सत्य सदा सत्तेच्या शेजारी उभे राहून चवऱ्या ढाळत असते, असे मी लहानपणापासून ऐकत आलो असल्याने तो प्रयोग मी राबवला आहे. ट्राय, प्रसारभारती, माहिती व प्रसारण खाते यांना मात्र मी खड्यासारखे बाजूला ठेवले. सत्ता आपल्यापाशी असताना या छोट्या लोकांना कोण विचारेल?

बाकी माझ्या ‘नमो’ अर्थात ‘नथुराम-मोहन टीव्ही’च्या नावाचे तुम्हाला रहस्य सांगतो. ‘नथुराम’ तर तुम्हाला ऐकून ठाऊकच असेल. तो थोर राष्ट्रभक्त, संपादक होता. ‘मोहन’ म्हणजे आपले मोहनदास करमचंद गांधी. तेही थोर राष्ट्रभक्त व संपादक होते. एक संपादक दुसऱ्या संपादकाला नेहमी पाण्यात पाहतो. परस्परांचा ते मत्सर करतात. त्यामुळे दोघे अपप्रचार व असत्यकथन करत राहतात. दोघांना एकत्र आणल्यास सामंजस्य, संयम आणि सहिष्णुता यांचा पवित्र अनुभव साऱ्यांना येत राहील एवढीच माझी प्रामाणिक इच्छा. बाकी सब झूट आहे…

.............................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......