संसदेत नोटकोंडी आणि सामान्यांचा ‘मनी’कल्लोळ
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
कलिम अजीम
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांना अप्रिय असलेली संसद
  • Mon , 12 December 2016
  • अर्थकारण काळा पैसा Black Money नोटा रद्दीकरण Demonetization नरेंद्र मोदी Narendra Modi संसद हिवाळी अधिवेशन Parliament Winter Session

नोटकोंडीवरून संसद-अधिवेशनाचा तिसरा आठवडा कोणत्याही कामकाजाविना पार पडला. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांची अजूनही एकच मागणी आहे - नोटबंदीवर पंतप्रधानांनी सभागृहात बोलावं. यासाठी विरोधकांनी वेगवेगळी आयुधं वापरली, मात्र सरकार ढीम्मच! बुधवारी लोकसभेत, तर गुरुवारी राज्यसभेत पंतप्रधान हजेरी लावतात. गेल्या दोन आठवड्यांमध्ये विरोधकांचा गदारोळ सुरू असताना पंतप्रधान काहीच न बोलता ढम्म बसून होते. दुसऱ्या आठवड्यात लंच आवर सुरू होण्यापूर्वी पीएम राज्यसभेत आले. या वेळी विरोधकांनी ‘पंतप्रधानांनी लंचनंतरही यावं’, अशी मागणी केली. यासाठी बसपच्या मायावतींनी सुमारे आठ मिनिटं खर्च केली, तर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पाच मिनिटं… मात्र पंतप्रधान लंचब्रेकनंतर सभागृहात आलेच नाहीत. या आठवड्यात पंतप्रधानांनी सभागृहात हजेरी न लावता ट्विटरवरून नोटबंदीवर प्रतिक्रिया दिली. असं सांगितलं जातं की, अधिवेशन काळात पंतप्रधानांनी सरकारी निर्णयावर बाहेर बोलू नये. मात्र ते बाहेर जाहीर भाषणात नोटबंदीवर भरभरून बोलतात. विरोधक यावरच आक्षेप घेत आहेत. ‘पंतप्रधान बाहेर बोलतात, तर सभागृहात का बोलत नाहीत? त्यांनी सभागृहात बोलावं’, ही विरोधकांची गेल्या तीन आठवड्यांपासूनची मागणी आहे.  मागणी पूर्ण होत नसल्याने विरोधकही हेकेखोर धोरण अवलंबवत आहेत. त्यामुळे सभागृहाचं कामकाज ठप्प आहे.

संसदेच्या एका दिवसाच्या कामकाजासाठी साधारण दीड कोटी खर्च येतो. असं असताना गेले तीन आठवडे किती पैसे वाया गेले, या संदर्भात सध्या विचारच न केलेला बरा! या संसदकोंडीवर सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते ‘नोटबंदीमुळे विरोधकांचा काळा पैसा वाया गेला आहे. त्यामुळे ते आगपाखड करत आहेत’, यापलीकडे कोणतंच नवं विधान वापरताना दिसत नाहीत, पण वृत्तपत्रांमधल्या बातम्या पाहिल्या, तर भाजप-संबधित पदाधिकारी आणि मंत्री कोट्यवधींच्या जुन्या आणि नव्या नोटांसोबत आढळले आहेत. देशभर महिनाभरात काँग्रेस किंवा अन्य पक्षनेते अशा घटनांमध्ये अडकल्याच्या बातम्या वाचनात नाहीत. त्यामुळे सत्ताधारी वर्गाचा वरील युक्तीवाद मोडीत निघतो.

नोटबंदीनंतर देशभरात 'मनी'कल्लोळ निर्माण झाला आहे. सर्वसामान्यांची खाती अचानक गोठवली गेल्याने जनता सैरभैर झाली आहे. नोकरदार, किरकोळ विक्रेते, कष्टकरी, कामगार वर्ग नोटबंदीमुळे संकटात सापडला आहे. सहकारी बँका, पतपेढ्या यांचा चलन-पुरवठा थांबवल्याने ग्रामीण भागात मोठे हाल सुरू आहेत. ‘नोटबंदीपूर्वी नियोजन हवं होतं. सरकारनं ते न करता नोटबंदी लादली. सरकारचं नोटबंदीचं नियोजन पूर्णपणे फसलं आहे. यावर पंतप्रधानांनी निवेदन द्यावं.’, अशी मागणी विरोधक करत आहे. मात्र सत्ताधारी वर्ग नसते आरोप करून विरोधकांच्या संसदीय अधिकारांची गळचेपी करतो आहे. परिणामी, विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाले असून विरोधकांनी नोटबंदीवरून सरकारला वेठीला धरलं आहे.

