हे पुस्तक नवीन पिढीतील पालकांनी, शिक्षकांनी आणि एकुणच मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने नक्की वाचावे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सचिन नलावडे
  • ‘डॉ. मारिया माँटेसरी’ - वीणा गवाणकर
  • Sat , 19 August 2023
  • ग्रंथनामा शिफारस मारिया माँटेसरी Maria Montessori वीणा गवाणकर Veena Gavankar

बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या ‘डॉ. मारिया माँटेसरी’ यांचा जीवनपट उलगडणारे  वीणाताई गवाणकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचून झाले. तसे आकाराने पाहायला गेले, तर हे  पुस्तक छोटं आहे, पण जसजशी पाने उलटत गेलो, तसे बऱ्याच ठिकाणी थांबून विचार करायला भाग पाडणारे मुद्दे समोर आले. विशेषत्वाने बालशिक्षणात काम करताना मूलभूत विचारसरणी काय असावी? तिची दिशा काय असावी? याचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक मोलाचे आहे.

मला या पुस्तकातून काय शिकायला मिळाले, या अंगाने लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. माँटेसरी पद्धत योग्य की अयोग्य, ती आता कालबाह्य आहे की नाही, या प्रश्नात न पडता, या पुस्तकाचा मला रोज मुलांच्या सहवासात असताना, काम करताना उपयोग होईल, या दृष्टीकोनातून मी वाचन केले.

वीणाताईंनी ‘बालशिक्षण’ केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कराविशी वाटते. वीणाताईंचे लेखन ती त्या व्यक्तिमत्त्वाची नुसती गोष्ट नसते, नुसती माहिती नसते किंवा नुसते ज्ञान ही नसते, तर गोष्ट, माहिती, ज्ञान यांच्या मर्यादा ओलांडून वाचकाच्या आयुष्याला भिडणारे आणि त्याच्या संवेदना जागृत करून वाचकांच्या मनामध्ये सकारात्मक बदल घडवते, म्हणूनच त्यांची पुस्तके आयुष्यभर सोबत करतात, वाचणाऱ्यांचं आयुष्य घडवतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

या पुस्तकातील पुढील तीन टप्पे महत्त्वाचे वाटतात-

१) मारिया माँटेसरी यांचे शिक्षण

२) बालशिक्षण हे जिवीत कार्य होण्याचा प्रवास

३) माँटेसरी शिक्षण प्रणालीची निर्मिती आणि त्या प्रणालीचा जगभर प्रसार.

मारिया माँटेसरी यांचे शिक्षण

साधारण युरोपातील एका बाजूला विज्ञान-संशोधन भरभराटीला येण्याचा हा काळ, तर  दुसरीकडे (१८८३ ते १८९४) स्त्रियांना माणूस म्हणून जगण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी असलेली सामाजाची मानसिकता, यात कमालीचा विरोधाभास होता. याला इटली हा देशही अपवाद नव्हता. मारिया यांना शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अडचणी आणि तितक्याच जिद्दीने त्यावर त्यांनी केलेली मात विलक्षण आहे.

स्त्रियांनी एकटीने रस्त्यावर वावरणं-फिरणं यावर बंदी असतानाच्या काळात मारियाचा इटली देशातील ‘पहिली स्त्री डॉक्टर’ होण्याचा प्रवास खूप काही शिकवून जातो. एक पालक म्हणून मारियाच्या आईचा रेनिल्देचा असलेला खंबीर पाठींबा, त्या काळात मुलीला हवं ते शिक्षण मिळावे म्हणून करावा लागलेला संघर्ष वाचताना सर्व घटना समोर घडत आहेत, असा भाव निर्माण होतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आजपर्यंत लाखो मुलांना ज्या व्यक्तीमुळे शरीरस्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचा विचार करणाऱ्या शिक्षण पद्धतीचा लाभ मिळाला, तिच्या आईला सलाम. आपली लेक नव्या वाटेने जाऊ पाहतेय, हेच रेनिल्देसाठी महत्त्वाचं होतं. आणि त्यासाठी ती मारियाला ज्या पद्धतीने प्रोत्साहन आणि पाठिंबा देत होती, तो भाग कमालीचा वाचनीय आणि पालकांसाठी अनुकरणीयही आहे.

शिक्षण ते बालशिक्षण प्रवास

हा टप्पा मला स्वतःला खूपच शिकवणारा आहे, असे वाटले. वाचता वाचता मध्येच एखादे वाक्य एवढे विचारप्रवर्तक वाटायचे की, तिथेच थांबावे, त्याचे अनुकरण करावे आणि मग पुढे जावे, तरच हे वाचण्याला अर्थ आहे, असे वाटायचे. मारिया डॉक्टर झाल्या, रुग्णालयात शल्यविशारद म्हणून काम करू लागल्या, स्वतःच्या खाजगी क्लिनिकमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करू लागल्या... इतकी कामे करत असताना परिचारिका, स्वयंपाकीण, घरातील कामाची मदतनीस अशा सगळ्या भूमिका एकाच वेळी त्या लीलया पार पाडत.

विशेषतः ही कामे चालू असताना मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलांसोबत काम करताना त्यांना आलेला अनुभव आणि त्यापासून त्यांना ‘मुलांच्या बौद्धिक विकासाचा मार्ग हातापासून सुरू होतो’, हे सापडलेले सूत्र वाचून अंगावर काटा आला, कारण या एका सूत्रावर माँटेसरी प्रणाली निर्माण झाली आहे. या टप्प्यावर त्यांनी अविकसित बुद्धीच्या मुलांसंबंधी वाचन करायला, पूर्वी झालेले संशोधन, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

सर्वच वयोगटांत आक्रमकता व हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वाढत्या वयातील मुलं-मुली यांच्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे

२०००च्या सुरुवातीला आयटीमध्ये काम सुरू केलेल्या पिढीने आयुष्यात नक्की काय मिळवले? गुलामगिरी!

