माझ्या कर्कश आवाजाला हिटलर जबाबदार आहे!
पडघम - विदेशनामा
जॉन इझबिकी
  • जॉन इझबिकी आणि त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 12 November 2018
  • पडघम विदेशनामा जॉन इझबिकी John Izbicki द नाईट ऑफ द ब्रोकन ग्लास The Night of Broken Glass लाइफ बिटवीन द लाईन्स Life Between the Lines

८ ते १० नोव्हेंबर १९३८ या तीन दिवसांत जर्मनीत शंभरच्यावर ज्यू नागरिकांची जमावाने हत्या केली. सात हजार ज्यूंचे उद्योगधंदे आणि दुकानं आणि एक हजार सिनेगॉग (ज्यू प्रार्थना मंदिरं) नष्ट करण्यात आली. तीस हजार ज्यू नागरिकांना अटक करून त्यांना छळछावण्यात पाठवण्यात आलं. जर्मनीसोबत ऑस्ट्रिया, पोलंड आणि झेक रिपब्लिकचे काही भाग या सरकारप्रणीत हिंसेत सामील झाले होते. हे देशहिटलरच्या अधिपत्याखाली होते. या तीन दिवसांना ‘द नाईट ऑफ द ब्रोकन ग्लास’ (भंगलेल्या काचांच्या रात्री) असंही म्हटलं जातं.

या तीन दिवसांत जॉन इझबिकी या आठ वर्षाच्या मुलाच्या आई-वडिलांच्या दुकानावर हल्ला झाला. इझबिकी कुटुंबानं तत्काळ अमेरिकेत स्थलांतर केलं. हे कुटुंब अमेरिकेला पोचलं हा चमत्कार मानला पाहिजे, कारण त्या काळात कोणतीही ज्यू व्यक्ती नाझी यंत्रणेच्या कचाट्यातून सुटणं अशक्यप्राय होतं. ज्यूंचा निर्वंश करण्याचं ‘फायनल सोल्युशन’ नाझी सरकारनं ‘शोधून’ काढलं होतं.

पुढे जॉन इझबिकी मोठे प्रत्रकार आणि लेखक म्हणून नावारूपाला आले. ‘लाइफ बिटवीन द लाईन्स’ या पुस्तकांत त्यांच्या नाझी जर्मनीच्या हिंसेच्या, सरकारधार्जिण्या नागरिकांच्या आणि नाझी पार्टीत असूनही ज्यूंना मदत करणाऱ्या शुल्त्झसारख्या जर्मनांच्याही आठवणी आहेत.

इझबिकी यांच्या आठव्या वाढदिवसानंतरच्या तिसऱ्या दिवशी ज्यू हॉलोकॉस्ट आणि दहा महिन्यांनी दुसरं महायुद्ध सुरू झालं. 

या पुस्तकाला हा संपादित अंश.

- अलका गाडगीळ

.............................................................................................................................................

८ नोव्हेंबर १९३८ बर्लिन

माझा आठवा वाढदिवस. माझ्या आई-बाबांनी माझ्यासाठी सुंदरसं घड्याळ आणलं होतं, मनगटावर लावण्याचं. छानंच होतं ते, पण फरक इतकाच की आई-बाबा मला नेहमी खेळातल्या वस्तू द्यायचे. उदाहरणार्थ तीन चाकी लाल सायकल किंवा पंच अ‍ॅन्ड ज्यूडी शो. अशा अद्भूत गिफ्ट मला मिळायच्या. तीन चाकी सायकलवर बसून मी जवळच्या पार्कमध्ये जात असे.

पण घड्याळासोबत मात्र मी खेळू शकलो नाही. माझी निराशा आई-बाबांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ‘वाईट वाटून घेऊ नकोस होर्स्ट, पुढच्या वर्षी आपण तुला भारी गिफ्ट घेऊ’. मी चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवत म्हंटलं ‘थँक्यू पापा’.

माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या घरावर थाप पडली. सात वाजले होते. मुट्टीने (आई) दार उघडलं. दरवाज्यात हेअर (श्री) शुल्त्झ उभा होता. आमच्या विभागाचा तो जवळजवळ प्रमुख असल्यासारखाच होता. त्याच्या युनिफॉर्मवर ‘नॅशनल सोशालिस्ट’ (एस्ए) पार्टीचा बिल्ला होता.

‘शुल्त्झ अरे आत ये ना कॉफी घेऊया’. शुल्त्झचा आवाज ऐकून बाबाही दरवाज्याजवळ आले. ‘नको नको फ्राउ इझबिकी मला अजिबात वेळ नाहीए’. नंतर तो जरासा आत आला आणि दबक्या आवाजात म्हणाला, ‘मी तुम्हाला सांगायला आलोय. तुमच्या दुकानावर आज रात्री सात वाजता हल्ला होणारे. मी काही बोल्लो नाही आणि तुम्ही काही ऐकलं नाही. समजलं?’

‘अरे हो, काळजी करू नको’, असं बाबा म्हणत असतानाच तो धाडधाड पायऱ्या उतरत निघूनही गेला.

आई-बाबांना धक्का बसला होता. कोणीच काही बोलत नव्हतं. त्यांनी शांतपणे कॉफी प्यायली आणि पुढं काय करायचं याची चर्चा सुरू झाली.

आमचं दुकान आमच्या घराच्या पुढच्या चौथ्या इमारतीत होतं. स्वेटर स्टॉकिंग्ज आणि बायकांच्या आणि मुलांच्या अंतर्वस्त्रांनी दुकान काठोकाठ भरलेलं होतं. आठ वाजता दुकान उघडलं जायचं.

