नोटरंग : दोन कविता
पडघम - साहित्यिक
मुग्धा कर्णिक
  • दोन हजार रुपयांची नवी नोट.
  • Sat , 12 November 2016
  • नोटरंग मुग्धा कर्णिक Mugdha Karnik Note

१.

एक नोट डिझाइन करावी म्हणते...

कुणाची स्टाईल कॉपी करू?

साल्वादोर दालीची बरी राहील?

ओघळलेल्या घड्याळांप्रमाणे वितळून ओघळलेला गांधी नोटेवर पसरेल

की गांधीऐवजी टाकून द्यावा दालीच्या मनातला

युद्धाचा चेहरा?

आणि व्हॅन गॉगच्या गव्हाच्या शेतीतली काही कणसे फराट्यांसारखी मधेमधे

किंवा बटाटे खाणारे काळेपांढरे हात!

की पिकासोच्या आसवं ढाळणाऱ्या स्त्रीप्रमाणे रंगीबेरंगी चिमटलेला

दुभंग गांधी असू दे मध्यभागी?

आणि ग्युएर्निकाचे भस्मरंगी नाझीयुद्धदृश्य पार्श्वभूमीवर?

गाय नि गाढवंही असतील त्यात...

की उण्यापुऱ्या शतकापूर्वी काझिमिर मालेविचने काढलेल्या

काळ्या चौरसासारखी असू दे नोट...

शतवाटांनी तडकलेला

शून्यातून शून्याकडचा प्रवास...

मग एक की दोन अंकावर असू देत कितीही शून्ये

कदाचित् सोपी जाईल छपाईला...

दालीचं ओघळणारं घड्याळ, व्हॅन गॉगचे बटाटे खाणारे काळे पाढंरे हात आणि पिकासोची आसवं ढाळणारी स्त्री

२.

रियाझ म्हणाला

तुमची नोटेवरची कविता वाचून

मला गांधी एडवर्ड मंचच्या ‘स्क्रीम’मधल्या रंगरेषेसारखे किंचाळताना दिसले.

बरोबर आहे.

व्याकूळ वेदना उमटू शकते कुठल्याही मनातून

 

पण कदाचित् नाही किंचाळणार कुणीही...

गांधीसुद्धा...

आताशा किंचाळणारे रंग आणि गोडगुलाबी रंग

सरमिसळ होत राहते...

सोपे नसते रंगरेषांतून असे किंचाळी फोडणे

मृत्यूनंतरही जगाला हादरवत रहाणारी किंचाळी की किंकाळी?

तशा तर कितीएक किंकाळ्या जिरवल्यात आम्ही.

पशूंच्या शिंगामागून डोकावणारे परशू

होतात कुंचले रक्तरंगात भिजून कॅन्वास चिताडणारे...

त्या रंगरेषांतून ऐकू येतात ते जयजयकार.

 

Not a SCREAM, Riyaz, No scream...

शिवाय एडवर्ड मंच होता स्वदुःखमग्न चित्रकार

इथे जमतात सारे दुसऱ्यांची दुःखे 'साजरी' करणारे रंगविक्ये

इथे किंकाळी नाही, रियाझ...

इथे डीज्जे! ढोलही...

 

लेखिका मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या संचालक आहेत.

mugdhadkarnik@gmail.com

Post Comment

Arhna Pendse

Fri , 18 November 2016

सणसणीत भाष्य!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......