भारतात कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर अजूनही पुरेसं शास्त्रोक्त पद्धतीचं काम झालेलं नाही. भारतीयांच्या अ-वैज्ञानिक दृष्टीकोनसुद्धा यासाठी कारणीभूत आहे

लोक खूप आहेत, पण नाती नाहीत, ही भारतीयांची शोकांतिका आहे. तुम्हाला लाखो-करोडो रुपये किंवा सोशल मीडियावरचे लाखो-करोडो Followers आनंद देऊ शकत नाहीत!

.................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या पूर्वार्धात वीणाताईंनी तत्कालीन विविध शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा ज्यांनी ज्यांनी बालशिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि ज्यांच्या संशोधनाचा मारियावर प्रभाव होता, त्यांच्या कार्याचे विवेचन केले आहे. या सर्व शिक्षणतज्ज्ञांचा, त्यांच्या  संशोधनाचा मारिया यांनी अभ्यास केला आणि ते काम पुढे नेले. त्यामुळे हा टप्पा विशेष करून शिक्षक आणि संवेदनशील पालकांसाठी महत्त्वाचा आहे. या टप्प्यात मारीया यांचे अध्यापनशास्त्र आणि त्याचे मूलभूत तत्त्व याविषयी सखोल अभ्यास सुरू झाला आणि बालशिक्षण हे त्यांचे जिवीत कार्य झाले.

डॉ. मारिया मॉंटेसरी यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीयशास्त्र, मानववंशशास्त्र, अध्यापनशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक अभ्यासविषयांचा, संशोधनाचा समग्र विचार करून स्वतःची अशी एक  नवीन शिक्षणप्रणाली निर्माण करण्यासाठी उपयोग करून घेतला.

माँटेसरी प्रणालीचा विकास आणि प्रसार

या तिसऱ्या टप्प्यात मारिया यांनी वस्ती पातळीवरील मुलांसोबत काम करून त्यांची अतिशय बारकाईने निरीक्षणे नोंदवली. त्यातून मुले मोकळ्या वातावरणात, स्वयंशिस्तीने व शांतपणे काम करतात, इतकेच नव्हे, तर ते करत असताना त्यांचा बौद्धिक विकास पण नैसर्गिक पद्धतीने घडत आहे, हे लक्षात आले. या निरीक्षणांवर विचार करून, त्याच्या नोंदी करून इंद्रिय जाणिवा वाढवणारी अनेक अध्यापन साधने त्यांनी विकसित केली, हे या भागात जाणून घेता येते.

ही साधने मुलांच्या नैसर्गिक कुतूहलाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी होती, किंबहुना आहेत असे म्हणता येईल. त्या काळात मोंटेसरी यांचे या शिक्षणाच्या अनोख्या पद्धतीवर तत्कालीन वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांमधून लेख छापून यायला लागले. शिक्षणाच्या या नवीन  प्रणालीवर शाळा स्थापन करणे, शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करणे, शिक्षण परिषदा भरवणे, शैक्षणिक साहित्याची प्रदर्शने भरवणे, हे सर्व काम जोमाने सुरू झाले.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २० ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

जगभरात पूर्वीची शिक्षण पद्धती बदलून माँटेसरी पद्धती कुठे कुठे आणि कशी स्वीकारली गेली, याचे, त्याचबरोबर त्या काळात त्यांनी केलेला जगभर प्रवास, आपली शिक्षणपद्धती  सुस्थापित करण्यासाठी घेतलेले कष्ट याचा आढावा या टप्प्यात वाचायला मिळतो.

कोणत्याही प्रकारची प्रभावी संपर्क साधने आणि माध्यम नसतानाही या शिक्षण पद्धतीचा जगभर झालेला विस्तार खरोखर अचंबित करणारा आहे. ‘शिक्षकानं काय शिकवलं यातून नव्हे, तर स्वतः तिने काय केले यातून ती व्यक्ती घडते’, हे  मारिया यांचे या भागातील वाक्य खूपच महत्त्वाचे आहे.

त्या काळी शिक्षकाला निरीक्षकाची भूमिका घ्यायला लावणारा त्यांचा विचार खूपच क्रांतिकारक होता. शिक्षण हे शांततेसाठीचे साधन आहे, असे त्या मानत. अशा विचारांमुळे त्यांची भारताशीसुद्दा नाळ जोडली गेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जवळ जवळ दहा वर्षे डॉ. माँटेसरी यांचे वास्तव्य भारतात होते. त्यांचे काम त्याआधीच भारतात पोहचले होते, पण त्यांच्या या वास्तव्यात बालशिक्षणाच्या या नवीन प्रणालीची पाळेमुळे चांगलीच रुजली. त्याविषयी या भागात सविस्तर वाचायला मिळते.

हे पुस्तक नवीन पिढीतील पालकांनी, शिक्षकांनी आणि एकुणच मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने नक्की वाचावे. हे पुस्तक पालक व शिक्षक यांच्यासाठी खूप मार्गदर्शक आहे. नवीन गोष्टी शिकण्याची शोधक वृत्ती व नवनिर्मितीचा ध्यास घेण्याची सवय जडायलाही, हे पुस्तक ‘कारक’ ठरू शकते.

‘डॉ. मारिया माँटेसरी’ - वीणा गवाणकर

इंडस सोर्स बुक्स, मुंबई | मूल्य - २९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......