टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, अमित शहा, मनोहर पर्रीकर आणि हिंदू जनजागरण मंच
  • Wed , 20 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya अमित शहा Amit Shah नरेंद्र मोदी Narendra Modi मनोहर पर्रीकर Manohar Parrikar हिंदू जनजागरण मंच Hindu Jagran Manch

१. खासगी शाळांनी हिंदू विद्यार्थ्यांकडून नाताळच्या सणाची वर्गणी घेऊ नये, तसंच त्यांच्यावर हा सण साजरा करण्याची सक्ती करू नये, असा इशारा उत्तर प्रदेशातील हिंदू जनजागरण मंचानं दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य त्या परिसरातील खासगी शाळांमध्ये जाऊन यासंबंधीचं निवेदन संस्थाचालकांना देतील. खासगी शाळा या नाताळच्या सणाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असल्याचा आरोप मंचानं केला आहे. दरम्यान, सरकारनं अशा कोणत्याही आदेशाबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले आहेत.

हे तात्या लोक मुळात हिंदू विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या मिशनरी आणि कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाताच कामा नयेत, असा फतवा का नाही काढत? ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी. त्यांनी सगळ्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा काढून गो-रक्षा सप्ताह साजरा करावा आणि बैलपोळ्याची वर्गणी गोळा करावी. कारण, नाताळच्या सणात त्यातला धार्मिक भाग बटबटीत ऊग्र पद्धतीने मिरवला जात नाही, म्हणून तो अन्यधर्मीयही साजरा करतात, हे यांना समजण्याची काही शक्यताच नाही.

.............................................................................................................................................

२. पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीतील दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. घरात हस्तलिखितं आणि पुस्तकं सोडून काहीच नसल्यानं चोरट्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी देखील पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास ७ ते ८ चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून पु. लं.च्या घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व सामानांची उलथापालथ केली. पण घरात किमती ऐवज नव्हता. पुलंनी लिहिलेली काही हस्तलिखितं व पुस्तकंच प्लॅटमध्ये होती.

मराठी समाजाच्या दारिद्र्यावर झगझगीत प्रकाश टाकणारी ही बातमी आहे. लोकप्रिय लेखकांच्या हस्तलिखितांना जगभरात लाखो रुपयांचा भाव मिळत असताना अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व आणि सुपरस्टार लेखक असलेल्या पुलंच्या घरातली ‘हस्तलिखितं आणि पुस्तकं’ हे ‘मौल्यवान ऐवज’ नाहीयेत, यातच सगळं आलं.

​​​​​​​.............................................................................................................................................

३. गुजरातमध्ये विकासकामांमुळेच विजय झाला असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ‘जीता विकास, जीता गुजरात’ असं ट्विट मोदींनी केलं असून या विजयाचं श्रेय त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलं आहे. हिमाचल आणि गुजरातमधील निकालावरून जनतेनं सुशासन आणि विकासाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होतं.

अगदी बरोबर आहे नरेंद्र मोदींचं. आता गेल्या वेळेपेक्षा काही जागा कमी आल्या, १५०च्या वर जागा येतील, असा विश्वास असताना शंभरीही गाठता आली नाही आणि मतांची टक्केवारीही ११ टक्क्यांनी कमी झाली असली, म्हणून काय झालं? बहुमत हे शेवटी बहुमत असतं. निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा तर विकास झालाच की नाही? हेच ते ‘वेड्या विकासा’चं लक्षण आहे.

​​​​​​​.............................................................................................................................................

४. पहिल्याच सामन्यात राहुल गांधी शून्यावरच बाद झाले, अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुजरातमधील निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली.

पर्रीकर हे फार सचोटीचे आणि साधनशुचिता वगैरे मानणारे नेते आहेत, असा एक भ्रम जोपासला गेला आहे. ती सगळी शुचिता गुंडाळून गोव्यातल्या मतदारांनी स्वच्छपणे नाकारलेलं असताना पर्रीकर दिल्ली सोडून गल्लीच्या सत्तेवर जाऊन बसले आहेत. शून्यावर बाद झालेले असताना चिकीखाऊ अंपायरच्या साथीनं खोटेपणानं खेळपट्टीवर परतणाऱ्या खेळाडूनं किमान गप्प बसण्याची तरी शुचिता पाळायला हरकत नाही ना?

​​​​​​​.............................................................................................................................................

५. काँग्रेसने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केल्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा पक्ष मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

अमित शहा यांच्या तोंडून ‘प्रचाराची पातळी’ वगैरे शब्दप्रयोग आल्यानंतर झालेल्या हास्यस्फोटात १७ पत्रकारांच्या तोंडातून ढोकळ्याचा खकाणा उडाला, दोघांच्या घशात जिलबी अडकून त्यांचे प्राण कंठाशी आले, मुख्यालयाच्या उडालेल्या छपराचे काही भाग इतस्तत: कोसळले आणि अमितभाई प्रचाराच्या पातळीबद्दल बोलणार असतील, तर मी यापुढे आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचंच अध्यापन करणार असं मुख्यालयाच्या दाराबाहेरच्या निरक्षर पानटपरीवाल्यानं जाहीर केलं, हे सगळं बिकाऊ मीडिया तुम्हाला सांगणार नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

​​​​​​​.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 22 December 2017

नाताळच्या सणात त्यातला धार्मिक भाग बटबटीत ऊग्र पद्धतीने मिरवला जात नाही म्हणता? कार्निव्हल हे नाव कधी ऐकलंय? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......