फिडेल कॅस्ट्रो - चित्रमय दर्शन
संकीर्ण - फोटोएसे
टीम अक्षरनामा
  • या लेखातील सर्व छायाचित्रं इंटरनेटवरून घेतलेली आहेत.
  • Sun , 27 November 2016
  • फिडेल कॅस्ट्रो Fidel Castro चे गव्हेरा Che Guevara क्युबा Cuba

फिडेल कॅस्ट्रो (१३ ऑगस्ट १९२६ ते २५ नोव्हेंबर २०१६). आजच्या जगातला सर्वाधिक मान्यवर क्रांतिकारिक नेता. विलक्षण धाडसी, कल्पनातीत निर्भय आणि अमाप लोकप्रिय असलेल्या कॅस्ट्रोने सशस्त्र संघर्षाने क्युबाला लष्करी हुकूमशाहीतून मुक्त केले. एवढेच नव्हे तर पुढची ३०-४० वर्षं त्या देशाचे नेतृत्व करून मानवजातीच्या इतिहासात आपले ठसठशीत स्थान कोरून ठेवले. फिडेलने कधीच पराभवापुढे मान तुकवली नाही. सुरुवातीचे संघर्षाचे सर्व प्रयत्न फसून, अनेक साथीदार पकडले जाऊनही फिडेलचा आत्मविश्वास कधी कमी झाला नाही. त्याला साथ देणारे तसे सहकारीही मिळाले. ९० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य उपभोगून तो आता हे जग सोडून गेला आहे. पण तरीही तो जगभरच्या बंडखोर, क्रांतिकारी आणि अस्वस्थ तरुणांना प्रेेरणा देत राहील..

फिडेल कॅस्ट्रो वय वर्षं ३ ते २९

कॅस्ट्रो सिएरा मेस्त्राच्या पहाडी जंगलामध्ये वर्तमानपत्र वाचताना

फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा - जिवाभावाचे मित्र

कॅस्ट्रो सिएरा मेस्त्राच्या पहाडी जंगलामध्ये सहकाऱ्यासमवेत

फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा संचलन करताना

फिडेलच्या कल्पनेने झपाटलेला कॅस्ट्रो आणि त्याच्यावर स्वत:पेक्षाही जास्त विश्वास असलेले त्याचे सहकारी

फिडेल कॅस्ट्रो नोबेल विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वेसोबत, १९६०

फिडेल कॅस्ट्रो बेसबॉल खेळताना, १९६५

फिडेल कॅस्ट्रो शाळकरी मुलांसोबत...तीही त्याच्यासारखीच (खोटी) दाढी लावून त्याला भेटायला आलेली

फिडेल कॅस्ट्रो आणि सोव्हिएत रशियाचे निकिता गोर्बाचेव्ह जॉर्जियामध्ये वाईन पिताना, १९६३

दोन भेदक नजरेचे  योद्धे...समोरासमोर

फिडेल कॅस्ट्रो आणि नेल्सन मंडेला

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......