नोटबंदीला एक महिना उलटला आहे. तरीही  बँका आणि एटीएमसमोरच्या रांगा काही कमी झालेल्या नाहीत. दुसरीकडे, देशात चलन-तुटवडा असल्याचं अर्थमंत्री कबूल करतात, तर रिझर्व्ह बँक चलन मुबलक प्रमाणात असल्याचं सांगत आहे. ही दोन्ही स्टेंटमेंट्स परस्परविरोधी आहेत. यातून रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यात सामंजस्य नसल्याचं स्पष्ट होतं. परिणामी, सरकारच्या भूमिकेविरोधात प्रश्नचिन्ह उभं राहतं. महिनाभरापासून नोटबंदी आणि नव्या चलनासंदर्भात सतत नवनवे नियम लावले जात आहेत. सतत बदलणारे नियम, अटी-शर्थी सामान्यांना हवालदिल करत आहेत. ठेवीदार आणि गुंतवणूकदार यांची आयुष्यभराची कमाई एका रात्रीत संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

नोटबंदीने सामान्यांच्या नव्या आजारांना निमत्रंण दिलं आहे. देशात बँकांच्या रांगेत उभं राहिल्याने ९०पेक्षा जास्त दगावले आहेत. त्यामुळे नोटबंदीवरून संसदकोंडी करायला विरोधकांना नामी संधी मिळाली आहे. इकडे भाजपशासित राज्यांमध्येही विरोधक विधिमंडळात पूर्ण रूपात अवतरले आहेत. केंद्रात दोन वर्षांमध्ये विरोधकांनी प्रथमच रुद्रावतार धारण केला आहे. तसं पाहता, सत्ताधारी गटातले काही जण नोटबंदीला छुपा विरोध करत आहेत. मात्र वरिष्ठांच्या धास्तीने यावर काहीही बोलायला कचरत आहेत. बुधवारी, ७ नोव्हेंबरला भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी संसदकोंडीवर लोकसभा अध्यक्षांवर भडकले. ‘संसद चालू द्यायची नसेल, तर अधिवेशन स्थगित करा’, अशा कडक शब्दांमध्ये अडवाणींनी पक्षालाच सुनावलं. (यावेळी लोकसभेचं कामकाज टिपणारा कॅमेरा तिसरीकडेच होता, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला फुटेज मिळालं नाही, पण प्रिंट मीडियाने याची बातमी केली), तर शुक्रवारी ९ डिसेंबरला राष्ट्रपतींनी संसदकोंडीवरून सरकारला धारेवर धरलं.

नोटबंदीवर रोजच नव-नवे गौप्यस्फोट होत आहेत. शुक्रवार, ९ डिसेंबरला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ‘मी नोटबंदीवर बोललो, तर देशात भूकंप येईल’, असं विधान केलं, तर याआधी ते नोटबंदीच्या निर्णयाला 'मूर्खपणा' म्हणाले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २४ नोव्हेंबरला नोटीबंदीला 'संघटीत लूट' म्हटलं होतं. नोटबंदीवरचे केजरीवाल, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांचे आरोपही स्फोटक आहेत. नोटबंदीनंतर ४ नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचा भव्य लग्न सोहळा पार पडला. याआधी भाजपचे माजी खासदार आणि खाण माफिया जनार्दन रेड्डींच्या मुलीचं ५०० कोटींचं लग्न पार पडलं. नोटबंदीनंतर इतका पैसा आला कुठून असा प्रश्न मीडियाने अनुत्तरीतच ठेवला. येत्या काळात नोटबंदीवर अजूनही वेगवेगळ्या कॉन्सिपिअरन्सींची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सामान्यांना होत असलेल्या नाहक त्रासाचं काय, या प्रश्नाचं उत्तर सरकारी यंत्रणाआणि बँकींग यंत्रणा देईल का? सामान्यांना होणाऱ्या मनस्तापाचं काय? वेळेच्या अपव्ययाचं काय? लघुउद्योजकांच्या नुकसानीचं काय? हे प्रश्न सुटणार नाही. मात्र या प्रश्नांना देशभक्तीचा मुलामा चढवला जाऊन ‘कळ काढा’ असा सल्ला नक्कीच मिळेल.

नोटबंदीचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे, पण चलन-तुटवड्यामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. पतपेढ्या आणि  सहकारी बँकाकडे पैसा नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. लघुउद्योग ठप्प आहेत. रोजंदारीवरचे कामगार, शेतकरी, कारागीर यांचे व्यवहार उधार-उसनवारीवर सुरू आहेत. काही ठिकाणी रोजगार बंद झाले आहेत. त्यामुळे सरकारला चलन पुरवठा तत्काळ सुरळीत करावा लागेल. बँका आणि एटीएमचे व्यवहार पूर्ववत करावे लागतील. कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेट आणि सायबर-सुरक्षा सक्षम करणं आवश्यक आहे. बँकिंग तक्रारीचा निर्वाळा तत्काळ करावा लागेल. याचबरोबर पर्यायी व्यवस्था, म्हणजे 'कॅशकार्ड' 'कॅशनोट' यांसारखे पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील. नाहीतर संसदेत नोटकोंडी आणि सामान्यांचा ‘मनी’कल्लोळ सुरूच राहील!


लेखक ‘महाराष्ट्र १’ या वृत्तवाहिनीत बुलेटीन प्रोड्यूसर पदावर कार्ररत आहेत.

kalimazim2@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......