साक्षीदार फितूर होणार नाहीत, याची काळजी का घेतली गेली नाही?
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
अ‍ॅड. सविता शिंदे
  • नितीन आगेच्या छायाचित्रासह त्याचे आई-वडील
  • Mon , 11 December 2017
  • पडघम कोमविप खर्डा Kharda नितीन आगे Nitin Aage कोपर्डी Kopardi

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील दोन प्रमुख खटल्यांचे निकाल लागले. दोन्ही घटना अहमदनगर जिल्ह्यात घडल्या होत्या. एक होती कोपर्डी येथील बलात्कार प्रकरण आणि दुसरी खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरण. दोन्ही घटना महाराष्ट्रभर गाजल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या दोन्ही खटल्यांच्या निकालाकडे होतं. मी स्वत: या घटना घडल्यानंतर दोन्ही ठिकाणी भेटी दिल्या होत्या.

कोपर्डी बलात्कार खटल्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आणि नीतीन आगे खून खटल्यातील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. त्यामुळे या दोन्ही खटल्यांची तुलना होऊ लागली. वास्तविक पाहता कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणं याचं स्वागतच करायला हवं. (अर्थात मी व्यक्तिश: फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आहे.) मात्र नितीन आगे खून प्रकरणामधील दोषींनाही शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. परंतु या दोन्ही घटना स्वतंत्र आहेत आणि त्यादृष्टीनंच त्यांच्याकडे पाहायला पाहिजे.

अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खर्डा या गावातील वेशीलगतच एका पत्र्याच्या शेडमध्ये नितीन आगेचं कुटुंब राहतं. बाहेरच्या जिल्ह्यातून मजुरीसाठी येऊन या गावात स्थायिक झालेलं हे कुटुंब. त्याच गावातील रयत शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीच्या वर्गात नितीन शिकत होता. त्याच शाळेत शिकणाऱ्या सवर्ण समाजातील मुलीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून त्या मुलीचा भाऊ, त्याचे मित्र व नात्यातील लोक यांनी नितीनला शाळेतून ओढत बाहेर नेलं. नातेवाइकांच्या वीटभट्टीवर नेऊन क्रूरपणे त्याची हत्या केली आणि जवळच्या जंगलातील झाडाला टांगून आत्महत्या असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. हा या घटनेचा थोडक्यात वृतान्त.

ही घटना माहीत झाल्यानंतर विविध दलित संघटना, पुरोगामी संघटना, प्रसिद्धीमाध्यमांनी दखल घेतल्यानंतर आरोपींना अटक झाली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सदर खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल आणि आरोपींना शिक्षा होईल, या दृष्टीनं विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. परंतु यापैकी काहीही झालं नाही. जवळपास साडेतीन वर्षांनी या खटल्याचा निकाल लागून सर्वच्या सर्व म्हणजे नऊपैकी नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. यापैकी तीन आरोपी अल्पवयीन होते.

न्यायालयाचे निकाल हे बऱ्याच वेळा समोर येणाऱ्या प्रत्यक्ष पुराव्यांवर अवलंबून असतात. त्या अर्थानं इथं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तर नव्हताच, पण परिस्थितीजन्य पुरावेही न्यायालयासमोर सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळेच सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली.

या खटल्यात एकंदर २६ साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले होते. त्यापैकी १६ साक्षीदार फितूर झाल्याचं न्यायालयानं जाहीर केलं. फितूर झालेल्या साक्षीदारांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील शिक्षकही आहेत. ज्यांनी तपासात नितीनला आरोपींनी शाळेतून ओढत बाहेर नेल्याचे जबाब दिले होते. न्यायालयात मात्र त्यांनी साक्ष फिरवली. पोलिसांच्या दबावाखाली आपण तसे जबाब दिल्याचं त्यांनी सांगितलं. या व इतर साक्षीदारांवरही स्थानिकांचा दबावही असेल. त्याला ते बळीही पडले असतीलही. शिवाय उच्च-नीच जातीय भावना, समाजातील दुर्बलांच्या बाजूनं नाही उभे राहिलो तरी ते आपले काही बिघडवू शकत नाहीत, ही भावनासुद्धा असतेच. आणखी एक म्हणजे नितीन आगेचं कुटुंब तर मूळचं त्या गावातलंही नाही.

