चला, भावना दुखावून घेण्याची शपथ घेऊयात
पडघम - देशकारण
संदिप रॉय
  • ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका पदुकोण आणि राणी पद्मावती
  • Mon , 04 December 2017
  • पडघम देशकारण संदिप रॉय Sandip Roy पद्मावती Padmavati भावना दुखावणे मंत्रालय Ministry of Offence MOO

आपण ‘पद्मावती’चे आभारच मानले पाहिजे. या बॉलिवुड सिनेमातील कलावंतांना जीवे मारण्याच्या, डोकं उडवण्याचा, अवयव तोडण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली गेली आणि एक गोष्ट स्पष्ट झाली. 

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आता 'भावना दुखावणे' मंत्रालयाची स्थापना करण्याची वेळ आली आहे. अगदी आयुष मंत्रालय स्थापन केलं गेलं त्याच धर्तीवर. आयुर्वेद, योगा, निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथीमध्ये संशोधन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं 'आयुष'ची स्थापना झाली होती. त्याच धर्तीवर भावना दुखावण्याच्या उद्योगात संशोधन, प्रचार आणि प्रसार करण्याचं काम भावना दुखावण्याचा कुटिरूद्योग करेल. हा उद्योग चक्रवर्ती गतीनं समृद्ध होईल अशी खात्री आहे. 

खूप काळापासून आपण असा आव आणत आहोत की, 'मनाला लावून घेणं' हे एक कमी महत्त्वाचं दुर्लक्ष करण्याजोगं काम आहे. आपल्याला वाटत होतं की, पंधरा मिनिटांच्या स्वस्त प्रसिद्धीसाठी हपापलेल्यांचं हे काम आहे. थेट टीव्ही स्क्रीनवर रक्तपिपासू धमक्या देईपर्यंत अखिल भारतीय क्षत्रिय युवा महासभा अस्तित्वात असल्याचं कुणाला माहीत तरी होतं का? किंवा मौलाना आझाद लोक कल्याण संस्थानही कुणाला माहीत नव्हतं, जोवर जयपूरच्या साहित्य उत्सवात 'सॅटॅनिक वर्सेस'चं वाचन करण्यामुळे हे संस्थान दुखावलं गेलं नाही. जोवर पबमध्ये गेलेल्या स्त्रियांच्या झिंज्या ओढून श्रीराम सेनेनं त्यांना बाहेर काढलं नाही, तोवर ही सेनासुद्धा कुणाला माहीत नव्हती. 

भाडोत्री दंगा 

सेना फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर माहीत झाली. राज्य सरकारनं या सेनेवर कारवाई करण्याची हिंमत दाखवण्यापूर्वी सेनेचा संस्थापक प्रमोद मुतालीकविरुद्ध एकूण २५ पोलीस केसेस दाखल झालेल्या होत्या. ‘तहलका’नं प्रसिद्ध केलेल्या शोधबातमीनुसार मुतालीकचा भाडं घेऊन दंगा करण्याचा समृद्ध व्यवसाय होता. शून्यातून एक संघटना उभी करून इतका जबरदस्त व्यवसाय उभा करणाऱ्या कल्पक मुतालिकला तात्काळ भावना दुखावण्याच्या मंत्रालयाचा (Ministry of offense - MOO) व्यवसाय सल्लागार नेमला पाहिजे. भाडोत्री दंगे घडवण्याच्या उद्योगाला फेसबुक-व्हॉट्सअॅपसारख्या साधनांची गरज असल्यामुळे त्यांना या संघटनेचं टेक्निकल पार्टनर केलं पाहिजे. 

सुरुवातीपासून हे स्पष्टच होतं की, भावना दुखावून घेणं हा आपला मूलभूत हक्क आहे आणि तो आपण कायम खूप जोरात बजावत असतो. अमेरिकेत संविधानात सर्वांत पहिलं दुरुस्ती विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणखी विस्तारित करणारं होतं, तर भारतात सर्वांत पहिली दुरुस्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित करणारी होती. 'राज्याच्या सुरक्षिततेसाठी, इतर देशांशी सौहार्दपूर्ण संबंध कायम करण्यासाठी, सुव्यवस्थेसाठी, सभ्यता आणि नैतिकता, तसंच न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी, बदनामी करू नये किंवा भावना दुखावू नये म्हणून' ही दुरुस्ती करण्यात आली होती. तेव्हापासून आपल्याकडे भावना दुखाण्याची स्पर्धा सुरू झाली. ज्याला सलील त्रिपाठींनी 'असहिष्णुतेची स्पर्धा' म्हटलं आहे. 