बाबांनी ठरलेल्या वेळेवर दुकान उघडलं. आई आणि मीही त्यांच्यासोबत होतो. एरवी बाबा एकटेच जायचे. दर्शनी भागात ठेवलेला माल आम्ही मागच्या खोलीत ठेवायला सुरुवात केली. नंतर आईनं मला परत पाठवलं आणि ती दुकानात बाबांच्या मदतीसाठी थांबली. आई-बाबांना आपला माल वाचवायचा होता. ते तो कसा वाचवणार होते कोण जाणे!

शुल्त्झ नाझी स्वयंसेवक असला तरी आस्थेवाईक होता. त्यानं इशारा दिलेला होता. आई-बाबा त्याचे मनोमन आभार मानत होते. आम्हाला पुढे काय वाढून ठेवलंय याची सूचला मिळाली होती. हे सगळं स्पष्टपणे समजण्याचं माझं वय नसलं तरी ते मला कळत होतं. वातावरणात ज्यू द्वेष भरला होता.

दुपारचं जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ झोप काढत असे. काचांच्या फुटण्याच्या आवाजानं त्या दिवशी मला जाग आली. समोरच्या चामड्याच्या दुकानावर दगडफेक होत होती. दुकानाचा चक्काचूर झाला. दगड विटा आणि काचांच्या राशीवर ‘जे’चं चिन्ह विराजलं होतं. जे म्हणजे ज्यू. सर्व ज्यू दुकानादारांना ‘जे’ चिन्ह लावणं सक्तीचं करण्यात आलं होतं.

थोड्या वेळानंतर तिथं एक वृद्ध बाई आली. सगळीकडे पाहात ती ओरडली, ‘ज्यूंच्या व्यापारांवर बंदी आणली पाहिजे. त्यांना मारून टाकलं पाहिजे. त्यामुळे जर्मनी स्वच्छ होईल’. तिचा आवाज एवढा वाढत गेला की, एका पातळ तारेवर कसाबसा लटकत असलेला काचेचा तुकडा नेमका त्या वृद्धेच्या डोक्यावर पडला. तो घाव एवढा जबर होता की, ती तत्काळ गतप्राण झाली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजीकडे पाहून मला वाईट वाटलं तरी देव दुष्टांना शिक्षा देतो यावर माझा विश्वास बसला.

बर्लिनमधल्या ‘इव्हालिदेन स्ट्रास’ या आमच्या विभागाचं वर्णन मला करू द्या. लंडनच्या बॉन्ड स्ट्रीटसारखाच हा भाग आहे. नॉर्ड बानोफ आणि जनरल पोस्ट ऑफिस स्टेशनला जोडणारी रेल्वेगाडी आमच्या रस्यावरून जायची. इथं खूप हॉटेलं तर होतीच, शिवाय रस्ता जिथं संपतो तिथं विद्यापीठाची हद्द सुरू होते. त्यामुळे खूप वर्दळ असलेला हा रस्ता.

आमचं दुकान पोस्ट ऑफिसच्या शेजारीच होतं. लोकरीचे कपडे मिळत असल्यामुळे नॉर्ड बानोफला जाणारे स्कॅन्डिनेव्हियन पर्यटक आमच्या दुकानात खरेदी करायचे.

शुल्त्झनं सांगितल्याप्रमाणे हिटलर युथ आणि एसए पलटणी तिथं हजर झाल्या. बघे तर प्रचंड संख्येनं आले होते.

हिटलर युथनं आमच्या दुकानावर दगडफेक करायला सुरुवात केली. पण काचा तुटल्याच नाहीत. बघे हसायला लागले. त्यांनी या पायदळाची ‘हुर्यो’ केल्यामुळे त्यांनी आपला मोहरा मांसाच्या दुकानाकडे वळवला. दुकानाच्या मालकाने विचारलं- ‘काय हवंय तुम्हाला?’

‘तुझ्या पहिलवानांना सांग यिदच्या दुकानाची काचेची खिडकी फोडायला’, फलटणीचा प्रमुख गरजला.

‘ते होण्यातलं नाही’, मांसाच्या दुकानाच्या मालकानं उत्तर दिलं. क्षणार्धात जमावानं त्याला खाली पाडून ठेचायला सुरूवात केली. त्याच्या दुकानातली वजनं आमच्या अर्धगोल आकाराच्या शोकेसवर फेकली. त्या सुंदर शोकेसचा चक्काचूर झाला. मी आमच्या बाल्कनीतून सगळं पाहात होतो आणि जोरजोरात किंचाळत होतो.

नंतर रहिटलर युथनं आमच्या दुकानावर काचांचे असंख्य तुकडे फेकले. दुकानात असलेले माझे आई-बाबा मरून गेले असणार या विचारानं मला वेडं केलं. माझी आजी ओमा माझ्याबरोबर होती. ओरडून ओरडून माझा आवाज कर्कश्श झाला. तिनं मला घट्ट धरून ठेवलं. नंतर मला झोप लागली आणि सकाळी डोळे उघडले तेव्हा माझे आई-बाबा माझ्या पलंगाच्या टोकाशी बसले होते. त्यांना मिठी मारून मी पुन्हा जोरजोरात रडू लागलो, ओरडू लागलो.

माझ्या स्वरातला कर्कश्शपणा नंतर गेलाच नाही, तो अजूनही आहे. हिटलरकडून मला मिळालेली ती भेट आहे असं मी मानतो.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......