सदर फितूर साक्षीदारांवर कारवाई करणार असल्याचं आणि नितीन आगे खून खटल्याच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याचं नुकतंच सरकारनं जाहीर केलं आहे. परंतु ट्रायल कोर्टातील साक्षी-पुरावे बघता अपिलाच्या निकालात काही फरक पडेल असं वाटत नाही. आणि माझ्या मते साक्षीदारांवर त्यानं काय साक्ष द्यावी अशी सक्ती कायद्यानं करता येणार नाही. पोलिसांपुढे दिलेली साक्ष गृहीतही धरता येत नाही. हा सर्वस्वी त्या साक्षीदाराच्या सदसदविवेक व धाडसाचा प्रश्न आहे. पण खरं सांगू इच्छिणाऱ्या साक्षीदारांच्या सुरक्षेबाबत मात्र सरकारनं काळजी घेतली पाहिजे.  

या खटल्यात साक्षीदार फितूर होणार नाहीत, याची काळजी सरकारी पक्षानं घ्यायला पाहिजे होती. ती घेतली गेली नाही. कदाचित प्रस्थापित, उच्चवर्गीय, सवर्ण घरातील व्यक्ती जर अन्यायग्रस्त असती तर तशी काळजी घेतली गेली असती, असं म्हणण्यास मात्र नक्कीच खूपच जागा आहे. नितीन आगेच्या वडिलांना खटल्याचा निकाल लागल्याचं प्रसिद्धी माध्यमातून कळतं याचा अर्थ तोच होतो.

.............................................................................................................................................

नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप

ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

आधीच्या सरकारमधील गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे जलदगती न्यायालयाची पूर्तता का केली गेली नाही? विशेष सरकारी वकिलांची नेमणूक का झाली नाही? कदाचित या घटनेनंतर काही महिन्यांनी आधीच्या सरकारला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं म्हणून असं झालं असेल, असं म्हणावं तर मग आत्ता सत्तेत असलेल्या सरकारनं ते का केलं नाही? पोलिस यंत्रनेनंही तपासात त्रुटी ठेवल्या का? असे प्रश्न आहेतच. पण सरकार, तपास यंत्रणा हे करू शकल्या नाहीत तर महाराष्ट्रातील दलित, पुरोगामी संघटना चळवळी मागच्या साडेतीन वर्षांत हे का करून घेऊ शकल्या नाहीत? सध्याच्या सरकारमध्ये तर काही दलित पक्ष, नेत्यांचाही समावेश आहे. तेही हे करून घेऊ शकले नाहीत.

केवळ ‘संविधान दिन’ साजरा करून व राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांबद्दल बोलून दलित, वंचित घटकांना न्याय मिळणार नाही, हेच या घटनेनं सिद्ध झालं आहे. न्याय प्रत्यक्षात मिळवायचा असेल तर राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांच्या आधारेच कायद्याच्या प्रक्रियेतून नियोजनबद्ध पद्धतीनं सरकार, तपास यंत्रणा यांवरदेखील दबाव आणण्याचं काम चळवळींना करावं लागेल. नितीन आगे प्रकरणात मात्र त्या कमी पडल्या असंच आत्ता तरी म्हणावं लागेल.

.............................................................................................................................................

लेखिका अ‍ॅड. सविता शिंदे आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेच्या माजी उपाध्यक्ष आहेत.

savitashinde75@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 11 December 2017

सविता ताई, तुमचा प्रश्न रास्त आहे. महाराष्ट्रातील दलित, पुरोगामी संघटना चळवळी मागच्या साडेतीन वर्षांत हे का करून घेऊ शकल्या नाहीत! याचं कारण माझ्यामते असं की नितीन आगे यांच्या वडिलांकडे पैसे नाहीत. न्याय ही विकत मिळणारी वस्तू आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......