मोदी यांनी देशभक्ती व राष्ट्रवादाच्या लाटेवर स्वार होऊन निवडणूक जिंकण्याचा चंग बांधलाय!
पडघम - देशकारण
प्रशांत शिंदे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Wed , 03 April 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP पीएम नरेंद्र मोदी PM Narendra Modi

भारतीय राजकारण आणि समाजकारण पूर्वीपासून व्यक्तीकेंद्रीच आहे. याचे दाखले पुराणातील कथा-काव्यामध्ये आपल्याला आढळतात. यामुळे एका व्यक्तीला ‘मसीहा’ समजून त्याच्या गुणदोषाकडे दुर्लक्ष केलं जातं. इतिहासात आणि स्वातंत्र्यानंतर अशी व्यक्तीकेंद्री सत्ताकेंद्रं भारतीय समाजानं अनुभवली आहेत. त्याची फळं त्या काळातील समाजानं भोगलेली आहेत. अशी व्यक्तीकेंद्री सत्ताकेंद्रं एका ठराविक टप्प्यानंतर राजकारणात येतात. आज जागतिक पटलावर अशा व्यक्ती सत्तेत असल्याचं दिसतं. (अमेरिका, उत्तर कोरिया, चीन, रशिया, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड इ.) देशातील जनतेपेक्षा सत्ताधीश श्रेष्ठ समजला जातो, तेव्हा तो देश एकाधिकारशाहीकडे झुकलेला असतो.

२०१४ साली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ‘मसीहा’प्रमाणे तयार केली गेली. देशातील भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारी, दहशतवाद इत्यादी प्रश्नावर फक्त मोदी हाच उपाय असल्याचं भासवण्यात भाजप आणि मीडिया यशस्वी ठरले होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या राज्यात अनेक चुकीच्या घटना झाल्या होत्या. मोदी यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘राजधर्म’ पाळण्याचा सल्ला दिला होता. वाजपेयी यांच्या मनात मोदींच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका होती.

मात्र कॉर्पोरेट आणि संघाच्या पाठिंब्यानं लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला सारून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित झाले. सोळाव्या लोकसभा निवडणुकीत बहुमतानं मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सत्तेची सर्व केंद्रं त्यांच्याभोवतीच केंद्रित झाली. प्रशासन आणि मंत्रिमंडळातील इतर लोक नामधारी बनले.

मोदींनी जनतेला आवाहन केलं होतं ‘तुम्ही काँग्रेसला साठ वर्षं दिलीत, मला साठ महिने द्या. तुमच्या जीवनात ‘अच्छे दिन’ येणार.’ या साठ महिन्यातील पंतप्रधान मोदी यांचा प्रवास देशात कमी आणि परदेशात जास्त झाला आहे. मोदी यांनी १५ जून २०१४ पासून ३ डिसेंबर २०१८ पर्यंत ९२ देशांची विदेशयात्रा केली आहे. यासाठी त्यांचा ५६५ दिवस परदेशात प्रवास झाला. (साठ महिन्यांपैकी अठरा महिने पंचवीस दिवस) या पाच वर्षांत १०१ दिवस त्यांचे निवडणूक प्रचार रॅलीत सहभाग घेतल्यानं वाया गेले. (एकूण २२ महिने ६ दिवस) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक दौऱ्यावर सरासरी २२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. एकूण २ हजार १२३ कोटी रुपये खर्च झाला. यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ६१४ दिवस परदेश दौऱ्यात गेले. या दहा वर्षांत डॉ. मनमोहन सिंग यांनी ७५ प्रचारसभांमध्ये सहभाग घेतला होता.

सोळावी लोकसभा निवडणूक एक परिवर्तनाची लाट म्हटली गेली, परंतु एका अहवालानुसार या लाटेतील ८७ टक्के खासदार करोडपती होते. या पाच वर्षांच्या काळात या खासदारांच्या संपत्तीत सरासरी १५० पटीनं वाढ झाली आहे.

सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर अनेकांनी समाधान व्यक्त केलं. एकाधिकारशाहीकडे झुकलेलं सरकार निवडणुका घेईल का, याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. निवडणुकीत सत्तांतर झाल्यावर आपल्याला लिहिण्याचं, बोलण्याचं, विचार करण्याचं स्वातंत्र्य पुन्हा मिळवता येईल, अशी अपेक्षा ठेवता येते. दहशतीखाली जगणाऱ्या लोकांना निवडणुका हिंमत देतात.

निवडणुका म्हटलं की, पैशाचा पाऊस पडतो. निवडणूक आयोगानं दिलेल्या मर्यादेपेक्षा कित्येक पट अधिक खर्च केला जातो. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार छोट्या राज्यातील उमेदवारास ५० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा आहे. मोठ्या राज्यातील उमेदवारास ७० लाखांपर्यंत निवडणुकीत खर्च करण्याची मर्यादा आहे. २०१९च्या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाच लाख कोटी रुपये खर्च होण्याचा दावा एका एनजीओनं केला आहे. निवडणुकीत देशातील सर्वांत मोठी उलाढाल होते.

भारतीय चित्रपटांत ‘बदला’ घेणाऱ्या नायकासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये शिट्ट्या वाजवतो. प्रेक्षक नायकाच्या नैतिक-अनैतिक बाजूचा विचार न करता प्रेमात पडतो. नायकाच्या भूमिकेचा प्रचंड प्रभाव असलेल्या समाजात एखादी क्रूर घटना घडल्यानंतर ‘बदला’ घेण्याची प्रतिक्रिया उमटते. (फाशीची मागणी, भरचौकात गोळ्या घालण्याची मागणी, मॉब लिंचिंग, हिंसाचार इ.) अलीकडच्या काळात देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा मूड सेट करण्यामध्ये बॉलिवुडनेही खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना निर्माण करणाऱ्या चित्रपटांची लाट आली आहे. या लाटेवर स्वार होऊन निवडणूक जिंकण्याचा चंग मोदी यांनी बांधला आहे.

असे चित्रपट जानेवारी २०१८ पासून जवळपास प्रत्येक महिन्यात प्रदर्शित झाले आहेत.

जानेवारी महिन्यात ‘पद्मावत’,

फेब्रुवारी महिन्यात ‘पॅडमॅन’,

मे महिन्यात ‘राझी’, ‘परमाणू’, ‘पोखरण’,

ऑगस्टमध्ये ‘गोल्ड’, ‘सत्यमेव जयते’,

ऑक्टोबर महिन्यात ‘काशी इन सर्च ऑफ गंगा’,

नोव्हेंबर महिन्यात ‘मोहल्लाअस्सी’,

डिसेंबर महिन्यात ‘केदारनाथ’ आणि

२०१९मध्ये ‘उरी’, ‘ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, ‘ठाकरे’

या चित्रपटांनी प्रपोगंडा केला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणजे येत्या शुक्रवारी (पाच एप्रिल रोजी) ‘पीएम नरेंद्र मोदी’ आणि ‘ताश्कंद फाईल’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटातून नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळवण्याचा आणि काँग्रेस पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होणार असल्याचं बोललं जात आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रशांत शिंदे पत्रकारितेचं शिक्षण घेत आहेत.

shindeprashant798@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......