फिडेल कॅस्ट्रो - चित्रमय दर्शन
संकीर्ण - फोटोएसे
टीम अक्षरनामा
  • या लेखातील सर्व छायाचित्रं इंटरनेटवरून घेतलेली आहेत.
  • Sun , 27 November 2016
  • फिडेल कॅस्ट्रो Fidel Castro चे गव्हेरा Che Guevara क्युबा Cuba

फिडेल कॅस्ट्रो (१३ ऑगस्ट १९२६ ते २५ नोव्हेंबर २०१६). आजच्या जगातला सर्वाधिक मान्यवर क्रांतिकारिक नेता. विलक्षण धाडसी, कल्पनातीत निर्भय आणि अमाप लोकप्रिय असलेल्या कॅस्ट्रोने सशस्त्र संघर्षाने क्युबाला लष्करी हुकूमशाहीतून मुक्त केले. एवढेच नव्हे तर पुढची ३०-४० वर्षं त्या देशाचे नेतृत्व करून मानवजातीच्या इतिहासात आपले ठसठशीत स्थान कोरून ठेवले. फिडेलने कधीच पराभवापुढे मान तुकवली नाही. सुरुवातीचे संघर्षाचे सर्व प्रयत्न फसून, अनेक साथीदार पकडले जाऊनही फिडेलचा आत्मविश्वास कधी कमी झाला नाही. त्याला साथ देणारे तसे सहकारीही मिळाले. ९० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य उपभोगून तो आता हे जग सोडून गेला आहे. पण तरीही तो जगभरच्या बंडखोर, क्रांतिकारी आणि अस्वस्थ तरुणांना प्रेेरणा देत राहील..

फिडेल कॅस्ट्रो वय वर्षं ३ ते २९

कॅस्ट्रो सिएरा मेस्त्राच्या पहाडी जंगलामध्ये वर्तमानपत्र वाचताना

फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा - जिवाभावाचे मित्र

कॅस्ट्रो सिएरा मेस्त्राच्या पहाडी जंगलामध्ये सहकाऱ्यासमवेत

फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा संचलन करताना

फिडेलच्या कल्पनेने झपाटलेला कॅस्ट्रो आणि त्याच्यावर स्वत:पेक्षाही जास्त विश्वास असलेले त्याचे सहकारी

फिडेल कॅस्ट्रो नोबेल विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वेसोबत, १९६०

फिडेल कॅस्ट्रो बेसबॉल खेळताना, १९६५

फिडेल कॅस्ट्रो शाळकरी मुलांसोबत...तीही त्याच्यासारखीच (खोटी) दाढी लावून त्याला भेटायला आलेली

फिडेल कॅस्ट्रो आणि सोव्हिएत रशियाचे निकिता गोर्बाचेव्ह जॉर्जियामध्ये वाईन पिताना, १९६३

दोन भेदक नजरेचे  योद्धे...समोरासमोर

फिडेल कॅस्ट्रो आणि नेल्सन मंडेला

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......