चीनविषयी आत्ताच एक स्वप्न पाहिलं, स्वप्नात आलं मोदींचं भाषण!
संकीर्ण - व्यंगनामा
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 20 March 2019
  • संकीर्ण व्यंगनामा रविशकुमार Ravish kumar पिचकारी Pichkari नरेंद्र मोदी Narendra Modi चीन China

भाइयों-बहनौं, आम्ही चीनला पिचकारी मारून-मारून रंगवून टाकू. चीननं दहशतवादाची पाठराखण केली आहे. त्याची शिक्षा भोगायला लागेल. आम्ही पाकिस्तानला घुसून मारलं. आता चीनला पिचकारीनं मारू. होळीच्या आधी जेवढ्या काही चिनी पिचकाऱ्या आल्या आहेत, मी प्रत्येक देशभक्ताला आवाहन करतो की, त्यांनी फक्त तीन गोष्टी घेऊन सीमेवर पोहचावं – एक बादलीभर पाणी, रंग आणि चीनची पिचकारी. यावेळी आपण सगळे चिनी पिचकारीनेच चीनच्या सैन्याला इतकं भिजवून टाकू की, शिंकून शिंकून चीनची बोलती बंद होऊन जाईल.

भाइयों-बहनौं, मी सर्व टीव्ही अँकर्सना ट्विट केलं आहे की, त्यांनी टीव्ही स्टुडिओत पिचकारी घेऊन अँकरिंग करावं. आता प्रत्येक भारतीयांसाठी काँग्रेस चीनची समर्थक झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. चीननं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. अँकर्सना आवाहन आहे की, त्यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आलोक आणि राजीव त्यागी यांना रंगांत पूर्ण रंगवून टाकावं. आम्ही बदला घेऊ. हर हर मोदी, घर घर होली!

पंतप्रधानांचं हे भाषण ऐकून मी व्हॉटसअॅप विद्यापीठाकडे वळलो. इनबॉक्समध्ये पडलेली पुस्तकं उलटू लागलो. एका डाव्या प्राध्यापकानं तो भाग गायब केला होता, ज्यात चिनी पिचकारीच्या विरोधाचा इतिहास लिहिलेला होता. सकाळपासून एकही मॅसेज आला नाही की, आज चिनी पिचकाऱ्यांवर बहिष्कार टाकला जाईल. जो भारतीय चिनी पिचकारी विकेल, तो मसूद अज़हरचा जावई असेल. स्वत:चं व्हॉटसअॅप स्टेटस तयार केल्यानंतर ते मी ‘अबकी बार, पिचकारी सरकार’ या ग्रूपवर पाठवून दिलं. तिथून ते व्हायरलं झालं.

चीन नेहमीच दहशतवादाचा मित्र राहिला आहे. आपल्याला चीनची साथ द्यायची नाही. जे लोक चिनी सामान आणून भारताचा पैसा बिजिंगला पाठवतात, आम्ही त्यांना दार्जिलिंगला पाठवू. तिथं त्यांना भारतीय ‘मोमो’ बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. आम्ही चीनला घुमघुम घुमवलं, पण चीननं आम्हाला घुमवलं. आमचं काम झालं आहे. सरदार पटेल यांचा पुतळा आम्ही बनवला आहे. चीनचे इंजिनीअर परत गेले आहेत. भारतीय कामगार बिनपगारी पटेलांचं संरक्षण करू शकतात.

पण आम्ही चीनची ही धमकी ऐकून घेऊ शकत नाही. तेव्हाच टीव्हीवर पंतप्रधानांचं अजून एक भाषण आलं. ते जनतेला विचारत होते - चीन को घर में घुस कर मारना चाहिए कि नहीं? एका अँकरनं आव्हान दिलं. चीनशी युद्धाचे सर्व्हे होऊ लागले. पंतप्रधानांचे समर्थक सीमेवर पिचकारी भरून घेऊन जाताना दिसत होते.

किती काळ आम्ही चीनविषयी चूपचाप बसून राहायचं? नेहरू चूप बसले होते, पण नरेंद्र मोदी चूप बसणार नाहीत. जे नेहरू करू शकले नाहीत, तेच तर मोदी करतात! ते झोपळा झुलवू शकतात, तसाचं झटकाही देऊ शकतात.

