देशभक्त होण्याचे वीस फंडे
संकीर्ण - विनोदनामा
प्रियदर्शन, अनुवाद - टीम अक्षरनामा
  • जेएनयूसमोर निदर्शने करणारे काही देशभक्त
  • Sat , 22 October 2016
  • देशभक्त बाबा रामदेव महात्मा गांधी नथुराम गोडसे Deshbhakta Baba Ramdev Mahatma Gandhi Nathuram Godse

१. जोरजोरात म्हणा, भारत माता की जय.

२. मध्य-मध्ये एखाद्या लेखकाला वा बुद्धिजीवीला मारहाण करत रहा.

३. तुमच्या दृष्टीनं एखाद्या पुस्तकात वा कलाकृतीमध्ये काही राष्ट्रविरोधी असेल तर तत्काळ त्याचा विरोध करा, ते जाळून टाका किंवा त्याची मोडतोड करा.

४. कुणी म्हणत असेल देश आपल्या नागरिकांवर अन्याय करत आहे, तर त्याला ‘नक्षलवादी’ ठरवा.

५. कुणी जर कामगार किंवा शेतकऱ्यांविषयी बोलत असेल तर त्याला ‘विकासविरोधी’ ठरवा.

६. आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला की, योग्यतेचा मुद्दा काढा. दलित, अल्पसंख्याक आणि मागासलेले यांना मध्ये-मध्ये त्यांची लायकी सांगा.

७. सकाळी पार्कमध्ये जाऊन जोरजोरात हसा, योगा करा, बाबा रामदेव यांची मॅगी खा, त्यांनी सांगितल्यानुसारच श्वास घ्या आणि सोडा.

८. पाकिस्तानला पुन्हा पुन्हा शिव्या द्या.

९. क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा झेंडा घेऊन फिरा, गालावर तिरंगा छापवून घ्या.

१०. लोकशाहीला दोष देताना म्हणा की, सारी गडबड मतांच्या राजकारणामुळे होत आहे.

११.  नेहरूंना शिव्या द्या आणि म्हणा की, पटेल हा देश चांगला चालवू शकले असते.

१२. गांधींना महात्मा माना, पण गोडसेला त्यांच्यापेक्षा मोठा महात्मा माना, त्याच्या मूर्त्या लावा, त्याच्या फाशीचा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करा.

१३. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकारावर विश्वास ठेवा, पण भक्तीचा अधिकार त्यापेक्षा जास्त मोठा माना.

१४. गायीला रस्त्यावर भटकू द्या, पॉलिथीन पिशव्या खाऊ द्या, पण गोहत्या आणि गायींचा व्यवसाय करणाऱ्यांवर पहारा ठेवा, गरजेनुसार त्यांची धुलाईही करा.

१५. महिलांचा सन्मान करा, त्यांना उत्तेजक कपडे घालू देऊ नका, त्यांना घरातच ठेवा, त्यांना पतिव्रता आणि धर्मपरायण होण्याचं शिक्षण द्या.

१६. गीता, वेद, महाभारत, रामायण वाचा अगर वाचू नका, पण रीतिरिवाज आणि परंपरांचा हवाला देताना सत्यनारायण कथा, अनेक प्रकारची व्रतं-उपवास करत, करवत रहा.

१७. देशाला एखाद्या हुकूमशहाची किंवा सैनिकी सरकारची गरज असल्याचं सांगा.

१८. वर्तमानपत्र वाचू नका, पुस्तक वाचू नका, संविधान वाचू नका, एक निनावी ट्विटर अकाउंट सुरू करा आणि जो देश व समाज बदलण्याचा विचार करत असेल, त्याला धमकवा.

१९.  विचारही करा आणि वादही करा, पण जो तुमचं मानणार नाही किंवा ऐकणार नाहीत त्याचं थोबाड फोडा.

२०. फक्त देशासाठी जगा, देशाचा विचार करा आणि देशासाठी एखाद्याचा जीव घ्यायलाही तयार रहा.

 

(http://khabar.ndtv.com या ऑनलाइन संकेतस्थळावरील ‘बात पते की’ या ब्लॉगवर १५ फेब्रुवारी २०१५ रोजी लिहिलेल्या लेखाचा मराठी अनुवाद.)

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......