देशभक्त होण्याचे वीस फंडे
संकीर्ण - विनोदनामा
प्रियदर्शन, अनुवाद - टीम अक्षरनामा
  • जेएनयूसमोर निदर्शने करणारे काही देशभक्त
  • Sat , 22 October 2016
  • देशभक्त बाबा रामदेव महात्मा गांधी नथुराम गोडसे Deshbhakta Baba Ramdev Mahatma Gandhi Nathuram Godse

१. जोरजोरात म्हणा, भारत माता की जय.

२. मध्य-मध्ये एखाद्या लेखकाला वा बुद्धिजीवीला मारहाण करत रहा.

३. तुमच्या दृष्टीनं एखाद्या पुस्तकात वा कलाकृतीमध्ये काही राष्ट्रविरोधी असेल तर तत्काळ त्याचा विरोध करा, ते जाळून टाका किंवा त्याची मोडतोड करा.

४. कुणी म्हणत असेल देश आपल्या नागरिकांवर अन्याय करत आहे, तर त्याला ‘नक्षलवादी’ ठरवा.

५. कुणी जर कामगार किंवा शेतकऱ्यांविषयी बोलत असेल तर त्याला ‘विकासविरोधी’ ठरवा.

६. आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला की, योग्यतेचा मुद्दा काढा. दलित, अल्पसंख्याक आणि मागासलेले यांना मध्ये-मध्ये त्यांची लायकी सांगा.

७. सकाळी पार्कमध्ये जाऊन जोरजोरात हसा, योगा करा, बाबा रामदेव यांची मॅगी खा, त्यांनी सांगितल्यानुसारच श्वास घ्या आणि सोडा.

८. पाकिस्तानला पुन्हा पुन्हा शिव्या द्या.

९. क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा झेंडा घेऊन फिरा, गालावर तिरंगा छापवून घ्या.

१०. लोकशाहीला दोष देताना म्हणा की, सारी गडबड मतांच्या राजकारणामुळे होत आहे.

११.  नेहरूंना शिव्या द्या आणि म्हणा की, पटेल हा देश चांगला चालवू शकले असते.

१२. गांधींना महात्मा माना, पण गोडसेला त्यांच्यापेक्षा मोठा महात्मा माना, त्याच्या मूर्त्या लावा, त्याच्या फाशीचा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करा.

१३. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकारावर विश्वास ठेवा, पण भक्तीचा अधिकार त्यापेक्षा जास्त मोठा माना.

१४. गायीला रस्त्यावर भटकू द्या, पॉलिथीन पिशव्या खाऊ द्या, पण गोहत्या आणि गायींचा व्यवसाय करणाऱ्यांवर पहारा ठेवा, गरजेनुसार त्यांची धुलाईही करा.

१५. महिलांचा सन्मान करा, त्यांना उत्तेजक कपडे घालू देऊ नका, त्यांना घरातच ठेवा, त्यांना पतिव्रता आणि धर्मपरायण होण्याचं शिक्षण द्या.

१६. गीता, वेद, महाभारत, रामायण वाचा अगर वाचू नका, पण रीतिरिवाज आणि परंपरांचा हवाला देताना सत्यनारायण कथा, अनेक प्रकारची व्रतं-उपवास करत, करवत रहा.

१७. देशाला एखाद्या हुकूमशहाची किंवा सैनिकी सरकारची गरज असल्याचं सांगा.

१८. वर्तमानपत्र वाचू नका, पुस्तक वाचू नका, संविधान वाचू नका, एक निनावी ट्विटर अकाउंट सुरू करा आणि जो देश व समाज बदलण्याचा विचार करत असेल, त्याला धमकवा.

१९.  विचारही करा आणि वादही करा, पण जो तुमचं मानणार नाही किंवा ऐकणार नाहीत त्याचं थोबाड फोडा.

२०. फक्त देशासाठी जगा, देशाचा विचार करा आणि देशासाठी एखाद्याचा जीव घ्यायलाही तयार रहा.

 

(http://khabar.ndtv.com या ऑनलाइन संकेतस्थळावरील ‘बात पते की’ या ब्लॉगवर १५ फेब्रुवारी २०१५ रोजी लिहिलेल्या लेखाचा मराठी अनुवाद.)

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......