तेवढ्यात व्हाटसअॅप विद्यापीठात एक मॅसेज येतो. चीनचा विरोध पिचकारी आणि फुलझडीपर्यंतच मर्यादित ठेवायचा आहे. टीव्ही अँकर्सना चीनसोबत शांततेची बोलणी करायची आहेत. चीननं मसूद अज़हरची साथ देऊन पुलवामाच्या शहिदांचा अपमान केला आहे, हे बोलायचं नाही. ‘चीनबाबत चुप्पी’सारख्या ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर चालवायच्या नाहीत. ‘चीन डर गया भारत से’ किंवा ‘भारत डर गया चीन से’ यासारखे नारे टीव्ही वाहिन्यांवर दिसता कामा नयेत. एकजण न्यूजरूममध्ये जाऊन सर्वांना झापत होता. संपादक ‘मूर्गा’ होऊन बसलेले होते. संपादकांचे मालक अमित शहांकडून ब्रीफकेसमधून सूचना घेत होते. ‘जाहिराती’चं नवं नाव ‘सूचना’ असं आहे.

तेवढ्यात कुणीतरी जोरात ओरडतं. पंतप्रधान मोदींचं लाईव्ह टीव्ही वाहिन्यांवर येऊ लागतं. ते म्हणतात - भाइयों और बहनों, काँग्रेसनं शहिदांचा अपमान केला आहे. तिला हरवायचं आहे. म्हणजे चीनचा आपोआप पराभव होईल. आमचं परराष्ट्रीय धोरण इटावापासून बेगुसरायपर्यंत हिट आहे. आम्ही जिंकत आहोत. आम्ही पाकिस्तानला घुसून मारलं आहे. तुम्ही त्यातच हेही समजून घ्या की, आम्ही त्याचा दोस्त पाकिस्तानलाही मारलं आहे. आम्ही एक अधिक एक नाही करत, आम्ही एकाचे चार करतो, एकाचे चार!

मी स्वप्नातून बाहेर येत होतो. झोपेतून हळूहळू जागा होऊ लागलो. खिडकीत बसून पावसाचे थेंब मोजू लागलो. मतदान केंद्रांवर मतदान होत होतं. लोक आपल्या असत्यापासून हरत होते. गावागावात लोक म्हणत होते की, परराष्ट्रनीतीमध्ये मोदी जिंकले आहेत. चिनी पिचकारीनं चीनला हरवलं आहे.

टीव्ही अँकरनं जाहीर केलं, ७० वर्षांत असं कधीही झालं नाही. आज पहिल्यांदा असत्य जिंकलं होतं. मी जागा झालो होतो. व्हॉटसअॅप विद्यापीठाच्या इनबॉक्समध्ये मॅसेजेस पाहत होतो. आतापर्यंत तरी चिनी पिचकारीवरील बहिष्काराचं कुठलंही आवाहन आलेलं नाही. तुमच्याकडे असे मॅसेजेस येत आहेत का?

(स्वैर अनुवाद - टीम अक्षरनामा. रवीश कुमार यांची मूळ हिंदी पोस्ट १४ मार्च १९ रोजी दुपारी १.१९ ला प्रसिद्ध झाली आहे.)

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 21 March 2019

अहो Avadhut Raja, त्या रवीशकुमारांच्या पावलावर पाऊल टाकून मीही थोडीशी भांग घेतली तर काय बिघडलं हो? महाजनांचे अनुकरण करावे, असं लोकं म्हणतात. आपला नम्र, -गामा पैलवान


Avadhut Raja

Thu , 21 March 2019

@टिम अक्षरनामा जिकडे तिकडे आपल्या निर्बुद्ध मतांची पिंका टाकणार्‍यांना आवरा. कमेंट सेक्शन डिसेबल्ड करा. लोकसत्ताने ते बरोबर केले आहे, तुम्ही पण करा. अन्यथा फेसबुक, ट्विटर, काही दैनिकांच्या वेबसाईट्स आणि काही मराठी भाषेच्या फोरम साईट्स वर "बॉट्स" लोकांच्या पातळी घसरलेल्या ज्या चर्चा चालतात त्या इथेही होतील.


Gamma Pailvan

Wed , 20 March 2019

हा लेख म्हणजे होळीच्या तब्बल एक आठवडा आधी भांग घेतल्याचा परिणाम आहे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......