मराठा आरक्षण मोर्चे आणि सामाजिक दुभंग 
पडघम - राज्यकारण
देवेंद्र शिरुरकर
  • मराठा आंदोलन
  • Mon , 13 August 2018
  • पडघम राज्यकारण मराठा समाज Maratha Community आरक्षण आंदोलन Maratha Reservation मराठा क्रांती मोर्चा Maratha Kranti Morcha

ग्रामीण जीवनशैली, कृषि संस्कृतीबद्दल जिव्हाळा असलेल्या अनेकांना हल्ली ‘चेंज’ म्हणून खेड्यापाड्यात, बांधावर वास्तव्य करावेसे वाटते. त्यांची ही गरज ‘ॲग्री-टुरिझम’च्या माध्यमातून पूर्णत्वास जात असते. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध जमिनीवर अशी नाटकी शेती करण्याची वेळ आपल्यावर का आली, याचा विचार त्या जमीनमालकाने आणि अवघ्या व्यवस्थेच्या परिचालनाचा डोलारा सांभाळणाऱ्या कृषि संस्कृतीची अशी गत का झाली, याचा विचार चेंज म्हणून गावाकडचा रस्ता धरणाऱ्यांनी करावा.

समाजव्यवस्थेच्या उपजत रचनेतील आधुनिकीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेले बदल आज सर्वच पातळ्यांवर किती उथळ ठरले आहेत, याचा प्रत्यय आपण प्रत्येक दिवशी घेतच आहोत. अर्थात याचा दोष कोणा एकावर फोडता येत नाही, पण या अपयशाचे ओझे उचलायला सर्वांचेच खांदे कमी पडतील. स्वयंपूर्ण आणि सर्वसमावेशक रचनेतील भक्कम अशी चौकट कशा-कशामुळे ढासळली, याचा शोध कधीतरी घ्यायलाच हवा. याच कृषि संस्कृतीचा भाग असलेली श्रावणापूर्वीची अमावास्या दिव्याची अमावास्या म्हणून साजरी व्हायची. जिला आज ‘गटारी’ हे नामाभिधान प्राप्त झाले आहे.

नजर पडेल तिकडे हिरव्यागार पिकांचे विहंगम दृश्य ज्याच्या एकरभर रानातही पाहावयास मिळायचे, तो त्या रानाचा धनी ‘शेतकरी’ या एकाच व्याख्येने संबोधित केला जात असे. एवढे पिकवणारा कष्टकरी व्यक्ती त्याच्या अंगावरच्या कपड्यांमुळे नाही तर खळ्यावर देतानाच केवळ दिसून यायचा. त्याची जात कोणती, हा प्रश्नच निर्माण व्हायचा नाही. त्याची श्रीमंती केवळ दातृत्वावरून आणि ग्रहणात पसापसा धान्य वाटतानाच दिसून यायची. वावरासमोरून ये-जा करणाऱ्या कोणाही व्यक्तीला कोरभर भाकर आणि रानमेवा हक्काने खाऊ घालणारा तो रानमालक अशी ओळख असलेल्या स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची, सामाजिक रचनेची एवढी वाताहात व्हावी की, पिकवणाऱ्यानेच अवेळी मातीशी एकरूप व्हायची स्पर्धा करावी?

याला नक्की जबाबदार कोण? एवढ्या समृद्ध व सक्षम व्यवस्थेसमोरील आव्हाने कालानुरूप पेलण्यासाठी पूरक यंत्रणा, पर्याय न देऊ शकणारे राज्यकर्ते अधिक जबाबदार? का व्यवस्थेतील सुव्यवस्थित जबाबदाऱ्या विनातक्रार पार पाडणाऱ्या समाजघटकांत जातीय अस्मितांचे अंगार पेटवण्याचा कावा ओळखू न शकणारे आपण सर्व जबाबदार? अठरापगड जातीचा समाज एका सुराज्यात बांधणारी राज्यसंस्था निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, हाच प्रवाह आध्यात्मिक प्रेरणेत जोडणारा भागवत संप्रदाय पाठीशी असताना केवळ काहीजणांच्या सत्ताकांक्षांना बळी पडत आपण महापुरुषांची विभागणी करतो आहोत का?

