टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रद्द झालेल्या व नव्या नोटा
  • Sat , 26 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya १०० रुपये ५०० रुपये नरेंद्र मोदी Narendra Modi उर्जित पर्टेल Urjit Patel

१. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नगरपालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून १०० रुपयांच्या ‘स्टॅम्प पेपर’वर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. त्यामध्ये उमेदवाराने त्याच्या देवाची, कुलदेवतेची, आई-वडिलांची, जोडीदार व मुलांची शपथ घेऊन भष्ट्राचार करणार नाही, असे लिहून दिले आहे.

नोटाबंदीनंतर असं प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावं लागतं, हेच मुळात आश्चर्य आहे… अहो, एकदा नोटाबंदीची प्रक्रिया पूर्ण झाली की, देशातला आहे तो काळा पैसा संपणार आहे, नवा काळा पैसा कमावण्याची कोणाची हिंमत कशी होणार? तो ठेवणार कसा? सुपरमॅनवर तुमचा विश्वास कसा नाही? आणि एक लक्षात घ्या, ज्या देशात असं प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावं लागतं, जिथे शपथसुद्धा लोक खोटी घेतील म्हणून तिच्यातही देव, कुलदेवता, बायको, मुलं असे ऑप्शन ठेवायला लागतात, त्या देशात असल्या प्रतिज्ञापत्रांना स्टंटबाजीपलीकडे काही अर्थ आहे का?

...............

२. नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर शरसंधान केले असून ‘टोकाची भूमिका घेण्यास मी मागेपुढे बघणार नाही’ असा इशारा दिला आहे.

चला, आतापर्यंत एवढा वेळ गेला, तो मागेपुढे पाहण्यात गेला म्हणायचं तर. मात्र, आता तुम्ही तो दवडणार नाही आणि तात्काळ निर्णय घ्याल, अशी कोणाची समजूत झाली असेल, तर ती मात्र व्यर्थच असेल. कारण, आता तुम्ही डावीउजवीकडे पाहायला सुरुवात कराल आणि ते साधारण पुढची अडीच वर्षं नक्कीच चालेल, हो ना?

...............

३. घाईगडबडीत प्रिंटिंग मिस्टेक झालेल्या ५००च्या नोटा चलनात आल्याने नागरिकांमध्ये खळबळ; मात्र त्या निर्धास्तपणे व्यवहारात वापराव्यात असा रिझर्व्ह बँकेचा सल्ला

आता कोणी डुप्लिकेट नोटा बनवत असेल, तर त्याने थोडं सेटिंग हलवून ठेवावं… हललेली आहे म्हटल्यावर हमखास ओरिजिनल मानून खपेल… वाहवा! नोटांच्या छपाईतल्या त्रुटींचं वाढतं प्रमाण लक्षात घेतला लवकरच गव्हर्नर ऊर्जित पटेल एकेका कोऱ्याच छापून आलेल्या नोटेवर मी पाचशे, दोन हजार रुपये देण्याचं वचन देतो म्हणून एका खिडकीत सही करायला बसलेले आढळतील बहुतेक.

...............

४. सहा महिने ते वर्षभरात ४२ शहरांमध्ये घरांच्या किंमती ३० टक्के घसरणार : एका आघाडीच्या वृत्तसमूहात छापून आलेले एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष.

या वृत्तसमूहात रोजच एक सर्वेक्षण छापून येतं. त्यात कोणीही त्या क्षेत्रात नाव न ऐकलेली एखादी संस्था सर्वेक्षणाचे सरकारधार्जिणे निष्कर्ष जाहीर करते आणि ते इमाने इतबारे ठळक टायपात छापले जातात. सरकारने एकच कॉमन अॅप सगळ्यांना दिलंय का झटपट सर्वेक्षणासाठी?

...............

५. आठ नोव्हेंबर रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की १० ते २४ नोव्हेंबर या काळात चार हजार रुपयांपर्यंत जुन्या पाचशे-हजारच्या नोटा बदलता येतील, २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या काळात ही मर्यादा वाढवण्यात येईल… प्रत्यक्षात २४ नोव्हेंबरला नोटाबदलीच थांबवण्यात आली.

अख्ख्या देशाला दिलेला शब्द टप्प्याटप्प्याने फिरवायला ५६ इंचाची मर्दानी छाती लागते, तिच्यात वाघाचं काळीज लागतं, राव. सोप्पं काम आहे का? घरदार सोडून ते देशासाठी बाहेर पडले आहेत, ते थापा मारत असले म्हणून काय झालं, देशहितासाठी किरकोळ थापाही सहन करू शकत नाहीत का तुम्ही?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......