टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राहुल गांधी, तन्वीर सेत, बाबा रामदेव, राम माधव आणि साध्वी देवा ठाकूर
  • Thu , 17 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या बाबा रामदेव Baba Ramdev राहुल गांधी Rahul Gandhi

१. स्वित्झर्लंडची लष्करी ताकद भारताच्या दहा टक्केही नाही; त्यामुळे, भारत सरकार तिथून भारतीयांनी दडवलेला काळा पैसा आणल्याशिवाय राहणार नाही : बाबा रामदेव

पतंजलीची गोमूत्रमिश्रित भांगही आलीये काय बाजारात? भारत कुठे, स्वित्झर्लंड कुठे? लष्करी ताकदीचा संबंध काय? बाबा थंड घ्या जरा… हवं तर तेही पतंजलीने बनवलेलं (म्हणजे कुणाच्या तरी बाटलीतून काढून आपल्या बाटलीत भरलेलं) घेतलंत तरी चालेल!!!

....................

२. गोरगरिबांचा बँकेत जमा झालेला पैसा मोदी मोजक्या उद्योजकांना देणार. गेल्या वर्षभरात सरकारने १५ उद्योगपतींची मिळून १ लाख १० हजार कोटींची कर्जे माफ केली आहेत. ही तूट भरून काढण्यासाठी सामान्यांच्या खिशातून बँकेत आलेल्या पैशांचा वापर केला जाईल : राहुल गांधी

आरोप गंभीर आहे, विचारात पाडणाराही आहे, त्यामुळे तो तुम्ही केलाय यावर चटकन् विश्वास बसत नाही चटकन, 'रागा'वू नका हं पटकन्. शिवाय, हे सगळे उद्योगपती तुमच्या सत्ताकाळात समाजवादी साथी बनून एकसुरात देशोन्नतीचा राग आळवतानाही दिसले नव्हते. त्यांना तुम्हीच पोसून, तुस्त करून ठेवलेले आहेत, त्याचं काय?

....................

३. हरियाणातील कर्नालमध्ये एका लग्नसमारंभात हिंदू महासभेच्या स्वघोषित साध्वीने आणि तिच्या अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक ठार, तीन जखमी

हिंदू धर्माची अद्भुत व्यापकता दाखवणाराच हा प्रकार आहे. स्वत:ला साध्वी म्हणवून घेण्यासाठी जिने सर्वसंगपरित्याग केलेला असला पाहिजे, ती लग्नसमारंभात आनंदित होऊन नाचते; जिच्या मनातून किडेमुंगींबद्दलचीही हिंसेची भावना निपटून गेली पाहिजे, ती बंदुका झाडण्यासारख्या हिंस्त्र प्रकारांनी आनंद साजरा करते, यातून काय दिसतं. या बयेने हिंदूंना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं होतं, एक देशसेवेला, एक गोसेवेला, एक हिंदु महासभेला आणि एक मातापित्यांच्या सेवेला (नशीब!) अर्पण करावा, असं तिचं म्हणणं होतं. आता आणखी दोनचार मुलं प्रत्येकानेच जन्माला घालायला हवीत, हिला आनंदाचं भरतं येऊन गोळ्या झाडाव्याशा वाटल्या तर त्या खाऊन मरायला नकोत का कोणी?

....................

४. कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री तन्वीर सेत हे जाहीर कार्यक्रमात पॉर्न पाहताना सापडले होते; ते पॉर्न पाहात नव्हते, तर अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलोनिया हिचे फोटो पाहात होते, असा बचाव पुढे आला आहे.

मेलोनिया ही पूर्वाश्रमीची मॉडेल आहे आणि तिचे काही फोटो पाहणं हे पॉर्न पाहण्यापेक्षा वेगळं नाही, हे आम पब्लिकला माहिती नसेल का सेत काका? आता सगळ्यांच्या हातात मोबाइल आहे, इंटरनेट आहे, डेटा पॅक आहे आणि ट्रम्पची चर्चा सुरू झाल्यापासून सगळे मोबाइलवर फोटो पाहतायत ते कोणाचे? डोनाल्ड ट्रम्पचे?

....................

५. कठीण समयीच ‘देशभक्ती’ची कसोटी लागते, अन्यथा इतर वेळी आरामखुर्चीवर बसून प्रत्येकजण देशभक्त बनलेला असतो : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव

सांगा पाहू राम माधव यांनी हे विधान कुठून केलं?

अ. सियाचेनमधून, ब. कारगिल-द्रासमधून, क. नोटा बदलून घेण्यासाठी लावलेल्या रांगेतून आणि ड. आरामखुर्चीत बसून

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......