डॉ. श्रीराम लागू - ‘athlete philosopher’ असलेला कलावंत!
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • डॉ. श्रीराम लागू : जन्म - १६ नोव्हेंबर १९२७, सातारा; मृत्यू १७ डिसेंबर २०१९, पुणे
  • Wed , 18 December 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली डॉ. श्रीराम लागू Shreeram Lagoo नटसम्राट Natsamrat

प्रख्यात रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांचे काल रात्री पुण्यात वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. डॉ. श्रीराम लागू एक प्रख्यात रंगकर्मी, चित्रपट अभिनेते आणि बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर सामाजिक संघटना, चळवळीमध्येही त्यांनी हिरिरीने सहभाग, पुढाकार घेतला. आपल्याला पटलेल्या, योग्य वाटलेल्या भूमिका त्यांनी ठोसपणे मांडल्या. त्यांविषयी कुणाचीही भीडभाड न बाळगता किंवा कसलीही भीती न बाळगता ते आयुष्यभर परखडपणे बोलत राहिले. नाटक-चित्रपट या सर्जनशील क्षेत्रांत राहूनही डॉ. लागू माणसाकडे बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीने पाहत. माणसाने सतत उत्क्रांत होत राहिले पाहिजे, प्रगत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे म्हणत. त्यासाठी त्याने बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी झाले पाहिजे असे सांगत. त्यासाठीच ते ‘परमेश्वराला रिटायर’ करायलाही सांगत. कारण ‘तोपर्यंत आपण समाज म्हणून उभे राहू शकणार नाही’ असे त्यांना वाटे. ते प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत. त्यामुळे त्यांची भूमिका बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी राहून त्यात एक प्रकारची सुसंगती राहिली. कलावंताने ‘athlete philosopher’ असले पाहिजे असे डॉ. लागू नेहमी म्हणत. ते स्वत: तसेच होते. त्यानुसारच जगले, वागले.

डॉ. लागूंच्या आयुष्याची, कारकिर्दीची ही एक चलत्-चित्रांच्या माध्यमांतली झलक

२०१५ साली डॉ. लागूंची ‘बालचित्रवाणी’वर एक छोटशी मुलाखत झाली होती. या मुलाखतीमध्ये डॉ. लागूंनी त्यांच्या पहिल्या नाटकाचा अनुभव सांगितला आहे. वयाच्या ८८व्या वर्षी आयुष्याकडे मागे वळून पाहताना आणि खासकरून मुलांसाठी मुलाखत देताना डॉ. लागू जे बोलले आहेत, ते मोठ्यांच्याही जाणीवेमध्ये भर घालणारे आहे.

डॉ. लागूंनी मराठी-हिंदी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतरची ही एक मुलाखत. डॉ. लागू ‘द किंग ऑफ थिएटर’ म्हणून ओळखले जात. त्या नाटकाविषयी डॉ. लागूंचे बोल या मुलाखतीमधून जाणून घेता येतात. शिवाय चित्रपटांविषयीही त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे.

डॉ. लागूंच्या काही अजरामर भूमिकांपैकी एक म्हणजे ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पा बेलवलकर. त्याविषयीचा हा व्हिडिओ. डॉ. लागूंच्या अभिनयाची ताकद समजून घेण्यासाठी वा त्याचा पुनर्प्रत्यय घेण्यासाठी हा पाहावाच असा व्हिडिओ आहे.

‘परमेश्वराला रिटायर करा’ असा खणखणीत इशारा देणाऱ्या डॉ. लागूंनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’साठी अनेक वर्षं काम केले. या चळवळीला ग्लॅमर मिळवून दिले. आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी भूमिकेनुसार या चळवळीचा प्रचार-प्रसार केला. या चळवळीच्या एका कार्यक्रमासाठी अंधश्रद्धेविषयी डॉ. लागूंनी केलेले हे छोटेसे भाषण.

डॉ. लागूंना त्यांच्या नाटक-चित्रपटांतील कारकिर्दीबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल अनेक मानसन्मानांनी, पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१३ साली त्यांना त्यांच्या नाटक-चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रभात कंपनीच्या सौजन्याने सुरू झालेला हा पहिलाच पुरस्कार डॉ. लागूंना देण्यात आला. हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच त्याचे मोलही मोठे आहे. या कार्यक्रमाला डॉ. लागू उपस्थित राहिले, पण वयोमानामुळे काही बोलू शकले नाहीत. त्यांच्याविषयी डॉ. जब्बार पटेल, दीपा श्रीराम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

.............................................................................................................................................

डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्राच्या आणि ‘रूपवेध’ या लेखसंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......