मातीची विभागणी व्हायला लागली, तिला पर्याय देण्यात अपयश आलेल्यांनी मग जातीची विभागणी करायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या जातीय अस्मितांना खतपाणी घालत आजवर अनेक पंचवार्षिक पचवण्यात आल्या. आपल्याच घराचे कोटकल्याण करणाऱ्यांनी जातीत अन् मातीत विष कालवले, हे उमजूनही या सामाजिक दुभंगाला आपण बळी पडतो आहोत.

केवळ एकगठ्ठा मतदानासाठी आजवर प्रत्येक जातीघटकांना गोंजारण्यात आले; पण त्या-त्या जातीसमूहातील प्रश्न, त्यांच्या समस्या वर्षानुवर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आल्या. त्यामुळेच आज प्रत्येक समूहातील सर्व स्तरांवरील आर्थिक मागासलेपण, संधी नाकारल्या जात असल्याची भावना रस्त्यांवर उतरून सांगावी लागत आहे. व्यवस्थेतल्या प्रदीर्घ काळ उपेक्षित घटकाचे सर्वांगीण उणेपण दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग म्हणून अंगिकारण्यात आलेल्या आरक्षणाची तरतूद सर्वमान्य आहेच. पण आजवर विश्वस्त भावनेने व्यवस्थेतील आपापली विहित कर्म करणाऱ्या प्रत्येक जातीसमूहातील विकासापासून वंचित राहिलेल्यांचेही प्रश्न महत्त्वाचेच आहेत. 

बदलत्या अर्थकारणात व जागतिकीकरणाच्या प्रवाहात सुस्थिर म्हणवल्या जाणाऱ्या घटकांवर आज उपेक्षितांचे जिणे जगण्याची वेळ आलेली आहे. त्यांचेही उपशमन करणे काळाची गरज आहे.  निव्वळ भूलथापा देऊन, समाजकल्याण योजनांचा मारा करून व्यवस्थेसमोरील प्रश्न कधीच सुटत नसतात. समस्या निराकरणासाठी पर्यायी यंत्रणा, कल्पक व अभिनव पर्याय राबवण्याची तयारी असलेली राज्यसंस्था असावी लागते. राज्यसंस्थेचा असा अन्वयार्थ ठाऊक असणाऱ्या सजग राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीलाही अनन्यसाधारण स्थान असते. अठरापगड जातीसमूहांच्या ध्रुवीकरणासाठी केवळ त्यांच्या आकांक्षांना गोंजारून चालत नाही, विकासाचा प्रवाह त्यांच्या कुंपणा, घरा-दारापर्यंत पोहोचवण्याचे धारिष्ट्यही अंगी असावे लागते. विकासाची ग्वाही देण्यात आलेल्या कुठल्याच समूहाच्या आकांक्षा आजवर सिद्धीस गेलेल्या नाहीत, केवळ हा असंतोष जागा राहील व त्याचे राजकीय लाभ उचलता येतील, याचीच काळजी घेण्यात आलेली आहे. आता या समूहांना न्याय हवा आहे. 

मागासलेपण आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनात काळानुरूप झालेले परिवर्तन पाहता राज्यसंस्थेने विकासापासून उपेक्षित सर्व जातीसमूहांना न्याय द्यायलाच हवा. पण एका सुव्यवस्थित, सर्वसमावेशक जीवनशैलीची क्षमता असलेल्या कृषिसंस्कृतीच्या वाताहातीमागील कारणेही शोधायला हवी आहेत. नित्यनूतन संशोधन व नवनवे उपक्रम यांची देशाला गरज आहेच, ती कोण नाकारते आहे? पण देशातल्या प्रत्येकाच्या पोटाची गरज भागवणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे ही सर्वाधिक प्राधान्यक्रमाची गरज आहे, हे प्रधानसेवकांना कोणीतरी सांगायलाच हवे आहे. पिकवणाऱ्याच्या घामाला योग्य दाम नसेल तर अन्य लकाकीस काजळी चढत असते. अशा वेळी अमावास्येच्या रात्री दीप कुठून उजळणार आणि नव्या भारताची पहाट कशी उगवणार? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

vishal pawar

Mon , 13 August 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......