टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • लालकृष्ण अडवाणी, नितीश कुमार, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी
  • Sat , 17 December 2016
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani नितीश कुमार Nitish Kumar राहुल गांधी Rahul Gandhi

१. गेल्या काही दशकांत हिंदूंनी शिक्षणात चांगली प्रगती साधली असली तरी जगभरातील सर्व धर्मियांच्या तुलनेत हिंदू लोकांचं औपचारिक शिक्षण कमी असल्याचा अहवाल प्यू संशोधन संस्थेनं दिला आहे. सर्वधर्मियांच्या तुलनेत ज्यू हे सर्वाधिक शिकलेले आहेत. हिंदूधर्मीय माणूस आयुष्यात सरासरी ५.६ वर्षं शिक्षण घेतो, तर ४१ टक्के हिंदूंकडे कोणतंही औपचारिक शिक्षण नाही. केवळ एक टक्का हिंदू कनिष्ठ महाविद्यालयाची पायरी चढतात, असं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे.

हे पाहा, ज्यांची तक्षशिला, नालंदा विद्यापीठांची परंपरा आहे, ज्यांनी शून्याचा शोध लावला आहे, ज्यांच्या पूर्वजांनी विमानांपासून अणुबॉम्बपर्यंत सगळे शोध लावून टाकले होते, त्या जगाच्या स्वघोषित जगद्गुरूंना औपचारिक शिक्षणाची गरज काय? पश्चिमी संकल्पनांवर बेतलेल्या उपयुक्त माहितीआधारित पोटभरू शिक्षणपद्धतीत मिळतं ते काही ज्ञान नव्हे; ज्ञानप्राप्ती आम्हाला आपोआप ध्यानमग्न स्थितीत (म्हणजे रोजच्या वामकुक्षीत) होत असते!

…………………………………….

२. काँग्रेस पक्षाने देशाचा मूड जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार आता देशभरात लोकसभेची निवडणूक झाल्यास काँग्रेसला ५४५ पैकी २०० जागा मिळतील. दिल्ली आणि नोएडा परिसरात फोनवरून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अतिशय आनंदित झाल्याचं वृत्त आहे.

दिल्ली आणि नोएडा परिसरातल्या काही लोकांना फोन करून देशाचा अंदाज निघतो? त्यापेक्षा एक, अकबर रोडवर सर्वेक्षण केलं असतं, तर बहुमत मिळालं असतं… पण, दुर्दैवानं आता निवडणूक घेतली जाईल, असं काहीच चिन्ह नाही. मग या सर्व्हेची सुरळी करावी का? तिच्या एका टोकाला डोळा लावला की, दुसऱ्या टोकातून माणसं न्याहाळायला खूप मजा येते… राहुल गांधी त्यानेही आनंदतील.

…………………………………….

३. नोटाबंदी, किरण रिजीजू आणि ऑगस्टा वेस्टलँड वगैरे प्रकरणांवरून गोंधळ घालून संसदेचं कामकाज सतत तहकूब केलं जात असल्याने अतिशय व्यथित झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी ‘आता संसद-सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा असं वाटतं,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

अडवाणी असं म्हणाले म्हटल्याबरोब्बर किमान भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी तरी चिडिचुप्प होऊन त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखायला हवा होता. निवृत्त भीष्म पितामहांच्या उद्विग्नतेला त्यांच्या पक्षातच किंमत मिळत नसेल, तर काँग्रेस वगैरेंकडून काय अपेक्षा करणार? विरोधी पक्ष म्हणून भाजप गोंधळ घालत होता, तेव्हा कुठे गेला होता लालकृष्णांचा उद्वेग, असा औद्धत्यपूर्ण प्रश्नच ते विचारणार, हो ना?

…………………………………….

३. आधीचे विरोधक (म्हणजे भाजप) भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी सरकारविरोधात एकत्र यायचं. मात्र आता विरोधक भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात एकत्र येत आहेत. काँग्रेससाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष महत्त्वाचा आहे. मात्र भाजपसाठी देशहित महत्त्वाचं आहे. : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काही म्हणा, मोदींच्या धाडसाला दाद द्यायला हवी. आपण रोज श्वास घेतो, तोही देशहितासाठीच, असं स्वत:चंच कंडिशनिंग त्यांनी इतकं उत्तम करून घेतलंय की, आपल्या घोडचुकाही देशासाठी केलेला महान त्याग वगैरे आहे, असं त्यांना वाटतं आणि तेच इतरांना का वाटत नाही, याबद्दल त्यांना अगदी मनोमन, खरंखुरं आश्चर्य वाटतं.

…………………………………….

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं जाहीरपणे समर्थन करणारे एकमेव प्रमुख विरोधी नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ३० डिसेंबरपर्यंत वाट पाहून त्यानंतर संपूर्ण परिस्थितीचं विश्लेषण करू; या समर्थनाला एक्सपायरी डेटही असेल, असं सांगून भाजपला बिहारी दणका दिला आहे.

नोटाबंदीचा निर्णय आपल्या खास एकतर्फी आक्रमकतेनं आणि घाईनं लादून देशभर हसं करून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिच्या अंमलबजावणीचा तेवढ्याच घाईघाईनं विरोध करून 'देशद्रोही' आक्रोशकर्ते ठरलेले विरोधक, या दोहोंना एकाच डावात धोबीपछाड केलं की नितीशबाबूंनी!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......