मी खरंच दु:खी झालो आहे. थकलो आहे. हतबल आणि अगतिक झालो आहे. माझ्यापुढे दुसरा अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.
पडघम - साहित्यिक
दिनकर मनवर
  • दिनकर मनवर यांचा कवितासंग्रह
  • Tue , 09 October 2018
  • पडघम साहित्यिक दिनकर मनवर Dinkar Manvar पाणी कसं अस्तं दृश्य नसलेल्या दृश्यात

कवी-चित्रकार दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेवरून गेले काही दिवस जो वाद-विवाद सुरू होता, त्याबाबत दिनकर मनवर यांचं निवेदन.

.............................................................................................................................................

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागलेल्या माझ्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेत पाण्याच्या रंगांसाठी वेगवेगळ्या प्रतिमांचा उपयोग केलेला आहे. त्यातील एका प्रतिमेमुळे एका समाजगटाच्या भावना दुखावल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याविषयी मी कवी या नात्याने निःसंदिग्धपणे स्पष्ट करू इच्छितो की, ती विशिष्ट ओळ लिहिताना तसेच लिहिण्याआधी आणि लिहिल्यानंतरही माझ्या मनात कुणाच्याही भावनांशी खेळण्याचा किंवा कोणत्याही स्त्रीवर्गाची अवहेलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता व नाही.

मी स्वतः आणि माझ्या कवितेचा आवाजही कायम ‘नाही रे’ वर्गाच्या, शोषितांच्या, पिडितांच्या बाजूने व्यक्त होणारा आहे. समाजातल्या सर्व विषमतांविषयी बोलण्याचे आणि बंधुभावयुक्त अशा व्यापक मानवतेचे स्वप्न पाहण्याचे एक माध्यम म्हणून मी कवितेकडे पाहतो. त्यामुळे आपल्या लिखाणातील एखाद्या ओळीमुळे आपलीच माणसे दुखावली जावीत, याचा मलाही खूप त्रास होत आहे. कवी म्हणून माझी ही भावना आपण समजून घ्याल अशी मी प्रार्थना करतो.

‘पाणी कसं असतं’ या कवितेबाबत मी नम्रपणे हे सांगू इच्छितो की, येथे ‘पाणी’ ह्या प्रतिमेचा वापर जगण्याच्या वेदनांविषयी आहे. शोषणाने नियंत्रित केलेल्या व्यवस्थेवर भाष्य करताना पाणी प्रतिमेचा वर्णनात्मक, उपमा, प्रतिक म्हणून वापर केलेला आहे. एका ओळीत “अंगठा छाटल्यावर उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसारखं लाल पाणी” हे महाभारतातल्या आदिवासी नायकाची – एकलव्याची आठवण करून देण्यासाठी योजलेले आहे. “आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं पाणी” या ओळीत आदिवासी समाजाचं निर्मळ, निष्पाप, निष्कपट आणि नैसर्गिक आणि शोषणाचे निर्बंध नाकारणारं मुक्त जगणं याचं प्रतीक म्हणून वापरलेलं आहे. पाणी कसं असावं याचे अंदाज या कवितेत बांधले आहेत आणि या अंदाज बांधण्याचाच एक भाग म्हणून, कल्पना करण्याचा भाग म्हणून, ही ओळ आलेली आहे. इथे स्तन हे सृजनाचे प्रतीक आणि जांभळा रंग हा पहाडी कणखरपणा, खणखणीत अव्वल दर्जाची निर्मळता याचे प्रतीक म्हणून मनात आलेले आहेत. यातून कोणत्याही प्रकारची लैंगिकता, किंवा भावना चाळवण्याची, अवहेलनेची-उपमर्दाची कृती किंवा लैंगिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आदी कोणत्याही गैरवर्तन/दुर्वतनाचे सूचन दुरान्वयानेही झालेले नाही. मात्र दुर्दैवाने या कवितेचे अर्थनिर्णयन अस्मितेच्या राजकारणातून झाल्याने पूर्णपणे चुकीच्या दिशेने गेले आहे.

