टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, त्यांची लकी खुर्ची, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार
  • Mon , 12 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis बँक Bank ५००-१००० काँग्रेस Congress

१. ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी असे व्यवहार करणाऱ्यांमधील काहींची नावे लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करून दर महिन्याला त्यांना बक्षीस द्यावे, अशी नीती आयोगाने केंद्र सरकारला सूचना केली आहे.

बक्षीस राहूद्या, आपलेच पैसे काढण्यासाठी बँकेच्या-एटीएमच्या लायनीत पुढचा नंबर, कॅश विथड्रॉल लिमिटमध्ये थोडी वाढ, दोन हजाराच्या किरकोळ कामांसाठी निरुपयोगी नोटांऐवजी पन्नास-शंभर-पाचशेच्या नोटांमध्ये रक्कम दिली जाणं, असं काही ठोस उपयोगाचं प्रोत्साहन मिळेल काय?

…………………..

२. काँग्रेस व राष्ट्रवादी यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत करून हजार-पाचशेच्या नोटेप्रमाणे त्यांना कायमचे बाद करा : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निवडणूक सभेत आवाहन

त्यांचे हजार-पाचशे बाद करा आणि यांची दोन हजाराची रंग उडवत फिरणारी, गरिबाच्या रोजच्या कामासाठी बिनकामाची गुलछबू गुलाबो गळ्यात बांधून घ्या. त्यांनी भिकेला लावलं असेल, तर हे 'रांगेला' लावतात!

…………………..

३. निश्चलनीकरणाबाबत लोकसभेत बोलण्यास तयार असूनही विरोधक बोलू देत नसल्याने ‘जनसभे’त बोलणे भाग पडते : नरेंद्र मोदी

तुम्ही असं करा. ऑफिसातून बाहेर पडून कोणालाही संसद कुठे आहे, ते विचारा. लोक दाखवतील, माहितीये सगळ्यांना ती कुठे आहे ती. तिथे पोहोचल्यावर गेटवरचे लोक सोडतील तुम्हाला आत… टीव्हीवर रोज पाहतात ते तुम्हाला, ओळखतात चेहऱ्याने. आत गेलात की लोकसभा कुठे आहे ते विचारा. तिथे पोहोचलात की पंतप्रधानांचं आसन विचारा. तिथे जाऊन बसा तरी आधी. मग बोलायलाही मिळेल योग्य वेळी. सगळीकडे आपल्या मनात आलं की लगेच बोललं असं होत नाही लोकशाहीत. अवघडंय कळणं तुम्हाला. पण जमेल हळूहळू.

…………………..

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'लकी' मानली जाणारी खुर्ची कानपूरमध्ये प्रचारसभेत त्यांना बसायला दिली जाणार आहे. मोदींनी पंतप्रधान होण्याआधी सर्वांत पहिली विजय शंखनाद रॅली १९ ऑक्टोबर २०१३ रोजी कानपूरमध्ये केली होती. तेव्हा ते या खुर्चीवर बसले होते. भाजपचे त्यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७१ जागा जिंकल्या. तेव्हापासून ही खुर्ची मोदींसाठी लकी समजली जाते.

खुद्द मोदींना याची कल्पना असेल, असं वाटत नाही. कारण, मोदी एखाद्या खुर्चीवर बसले, तर ते त्या खुर्चीसाठी लकी ठरतं, अशीच त्यांची आणि त्यांच्या भक्तगणांची समजूत असल्याचं दिसतं.

…………………..

५. जनतेच्या पैशांवर माज करण्याचे दिवस संपले. आम्हाला जनतेच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत; नेत्यांच्या नाहीत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन्ही मुद्दे अगदी बरोबर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हजार-पाचशेच्या नोटांमधून मतदारांचे सगळे कर भरून त्यांच्या तिजोऱ्या भरण्याची सुरुवात पक्षाने, माज न करता, केलीच आहे. शिवाय, लोकांचे पैसे गोळा करून बँकांना ज्या थकबाकीदार उद्योगपतींच्या कर्जबुडवेपणाच्या फटक्यातून मुक्त केलं जातंय, ते पक्षाचे, पक्षप्रमुखांचे, नेत्यांचे लाडके मित्र असले तरी ते काही पक्षाचे नेते नाहीत.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......