टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शशी थरुर, सुब्रह्मण्यम स्वामी, रेड्डी कन्येचा शाही विवाह आणि पतंजली उत्पादने
  • Sat , 19 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पतंजली Patanjali शशी थरुर Shashi Tharoor सुब्रह्मण्यम स्वामी Subramanian Swamy

१. नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच अर्थ खात्याने आपत्कालीन नियोजन करून ठेवायला हवं होतं. तसं केलं असतं, तर लोकांना त्रास सहन करावा लागला नसता : डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

सुब्रह्मण्यम स्वामी हे एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही पंचाईत करतात, हे त्यांचं अदभुत सामर्थ्य आहे. आता स्वामी हुशार आहेत, बरोबरच बोलतात, असं सत्ताधारी किंवा भक्तगण म्हणू शकत नाहीत आणि ते तर निव्वळ वाचाळशिरोमणी आहेत, असं विरोधक किंवा अभक्तगण म्हणू शकत नाहीत.

...............

२. हजारो कोटींचे कर्ज थकवणाऱ्या धनाढ्य कर्जदारांनी वेळोवेळी परतफेड केली असती या देशाची अर्थव्यवस्था कोसळली नसतीच. पण त्यासोबतच हा नोटबंदीचा निर्णय घ्यावा लागला नसता : शिवसेना

व्हिडिओकॉनने पक्षाला ८५ कोटी रुपयांची देणगी दिल्याची बातमी नेमकी याच दिवशी यावी, एवढा एक विलक्षण योगायोग सोडला, तर बाकी सगळं बरोबर आहे. आता निदान या कर्जबुडव्यांकडून मुखपत्राच्या मुखपृष्ठावरच्या जाहिरातींसाठी वार्षिक करार तरी करून घ्या घसघशीत. जनतेपर्यंत ज्वलंत विचार तरी पोहोचत राहतील व्यवस्थित.

...............

३. उदारमतवादी इतिहासकारांचं मत काहीही असलं, तरी ब्रिटिश राजवट अन्यायकारकच होती. कॅनडाच्या पंतप्रधानांनी २०१६च्या सुरुवातीला तिथल्या शिखांची जाहीर माफी मागितली. ब्रिटिश पंतप्रधानांनीही जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत संपूर्ण भारताची जाहीर माफी मागायला हवी : डॉ. शशी थरूर

त्यानंतर लगेचच १९८४च्या दंगली आणि शीख हत्याकांडासंदर्भात, देशातल्या ६० वर्षांच्या दिशाहीन, भोंगळ कारभाराबद्दल, साफ चुकलेल्या निर्णयांबद्दल काँग्रेस पक्षही माफी मागेल देशाची, हो ना थरूरसाहेब?

...............

४. रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहात शुद्ध देशी गाईंची निर्मिती करण्यासाठी विदेशात नव्याने वापरलं जाणारं भ्रूण प्रत्यारोपणाचं (एम्ब्रिओ ट्रान्स्फर) तंत्र आता वापरलं जाणार. त्यामुळे भारतीय गोवंशाच्या आनुवंशिक सुधारणेत मोठी क्रांती होऊन ग्राहकांना चांगल्या प्रतीचं दूध मिळणार.

देवा देवा देवा, केवढा हा अनाचार? देशी गाईंचा वंश सुधारण्यासाठी विदेशी तंत्राचा वापर? आपल्या देशात हजारो वर्षांपासून प्लास्टिक सर्जरीचं (तीही हत्तीचं मुख मानवी धडावर बसवणारी) तंत्र विकसित झालेलं असताना, पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिलेला असताना साक्षात देशी गोमातेसाठी विदेशी तंत्रज्ञान? दुधाबिधाचं जाऊद्याहो, ते नसलं तरी चालतं… आपले ३३ कोटी देव राहतील ना सुखरूप या नव्या देशी गायींच्या पोटात? गोठ्यात आणताना गोमूत्र शिंपडून त्यांना शुद्ध करून घेत चला, बरं का!

...............

५. कर्नाटकमधील खाणसम्राट आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या शाही विवाहसोहळ्यावर पाचशे कोटींचा खर्च; सर्व खर्च चेकनं केल्याचा रेड्डींचा दावा.

भर मांडवात नाट्यमय पद्धतीने आर्थिक विभागांचे अधिकारी काही कारवाई करतील, अशी अपेक्षा असताना खुद्द शुचितासम्राट येड्युरप्पा यांनी दोन वेळा हजेरी लावल्यामुळे लग्नकार्य पवित्र करून घेण्यात आलेलं आहे, हे स्पष्टच आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मंदीचं सावट पसरलेलं असताना लग्नाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला रोखविहीन चालना दिल्याबद्दल रेड्डी बंधूंचा जाहीर सत्कार करून त्यांना सन्मानपूर्वक पक्षात परत आणलं पाहिजे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......