डॉ. श्रीराम लागू - ‘athlete philosopher’ असलेला कलावंत!
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • डॉ. श्रीराम लागू : जन्म - १६ नोव्हेंबर १९२७, सातारा; मृत्यू १७ डिसेंबर २०१९, पुणे
  • Wed , 18 December 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली डॉ. श्रीराम लागू Shreeram Lagoo नटसम्राट Natsamrat

प्रख्यात रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांचे काल रात्री पुण्यात वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. डॉ. श्रीराम लागू एक प्रख्यात रंगकर्मी, चित्रपट अभिनेते आणि बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर सामाजिक संघटना, चळवळीमध्येही त्यांनी हिरिरीने सहभाग, पुढाकार घेतला. आपल्याला पटलेल्या, योग्य वाटलेल्या भूमिका त्यांनी ठोसपणे मांडल्या. त्यांविषयी कुणाचीही भीडभाड न बाळगता किंवा कसलीही भीती न बाळगता ते आयुष्यभर परखडपणे बोलत राहिले. नाटक-चित्रपट या सर्जनशील क्षेत्रांत राहूनही डॉ. लागू माणसाकडे बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीने पाहत. माणसाने सतत उत्क्रांत होत राहिले पाहिजे, प्रगत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे म्हणत. त्यासाठी त्याने बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी झाले पाहिजे असे सांगत. त्यासाठीच ते ‘परमेश्वराला रिटायर’ करायलाही सांगत. कारण ‘तोपर्यंत आपण समाज म्हणून उभे राहू शकणार नाही’ असे त्यांना वाटे. ते प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत. त्यामुळे त्यांची भूमिका बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी राहून त्यात एक प्रकारची सुसंगती राहिली. कलावंताने ‘athlete philosopher’ असले पाहिजे असे डॉ. लागू नेहमी म्हणत. ते स्वत: तसेच होते. त्यानुसारच जगले, वागले.

डॉ. लागूंच्या आयुष्याची, कारकिर्दीची ही एक चलत्-चित्रांच्या माध्यमांतली झलक

२०१५ साली डॉ. लागूंची ‘बालचित्रवाणी’वर एक छोटशी मुलाखत झाली होती. या मुलाखतीमध्ये डॉ. लागूंनी त्यांच्या पहिल्या नाटकाचा अनुभव सांगितला आहे. वयाच्या ८८व्या वर्षी आयुष्याकडे मागे वळून पाहताना आणि खासकरून मुलांसाठी मुलाखत देताना डॉ. लागू जे बोलले आहेत, ते मोठ्यांच्याही जाणीवेमध्ये भर घालणारे आहे.

डॉ. लागूंनी मराठी-हिंदी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतरची ही एक मुलाखत. डॉ. लागू ‘द किंग ऑफ थिएटर’ म्हणून ओळखले जात. त्या नाटकाविषयी डॉ. लागूंचे बोल या मुलाखतीमधून जाणून घेता येतात. शिवाय चित्रपटांविषयीही त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे.

डॉ. लागूंच्या काही अजरामर भूमिकांपैकी एक म्हणजे ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पा बेलवलकर. त्याविषयीचा हा व्हिडिओ. डॉ. लागूंच्या अभिनयाची ताकद समजून घेण्यासाठी वा त्याचा पुनर्प्रत्यय घेण्यासाठी हा पाहावाच असा व्हिडिओ आहे.

‘परमेश्वराला रिटायर करा’ असा खणखणीत इशारा देणाऱ्या डॉ. लागूंनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’साठी अनेक वर्षं काम केले. या चळवळीला ग्लॅमर मिळवून दिले. आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी भूमिकेनुसार या चळवळीचा प्रचार-प्रसार केला. या चळवळीच्या एका कार्यक्रमासाठी अंधश्रद्धेविषयी डॉ. लागूंनी केलेले हे छोटेसे भाषण.

डॉ. लागूंना त्यांच्या नाटक-चित्रपटांतील कारकिर्दीबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल अनेक मानसन्मानांनी, पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१३ साली त्यांना त्यांच्या नाटक-चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रभात कंपनीच्या सौजन्याने सुरू झालेला हा पहिलाच पुरस्कार डॉ. लागूंना देण्यात आला. हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच त्याचे मोलही मोठे आहे. या कार्यक्रमाला डॉ. लागू उपस्थित राहिले, पण वयोमानामुळे काही बोलू शकले नाहीत. त्यांच्याविषयी डॉ. जब्बार पटेल, दीपा श्रीराम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

.............................................................................................................................................

डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्राच्या आणि ‘रूपवेध’ या लेखसंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......