टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अयोध्येतील भावी राम मंदिराची प्रतिकृती
  • Mon , 25 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi राम मंदिर Ram Mandir विराट कोहली Virat Kohli

१. मुंबई लोकल ट्रेनच्या महिला डब्यांना भगवा रंग देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. भगवा रंग हा धैर्य आणि शौर्याचा रंग आहे, त्याग आणि धाडसाचा रंग आहे. त्यामुळे हा रंग दिला तर महिलांचे डबे लगेच लक्षात येतील. तसंच या डब्यांतून प्रवास करणाऱ्या महिलांचं मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल, असं रेल्वेच्या प्रस्तावात म्हटलं आहे. या महिलांवर छेडछाडीचा प्रसंग आलाच तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी हा रंग महिलांना आणि मुलींना प्रेरणाही देईल, असंही रेल्वेनं प्रस्तावात म्हटलं आहे.

जवानांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी सीमेवरच्या तारांच्या कुंपणांना हा रंग देता येईल का? तसंच लोकलमधून प्रवास करणाऱ्या सर्व स्त्रियांना याच रंगाचे कपडे घालण्याची सक्ती करता आली तर? पुरुषांच्या डब्यातही गर्दीच्या वेळी अतोनात मनोधैर्याची गरज पडत असते, त्यांच्यावर अन्याय का? भगवे कपडे घातलेल्या भोंदू साधूंच्या अत्याचारांपासून रक्षण करण्यासाठी महिलांनी हेच कपडे परिधान करायला हवं होतं खरं तर. आता रेल्वेचे हे अतिहुशार अधिकारी हिरव्या सिग्नलचा रंग भगवा कधी करतात ते पाहूयात.

.............................................................................................................................................

२. गतवर्षात हॉटेलात जेवायला गेलेल्या भारतीयांनी ‘चिकन बिर्याणी’ला सर्वाधिक पसंती दिली आहे. ‘स्विगी फूड सर्व्हिस’नं केलेल्या सर्वेक्षणात चिकन बिर्याणी पाठोपाठ ‘मसाला डोसा’, ‘बटर नान’, ‘तंदुरी रोटी’ आणि ‘पनीर बटर मसाला’ यांचा नंबर लागतो. बंगळुरू, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये हा सर्वे करण्यात आला. दाल मखनी, चिकन फ्राईड राईस हे पदार्थही बऱ्याच वेळा मागवले जातात, असं त्यातून स्पष्ट झालं आहे.

सत्ताधारी विचारवर्तुळातल्या संस्कारी मंडळींनी इतके प्रयत्न करूनही हा देश मांसाहाराला प्राधान्य देतो आणि त्यातही बिर्याणी या वेदांमध्ये उल्लेख नसलेल्या, आपल्या पौराणिक महापुरुषांनी न चाखलेल्या इस्लामी परंपरेतल्या पदार्थाचं सर्वाधिक सेवन करतो, ही गोष्ट खरं तर काही कट्टरवादी संघटनांच्या काही सदस्यांना आत्महत्या करण्याची प्रेरणा देण्यासारखीच आहे. सनी लिओनीनं संधी हिरावून घेतली, तर काय झालं; बिर्याणीनं ती पुन्हा दिली आहे, सोडू नका, लवकर जीव द्या.

​​​​​​​.............................................................................................................................................

३. देशात सगळीकडेच थंडीची लाट पसरली असताना अयोध्येतील राम मंदिरात प्रशासनानं रामाला थंडी वाजू नये म्हणून हिटर बसवावा आणि रामाच्या मूर्तीला स्वेटर घालावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले, अयोध्येतील राममंदिर हे करोडो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे रामाची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. जो प्रभू राम आपल्या खाण्या-पिण्याची, राहण्याची आणि इतर सर्व गोष्टींची काळजी घेतो त्याची आपण काळजी घ्यायला हवी.

लहानपणी शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राखणाऱ्या सगळ्या लसी ज्यांना वेळेवर दिल्या जात नाहीत, अशा बालकांचं प्रमाण लोकसंख्येत किती आहे, हे यावरून कळतं. बाकी शर्मा छाप लोकांचा उदरनिर्वाह प्रभू रामचंद्र चालवतात, याबद्दल काहीच शंका नाही. त्यांची सगळी दुकानदारीच या एका नावावर चालतं. त्यांनी वर्गणी काढायला काहीच हरकत नाही.

​​​​​​​.............................................................................................................................................

४. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुका जिंकल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘गुजरात’ हा शब्द उच्चारल्यानंतर भावुक झाले. मोदी म्हणाले, तीन वर्षे सत्तेत राहिल्यांनतर देशभरात झालेल्या निवडणुकांमध्ये इतर कुठल्याच पक्षानं इतकी चांगली कामगिरी केली नाही. बैठकीत मार्गदर्शन करताना मोदींनी खासदार आणि कार्यकर्त्यांना आत्मसंतुष्टीपासून वाचण्याचा सल्ला दिला.

गाडीखाली कुत्रा सापडला तर जराही चित्त विचलित न होणारे छप्पन्न इंची छातीचे प्रधानसेवक गुजरातच्या उल्लेखानंही इतके हळवे होतात, म्हणून हल्ली कोणी त्यांच्यापुढे ‘गोध्रा’ असा शब्दही काढत नाही, ढसढसा रडूच लागतील बहुतेक. असा लोभस हळवेपणा हा पराक्रमी पुरुषाचा एक वेगळाच अलंकार म्हणायला हवा.

​​​​​​​.............................................................................................................................................

५. अभिनेत्री अनुष्का शर्माशी इटलीत लग्न करणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या देशभक्तीवर मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी शंका उपस्थित केली आहे. परदेशात लग्न करणं ही देशभक्ती नाही, असं वक्तव्य या आमदारानं केलं आहे. कोहली करोडो लोकांचा आवडता क्रिकेटपटू आहे. जागतिक स्तरावर तो भारताचं प्रतिनिधीत्व करतो. त्यानं भारतात विवाहाचं आयोजन का केलं नाही? ही राष्ट्रभक्ती नाही. या भूमीवर भगवान राम यांचा विवाह झाला. भगवान श्रीकृष्ण यांचाही विवाह इथंच झाला. मात्र या माणसानं इटलीला जाऊन विवाह केला, अशा शब्दांत पन्नालाल यांनी नाराजी व्यक्त केली.

आपल्या देशात मेंदूच्या पोलिओची एक स्वतंत्र लस विकसित करायला हवी, हे आता कोणाही विज्ञान संशोधकाच्या लक्षात यायला हरकत नाही. लगेहाथ पन्नालाल यांनी हनीमूनला परदेशात जाणाऱ्यांच्या देशभक्तीविषयीही मार्गदर्शन करायला हवं होतं. शिवाय, तो देशी कामसूत्रानुसारच साजरा होतोय की नाही, यावर काही देखरेख ठेवणारी यंत्रणाही खरं तर निर्माण व्हायला हवी. पन्नालाल यांच्यासारखे देशभक्त प्रभू रामचंद्रांच्या आणि श्रीकृष्णाच्या काळात जन्मले असते, तर कदाचित त्यांनीही लग्नाचं डेस्टिनेशन बदलण्याचा विचार केला असता.

​​​​​​​.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......