व्यवस्थेने धर्म आणि संस्कृतीच्या आडोशाने भूमी,जंगल, हवा,पाणी या निसर्गदत्त देणग्यांवर सत्ता प्रस्तापित केली आहे. परिणामतः ‘पाणी’ या निसर्गदत्त घटकापासून एका मोठ्या समूहाला वंचित ठेवण्यात आले आहे. हा आशय ह्या कवितेचा प्रधान आशय आहे. राहिला प्रश्न प्रस्तृत ओळीचा तर या ओळीत पाण्याची जी मंगलमय रूप आहेत त्यात आकाशासारखं निळंशार, पाथरवटाच्या श्रमासारखं काळंभोर, तर ‘आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं’ असं म्हणताना या ओळीतील प्रतिमा लक्षात घेणे गरजेचे आहे. ‘आदिवासी’ हा संबोध मी येथील मूळचे रहिवाशी या अर्थाने वापरला आहे. जात वा जातीवाचक अर्थाने वापरला असता तर तो गौंड, भिल्ल, ठाकर या सारख्या संबोंधनांनी सूचित केला असता. इथे ‘आदिवासी स्त्री’ ही या विश्वाची आदिमाया आहे व तिचे स्तन हे डोंगर आहेत. या स्तनातून म्हणजे डोंगरातून प्रवाहित होणारे पाणी हे जीवणदायीच आहे. निळ्या आकाशाखालील काळ्या डोंगराचा हा रंग जांभळाच आहे. परिणामतः हा आदिमायेच्या स्तनाचाच रंग आहे असे मला अभिप्रेत आहे. ही आदिवासी स्त्री जात संबोधातून विचारात घेतली जात असल्याने या ओळीचा वा कवितेचा चुकीचा अर्थ लावण्यात येत आहे, जो कवी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून अपेक्षित नाही.

‘पाणी’ या आशयसूत्राला धरून मी आणखीही काही कविता लिहिल्या असून त्यांचा संबंधही शोषणमुक्त संस्कृतीच्या शोधाशी आहे. या सर्व कविता एकमेकींच्या संदर्भात वाचायच्या आहेत. ज्यांनी कविता शिकवायची आणि समाजाला समजावून सांगायची त्यांनीच जर गैरसमजाच्या आहारी जाउन तिचा गैर अर्थ लावला तर ते फारच खेदकारक आणि वैषम्य वाटणारे ठरेल.

माझ्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या संग्रहातील ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेतील एका ओळीमुळे माझ्या बांधवाच्या आणि भगिनींना मानसिक क्लेष झाला. माझा काही हेतू नसताना या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्यात याचे मला अतिशय दुःख झाले. मी मनापासून माफी मागतो.

अभ्यासक्रमातून या कवितासंग्रहातील ती विशिष्ट कविता वगळलेली आहे. माझी विद्यापीठाला विनंती आहे की, माझा हा कवितासंग्रह अभ्यासक्रमातून वगळावा.

मला कल्पना आहे की, जे सगळे तरूण कवी, लेखक, अभ्यासक आणि समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लिहिणारे/वाचणारे या काळात माझ्या मागे धीरोदात्तपणे उभे राहिले, त्यांचाही मी मनापासून माफी मागतो.

मी खरंच दु:खी झालो आहे. थकलो आहे. हतबल आणि अगतिक झालो आहे. माझ्यापुढे दुसरा अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.

मी समजून उमजून हा निर्णय घेतला आहे.

तुम्ही सगळे सर्वज्ञ आहात. समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.

शेवटी कवी या नात्याने मी एवढीच कळकळीची विनंती करेन की, आपण सर्वांनी या कवितेचा चांगला स्वच्छ नजरेने, पूर्वग्रहविरहीत अर्थ लावून तो समाजापुढे ठेवावा आणि हा वाद मिटवावा.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Ajinkya Koliwa

Tue , 09 October 2018

' आदिवासी पोरींच्या स्तनासारखा ' शब्द आल्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतो मान्य. पण संपूर्ण कविताच अभ्यासक्रमातून काढण्याची गरज नक्कीच नव्हती. आदिवासी समाजातील काही सुशिक्षित काही अर्धवट शिक्षित अडाण$%मुळे कविता काढून टाकण्याची वेळ आली याबद्दल माफी. _/\_ -एक आदिवासी तरूण.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......