असे चित्र महाराष्ट्राला शोभा देणारे नक्कीच नाही
पडघम - साहित्यिक
मुख्यमंत्र्यांना मराठी साहित्यिकांचे पत्र
  • दिनकर मनवर यांचा कवितासंग्रह
  • Tue , 09 October 2018
  • पडघम साहित्यिक दिनकर मनवर Dinkar Manvar पाणी कसं अस्तं दृश्य नसलेल्या दृश्यात

प्रति,

माननीय श्री० देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई

विषय – दिनकर मनवर यांच्या कवितेवरून निर्माण केला गेलेला विद्वेष व वाद मिटवण्याबाबत 

माननीय महोदय

स० न० वि० वि०

मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेतील एका ओळीचा चुकीचा अर्थ लावून काही तथाकथित आदिवासी संघटना व विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग आणि कवी दिनकर मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्लाघ्य धमक्या, त्यांच्या विरोधातली दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी, या गोष्टी आम्हाला अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात. कवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकवण्याच्या या कृती कवीच्या लेखन व नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहेत.  

कवी-लेखकाला केवळ तत्कालिक पोलिस संरक्षण देऊन या प्रश्नाची जटीलता तात्पुरती कमी करता आली तरी लेखक पहाऱ्यात आणि त्यांना धमकवणारे मात्र मोकाट, असे चित्र महाराष्ट्राला शोभा देणारे नक्कीच नाही असे आम्हाला वाटते.

आम्ही, महाराष्टातील जबाबदार साहित्यिक या नात्याने आपणांस विनंती करतो की, या परिस्थितीत हस्तक्षेप करून लेखक-कवींचे धोक्यात येऊ पाहाणारे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य जपावे. कवी दिनकर मनवर यांच्या कवितेसंदर्भात निर्माण झालेला हा वाद मिटवावा आणि समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी आमची अपेक्षा आहे.

प्रतिसादाच्या आणि कार्यवाहीच्या अपेक्षेत.