आपल्या शोभेच्या कपाटात असहिष्णुतेच्या स्पर्धेत मिळालेली अनेक बक्षिसं हारीनं मांडली आहेत. सलमान रश्दीचं 'सॅटॅनिक वर्सेस' आहे, एम. एफ. हुसेनचं 'सरस्वती' आहे, दीपा मेहताचं 'फायर' आहे, तस्लिमा नसरीनच्या आठवणी आहेत, पेरूमल मुरुगनचं 'माथोरुभागन' आहे, ए. के. रामानुजनचं 'थ्री हंड्रेड रामायनाज' आहे, रोहिंग्टन मिस्त्रीचं 'सच अ लाँग जर्नी' आहे, कमल हसनचं 'विश्वरूपम' आहे, द दा विंची कोड, व्हॅलेंटाईन डे, आफ्रिकन विद्यार्थी.... ही काही थोडकी उदाहरणं आहेत. यादीतली ही काही वरची, ज्याबद्दल मी आभारी आहे. 
 

मंत्रालय आणि अजेंडा 

आता या भावना दुखावून घेण्याच्या व्यवसायाला सरकारनं नुसतं, ‘कायदा आणि सुव्यवस्था राखणं आमचं काम आहे, पण भावना दुखावून घेण्याचा जनतेला हक्क आहेच’ असं म्हणून तोंड देखला पाठिंबा देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करून मदत करावी लागेल. सरकारनं जनतेचा हा हक्क कायदा सुव्यवस्थेचे आलतूफालतू प्रश्न मध्येच न आणता अबाधित राखावा. सध्या अस्ताव्यस्त असलेला हा कार्यक्रम सरकारनं सुसूत्रपणे राबवायला मदत करावी. उदाहरणार्थ, महिला आयोगाला नव्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरवर बोलीभाषेत केलेली हलकीशी गंमत दीपिका पदुकोणचं नाक कापण्याच्या धमकीहून अधिक गंभीर वाटली. 

.............................................................................................................................................

निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ, देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये. या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291

.............................................................................................................................................

एकदा मू (MOO) ची स्थापना झाली की, मग त्या अंतर्गत कोणत्या खात्यांची अधिक भरभराट होण्याला वाव आहे, ते ठरवता येऊ शकतं. जसं गोवंशाचं मांस खाणं, गाईंची वाहतूक, आंतरधर्मीय विवाह, मशीद आणि मंदिरातले भोंगे, राष्ट्रगीत, पाकिस्तानी अभिनेते वगैरे या सर्व मुद्द्यांनी निवडणुकीत उत्तम यश मिळवून दिलेलं आहे. आपल्या अन्य मरणाच्या मार्गाला लागलेल्या पारंपरिक कलांपेक्षा भावना दुखावण्याची कला जास्त आर्थिक परतावा देणारी आहे. कोणत्याही अर्थी हा उद्योग डबघाईस येणारा उद्योग नाही. या आकड्यांकडचं बघा. संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोणचं डोकं उडवणाऱ्याला आधी ५ कोटी रुपये दिले जाणार होते, आता १० कोटी रुपये दिले जाणार आहेत. 

'इझ ऑफ डुइंग बिझिनेस'च्या फुटपट्टीवर भारत ३० अंकांनी वरती सरकलाय. त्यामुळे तर ही वेळ ‘मू’साठी अगदी योग्य आहे, कारण भावना दुखावून घेण्यात तर आपण जगात सर्वांत पुढे आहोत. त्यामुळे हा व्यवसाय 'मेक इन इंडिया' मोहिमेच्या मुकुटात मनाचा तुरा असेल. जागतिक योगा दिवासाप्रमाणे आपण जागतिक भावना दुखावण्याचा दिवस साजरा करू शकतो आणि त्यात जागतिक विक्रमही करू शकतो. 

पण सर्वांत आनंदाची गोष्ट म्हणजे, 'मी-म्हणतो-त्याचं-काय'वाल्या जातीधर्माच्या नावावर वाटल्या गेलेल्या आपल्या देशाला या एका मुद्द्यानं एकत्र आणलंय. जमात-ए-इस्लामी हिंदच्या राजस्थान शाखेनं ‘पद्मावती’वर बंदी आणण्याच्या राजपुतांचा मागणीला पाठिंबा दिला आहे. जमात म्हणते त्यांचं बंदीची मागणी करण्याचं कारण तेच आहे, जे राजपुतांचं आहे- 'भावना दुखावणे'. 

बघा किती उत्तम भविष्याच्या शक्यता आहेत. एकदा अयोध्येवरचं विचारमंथन संपलं की, श्री श्री रविशंकर ‘आर्ट ऑफ टेकिंग ऑफेन्स’चं सर्व धर्मांसाठी खुलं असणारं अधिवेशनसुद्धा घेऊ शकतात. शेवटी भावना दुआवण्यातच आपण विविधतेतली एकता साधू शकतो!

.............................................................................................................................................

हा लेख दै. The Hinduमध्ये २६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा –

.............................................................................................................................................

अनुवाद – प्रज्वला तट्टे. लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

prajwalat2@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......