टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, त्यांची लकी खुर्ची, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार
  • Mon , 12 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis बँक Bank ५००-१००० काँग्रेस Congress

१. ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी असे व्यवहार करणाऱ्यांमधील काहींची नावे लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करून दर महिन्याला त्यांना बक्षीस द्यावे, अशी नीती आयोगाने केंद्र सरकारला सूचना केली आहे.

बक्षीस राहूद्या, आपलेच पैसे काढण्यासाठी बँकेच्या-एटीएमच्या लायनीत पुढचा नंबर, कॅश विथड्रॉल लिमिटमध्ये थोडी वाढ, दोन हजाराच्या किरकोळ कामांसाठी निरुपयोगी नोटांऐवजी पन्नास-शंभर-पाचशेच्या नोटांमध्ये रक्कम दिली जाणं, असं काही ठोस उपयोगाचं प्रोत्साहन मिळेल काय?

…………………..

२. काँग्रेस व राष्ट्रवादी यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत करून हजार-पाचशेच्या नोटेप्रमाणे त्यांना कायमचे बाद करा : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निवडणूक सभेत आवाहन

त्यांचे हजार-पाचशे बाद करा आणि यांची दोन हजाराची रंग उडवत फिरणारी, गरिबाच्या रोजच्या कामासाठी बिनकामाची गुलछबू गुलाबो गळ्यात बांधून घ्या. त्यांनी भिकेला लावलं असेल, तर हे 'रांगेला' लावतात!

…………………..

३. निश्चलनीकरणाबाबत लोकसभेत बोलण्यास तयार असूनही विरोधक बोलू देत नसल्याने ‘जनसभे’त बोलणे भाग पडते : नरेंद्र मोदी

तुम्ही असं करा. ऑफिसातून बाहेर पडून कोणालाही संसद कुठे आहे, ते विचारा. लोक दाखवतील, माहितीये सगळ्यांना ती कुठे आहे ती. तिथे पोहोचल्यावर गेटवरचे लोक सोडतील तुम्हाला आत… टीव्हीवर रोज पाहतात ते तुम्हाला, ओळखतात चेहऱ्याने. आत गेलात की लोकसभा कुठे आहे ते विचारा. तिथे पोहोचलात की पंतप्रधानांचं आसन विचारा. तिथे जाऊन बसा तरी आधी. मग बोलायलाही मिळेल योग्य वेळी. सगळीकडे आपल्या मनात आलं की लगेच बोललं असं होत नाही लोकशाहीत. अवघडंय कळणं तुम्हाला. पण जमेल हळूहळू.

…………………..

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'लकी' मानली जाणारी खुर्ची कानपूरमध्ये प्रचारसभेत त्यांना बसायला दिली जाणार आहे. मोदींनी पंतप्रधान होण्याआधी सर्वांत पहिली विजय शंखनाद रॅली १९ ऑक्टोबर २०१३ रोजी कानपूरमध्ये केली होती. तेव्हा ते या खुर्चीवर बसले होते. भाजपचे त्यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७१ जागा जिंकल्या. तेव्हापासून ही खुर्ची मोदींसाठी लकी समजली जाते.

खुद्द मोदींना याची कल्पना असेल, असं वाटत नाही. कारण, मोदी एखाद्या खुर्चीवर बसले, तर ते त्या खुर्चीसाठी लकी ठरतं, अशीच त्यांची आणि त्यांच्या भक्तगणांची समजूत असल्याचं दिसतं.

…………………..

५. जनतेच्या पैशांवर माज करण्याचे दिवस संपले. आम्हाला जनतेच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत; नेत्यांच्या नाहीत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन्ही मुद्दे अगदी बरोबर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हजार-पाचशेच्या नोटांमधून मतदारांचे सगळे कर भरून त्यांच्या तिजोऱ्या भरण्याची सुरुवात पक्षाने, माज न करता, केलीच आहे. शिवाय, लोकांचे पैसे गोळा करून बँकांना ज्या थकबाकीदार उद्योगपतींच्या कर्जबुडवेपणाच्या फटक्यातून मुक्त केलं जातंय, ते पक्षाचे, पक्षप्रमुखांचे, नेत्यांचे लाडके मित्र असले तरी ते काही पक्षाचे नेते नाहीत.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......