आपले नम्र

रामदास भटकळ, निशिकांत ठकार, रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, हरिश्चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, हेमंत दिवटे, जयंत पवार, येशू पाटील, मंगेश नारायणराव काळे, दा० गो० काळे, प्रवीण बांदेकर, गणेश विसपुते, प्रफुल्ल शिलेदार, संतोष पद्माकर पवार, प्रज्ञा दया पवार, निरजा, सुमती लांडे, अभय सरदेसाई, दा. गो. काळे, अविनाश गायकवाड, बाबा भांड, इग्नेशियस डायस, श्रीकांत साहेबराव देशमुख, मंगेश बन्सोड, वर्जेश सोळंकी, महेंद्र कदम, नीतीन रिंढे, महेंद्र भवरे, रणधीर शिंदे, रफीक सुरज, अजय कांडर, पी. विठ्ठल, गोविंद काजरेकर, वीरधवल परब, शरयू आसोलकर, रेखा शहाणे, आशुतोष पोतदार, संजीव खांडेकर, चिन्मयी सुमित राघवन, सचिन केतकर, सलील वाघ, मन्या जोशी, दिलीप लाठी, सतीश तांबे, सुधाकर गायधनी, रवींद्र इंगळे-चावरेकर, आसाराम लोमटे, महाश्वेता कुबल, संघजा भुजंग मेश्राम, ज्योत्स्ना राजपूत, नेहा भांडारकर, संघमित्रा खंडारे, रमेश इंगळे-उत्रादकर, दिनकर दाभाडे, अविनाश कोल्हे, अनिल धाकू कांबळी, किशोर कदम (सौमित्र), श्रीधर नांदेडकर, चंद्रकांत बाबर, विजय चोरमारे, रवींद्र लाखे, ना. धों. महानोर, चंद्रकांत पाटील, सतीश काळसेकर, कृष्णा किंबहुने, किरण येले, प्रमोद मुनघाटे, नारायण लाळे, अशोक थोरात, उषा परब, दिपक बोरगावे, निखिलेश चित्रे, उदय रोटे, संकेत म्हात्रे, विनायक येवले, महेश लोंढे, फेलिक्स डिसोजा, मोहन शिरसाट, श्रीधर पवार, महेश लीला पंडित, प्रा. मनोहर, प्रणव सखदेव, सुदाम राठोड, गणेश कनाटे, स्वप्निल शेळके, प्रियंका तुपे, अजित अभंग, मोहन कुंभार, प्रशांत चौगले, अतुल दोडीया, प्रबोध पारिख, प्रशांत वंजारे, नानासाहेब काणे, शरद कुंभार, सचिन चव्हाण, भास्कर पाटील, युवराज चंदुरे, विकास कांबळे, रमेश सावंत, अनिल जाधव, वैभव साटम, प्रदीप पाटील, दत्ता घोलप, मधुकर मातोंडकर, अनिल फराकटे, अशोक बागवे, महेंद्र मुंजाळ, सुनील अभिमान अवचार, रमजान मुल्ला, शेषराव पिराजी धांडे, संध्या शाहपुरे, संजय शिंदे, कुणाल गायकवाड, विलास गावडे, सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत, सिद्धार्थ गोपाळ तांबे, ऋषिकेश देशमुख, जुई कुलकर्णी, कविता ननवरे, प्रिया जामकर, अनुजा जोशी, बाळासाहेब घोंगडे, गणेश वसईकर, संगिता अरबुने, संतोष शेणई, महादेव गोरख कांबळे, प्रज्ञा सुधाकर भोसले, स्वप्नील चव्हाण,नामदेव कोळी, श्यामल गरुड, अस्मिता मापारी, विजय तांबे, प्रेमानंद शिंदे, संध्या दानव, अर्चना डावखरे, विद्या देशमुख, सुनिल तांबे, राजीव जोशी, गितेश शिंदे, जगदिश पाटील, प्रकाश नागोलकर, दयानंद कनकदंडे, अनिल साबळे, अरविंद सुरवाडे, कल्पना दुधाळ, कल्पना मलये, सुनीता डागा, वैशाली नारकर, प्रकाश मोगले, विठ्ठल कदम, प्रकाश तेंडोलकर, राहुल कोसंबी, केशव वाघमारे, वीरा राठोड, अभय दानी, इक्बाल मिन्ने, सुनिल उबाळे, रामप्रसाद वाव्हळ, समाधान इंगळे, रमेश रावळकर, निलेश चव्हाण, रमेश ठोंबरे, धम्मपाल जाधव, कैलास अंभुरे, गणेश घुले, सचिन तायडे, संदिप देशपांडे, सुशीलकुमार शिंदे, जीजा शिंदे , योगिनी सातारकर-पांडे, मोतीराम कटारे, मनोज कुलकर्णी, आश्लेषा महाजन, समीर दळवी, अमृत तेलंग, प्रा. गंगाधर अहिरे, काशिनाथ वेलदोडे, ॲड. अशोक बनसोडे, विजया गायकवाड, एकनाथ गायकवाड, नामदेव गवळी, शालिनी मोहळे, विजय ठाकर, अभिजित देशपांडे, श्रीरंजन आवटे, प्रदीप आवटे, सुनिल हेतकर, योगिनी राऊळ, आल्हाद भावसार, केशव खटींग, विष्णू जोशी, समीर भोळे, दुर्गेश सोनार, कविता मोरवणकर, राजेश कदम, सरीता पवार, संजय गोडघाटे, भगवान निळे, प्रवीण दामले, अनुराधा नेरूरकर, अंजली कुलकर्णी, चित्रा क्षीरसागर, शोभा रोकडे,प्रकाश क्षीरसागर, किशोर काळे, जितेंद्र लाड, मनिष पाटील, शिवाजी काळे, विद्या बयास ठाकूर, देवा झिंजाड, जनार्धन देवरे, किरण काशिनाथ, हेमंत राजाराम, रश्मी कशेळकर, खलील मोमीन, अन्वर मिर्झा, शशिकांत कोळी, मंदाकिनी पाटील, नीलिमा कुलकर्णी, संजिव चांदोरकर, किरण गुरव, राजीव नाईक, सतीश वाघमारे, मुकुंद कुळे, नरसिंग इंगळे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......