टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मनमोहन सिंग, उर्जित पटेल, पतंजली, दारूबंदी आणि उज्ज्वल निकम
  • Fri , 16 December 2016
  • विनोदनामा टपल्या मनमोहन सिंग Manmohan Singh उर्जित पटेल Urjit Patel उज्ज्वल निकम Ujjwal Nikam पतंजली Patanjali

१. नोटाबंदीवरून केंद्र सरकारला संसदेत धारेवर धरणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची शाळा घेणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामागील कारणे आणि या निर्णयामागील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी एका संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिंग यांचा समावेश असलेल्या या समितीसमोर उपस्थित राहण्याच्या सूचना पटेल यांना देण्यात आल्या आहेत.

'आसं कसं? मी एवढं काम करणार? पगार एवढाच. मग निदान माझी सही तरी नको का नव्या नोटांवर? काहीतरी मोठं काम पाहिजे की नाही नावावर? मोदीसाहेबांची कारकीर्द काही ना काही कारणाने पुढच्या सात पिढ्यांच्या लक्षात राहायला नको का?' असं लिहिलेल्या कागदाचा एक बोळा रिझर्व्ह बँकेखालच्या खिडकीखाली सापडला आहे. पाठांतर करून फेकला गेला असावा, असा कयास आहे.

……………………………..

२. राष्ट्रीय आणि राज्य द्रुतगती मार्गांवरील मद्यविक्री करणारी सर्व दुकाने रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मद्यधुंद वाहन चालकांकडून होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी या पार्श्वभूमीवर हा निकाल घेतला गेला आहे.

केंद्रातल्या सरकारप्रमाणे सर्वोच्च न्यायालयालाही भव्यदिव्य आणि तद्दन निरुपयोगी टोकनबाजी करण्याचा मोह आवरत नाही की काय? राष्ट्रीय महामार्गालगतची दुकानं बंद केली, तर लोक दारू प्यायचे थांबतील, ही अपेक्षा 'रामायण' मालिका बघून लोक रामाचे अवतार बनतील, याइतकीच फोल नाही का? लोक आता गाडीतच 'व्यवस्था' करतील, महामार्गांवरच्या 'व्यवस्था' महागतील, पोलिसांचे हप्ते वाढतील. कोणत्याही ठिकाणची दारूबंदी ही दारू महाग करणे, दारूत भेसळ होणे आणि बेकायदा दारूविक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून शासनयंत्रणा आणि राजकारणी पोसले जाणे, यापलीकडे काही साधत नाही. दारूबद्दलचा मद्दड आकस काढून टाकून जबाबदारीने मद्यपान करायला शिकवण्यापलीकडे आणि त्यावर कसोशीने लक्ष ठेवण्यापलीकडे कोणताही उपाय फजूल आहे.

……………………………..

३. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासीन भटकळ चौकशीच्या काळात तपास यंत्रणांना भयंकर मनस्ताप द्यायचा. त्यांना माहिती देण्यासाठी तो कधीही मसाला डोसा आणि खरबूज यांची मागणी करायचा, असं चौकशी करणाऱ्या पथकातल्या एका अधिकाऱ्याने एका न्यूज पोर्टलला सांगितलं.

अरे देवा, मग ती उज्ज्वल निकमांची बिर्याणी निवून जात असेल ना? रोजच्या रोज इतकं अन्न फुकट घालवायचं म्हणजे केवढा अपव्यय जनतेच्या पैशाचा. पण, चौकशी अधिकारी आणि पोलिस काही वाया जाऊ देत असतील, असं वाटत नाही.

……………………………..

४. फसव्या जाहिराती करणं आणि दुसऱ्यांच्या उत्पादनांवर आपलं लेबल लावून ग्राहकांची फसवणूक करणं, या कलमांखाली पतंजली आयुर्वेद लिमिटेडला न्यायालयाने पतंजली दंड ठोठावला आहे. त्यांचं मध, मीठ, मोहरीचे तेल, जॅम आणि बेसन ही उत्पादनं निकृष्ट दर्जाची असल्याचंही चाचणीमध्ये स्पष्ट झालं आहे.

अहो, एका भगव्या संन्याशाने गुरूच्या आश्रमात राहून स्वदेशी उद्योगाची उलाढाल पाच हजार कोटींवर नेली, याचं काही कौतुकच नाही न्यायालयाला! ती या वर्षात दुप्पट करून दहा हजार कोटींवर न्यायची आहे त्यांना. हे उद्योगवृद्धीचे 'स्वदेशी' मार्ग आहेत. त्यांचं कौतुकच करायचं असतं, असा एक ठरावच पास करायला पाहिजे संसदेत, म्हणजे न्यायालयांची टिवटिव थांबेल.

……………………………..

५. आर्मेनियामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या चीजला खूप मागणी आहे, अशा सर्वेक्षणावर विश्वास ठेवून एका डेअरी कंपनीनं मोठं कर्ज काढून मोठ्या प्रमाणात ब्लू चीजचं उत्पादन घेतलं आणि शेवटी दिवाळखोरीत निघालेल्या या कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतकेही पैसे न उरल्याने त्यांनी पगाराच्या किंमतीएवढं चीजच कर्मचाऱ्यांच्या हातावर टेकवलं.

सगळ्या जगात या एकाच कंपनीचे कर्मचारी ताठ मानेनं सांगू शकतात की, त्यांच्या कष्टांचं चीज झालं… पण, त्यांच्यावर हेही अतिशय दु:खानं म्हणण्याची वेळ आली आहे.

editor@aksharnama.com 

Post Comment

Nilesh Sindamkar

Sat , 17 December 2016

वाह क्या बात... !!!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......