मी जे केलं ती काही बहादुरी नाही, पत्रकारिता आहे!
पडघम - माध्यमनामा
रोहिणी सिंह
  • रोहिणी सिंह यांच्या बातमीविषयीच्या व्हिडिओ स्टोरीतील एक दृश्य
  • Thu , 12 October 2017
  • पडघम माध्यमनामा रोहिणी सिंह जय शहा द वायर

मी माझं काम केलं, कुठली बहादुरी केलेली नाही. हीच पत्रकारिता आहे. सरकारच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित करणं, हेच तर पत्रकारांचं काम असतं. हेच पत्रकारितेचं मूळ कर्तव्य आम्हाला शिकवलं जातं. मला वा ‘द वायर’ला किंवा कुणालाही असं वाटत नाही की, आम्ही कुठलं बहादुरीचं काम करत आहोत. आम्ही फक्त एका बातमीवर काम करत होतो, ज्याला पत्रकारिता म्हणतात!

मी या बातमीसाठी खूप मेहनत घेतली आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी)वरून कागदपत्रं डाऊनलोड करून त्यांचा अभ्यास केला. हां, हे नाही सांगणार की बातमीचा स्रोत काय आहे आणि बातमी कुठून मिळाली. पण आरओसीच्या कागदपत्रांतून ती बाहेर काढणं, वाचणं, समजून घेणं आणि अभ्यास करणं हे सर्व मी संपादकांच्या मदतीनं पूर्ण केलं.

ही बातमी फक्त यासाठी महत्त्वाची आहे की, आम्ही एका महत्त्वाच्या व्यक्तीविषयी काम करत आहोत. आम्ही कुठला आरोप केलेला नाही. ही सारी कागदपत्रं आरओसीची आहेत. आम्ही फक्त तथ्य समोर ठेवलं आहे. ज्या काळात आम्ही जगत आहोत आणि पाहत आहोत की, पत्रकारिता कशा प्रकारे होत आहे, त्या काळासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे.

सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं असतं. पण आम्हाला वाटलं नव्हतं की, इतका मोठा परिणाम होईल. आपल्याला सरकारच्या धोरणांची चिकित्सा केली पाहिजे, ती धोरणं कशी लागू केली जात आहेत हे पाहिलं पाहिजे. जे वायदे सरकारने केले आहेत, ते पूर्ण केले जात आहेत की नाहीत. या सर्वांवर नजर ठेवणं ही पत्रकारिता आहे.

मी फक्त भाजप सरकारविषयी बोलत नाही. हे मी यूपीएच्या कार्यकाळातही केलं होतं. राहता राहिली दबावाची गोष्ट, तर या प्रकारच्या बातम्या करताना नेहमीच दबाव असतो. लोक तुम्हाला फोन करूनही सांगतात की, ही बातमी करू नका.

या बातमीसाठी मला हेही सांगितलं गेली होतं की, ‘सावध रहा’. मला माहीत नाही की, ‘सावध रहा’चा त्या लोकांचा काय अर्थ होता. लोक तुम्हाला सांगतात, ही बातमी करण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. वाईट परिणाम होऊ शकतात.

मलाही या गोष्टीची माहिती आहे. मी ट्विटर यासाठी सोडलं की, याआधीही माझ्याविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं ट्विटर सोडणं हा सर्वांत चांगला निर्णय होता. कारण ज्या लोकांना सत्य माहीत नाही तेही बोलणार आणि ज्यांना ट्रोलिंग, दुष्प्रचार करायचा आहे, तो तेही करणार.

ही बातमी करण्यासाठी जेवढा दबाव होता, तेवढा कधीच पाहिला नाही. उदा. मी रॉबर्ट वड्रावर बातमी केली होती, तेव्हा या प्रकारचा दबाव नव्हता. ती बातमी मी फारच सहजपणे केली आणि केल्यानंतरही आताच्या सारख्या प्रतिक्रिया अनुभवायला मिळाल्या नाहीत.

याआधी मी आनंदीबेन पटेल यांच्या मुलीची बातमी केली होती, तेव्हाही इतका दबाव नव्हता. पण ही बातमी केल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यामुळे मी प्रोत्साहित झाले आहे.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

मी शक्यतो सोशल मीडियावर काही लिहीत नाही. फेसबुक आणि ट्विटरवर माझी खाती आहेत, पण मला हे लिहावं लागलं, कारण ज्या प्रकारची चर्चा होत आहे आणि एक महिला पत्रकार म्हणून मला वाटतं महिलांना नेहमीच लक्ष्य केलं जातं.

 ‘मी फक्त माझं काम करत आहे’ असं सांगणारी एक सशक्त महिला कुणालाच आवडत नाही. ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया महिला पत्रकारांना सहन कराव्या लागतात, त्या कधीच पुरुष पत्रकारांना सहन कराव्या लागत नाहीत. त्यामुळे मला उत्तरादाखल जे बोलायचं होतं, ते मी फेसबुकवर बोलले आहे.

रॉबर्ट वड्रांची बातमी केली होती, तेव्हा सोशल मीडिया इतका सक्रिय झालेला नव्हता आणि सरकारकडूनही इतका दबाव नव्हता की, मंत्री एक बेवसाईट आणि पत्रकाराला लक्ष्य करत आहेत. मानहानीचीही कुठली केस झालेली नव्हती आणि नंतर काम करण्यातही कुठला त्रास झाला नाही. मी सहजपणे टुजी आणि कॉमनवेल्थच्या बातम्या केल्या.

त्या वेळी भाजपच्या अनेक मंत्र्यांचे फोन आले होते की, कुणी पत्रकार करत नाही, तुम्ही खूप बहादुरीचं काम केलं आहे. मला खूप धन्यवादही दिले होते. मी हे सांगत नाही की, कुणी माझं कौतुक करावं. मी फक्त माझं काम करत आहे.

मला फक्त पत्रकारितेला स्वातंत्र्य असावं असं वाटतं.

हिंदीवरून अनुवाद - टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

मूळ हिंदी लेखासाठी पहा -

http://thewirehindi.com/21168/rohini-singh-journalism-jay-amit-shah-bjp-robert-vadra-narendra-modi-congress-press-freedom/

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......