शुद्ध राजकारणाचा गलिच्छ खेळ सुरू
पडघम - देशकारण
मुग्धा कर्णिक
  • राम रथयात्रा
  • Thu , 08 February 2018
  • पडघम देशकारण रामराज्य रथयात्रा Ram Rajya Rath Yatra योगी आदित्यनाथ Yogi Adityanath

साडेतीन वर्षे उलटली...

नोकऱ्यांचे पकोडे झाले, ‘अच्छे दिन’च्या बेकार रात्री झाल्या, धान्यधुन्याच्या भावाचे कांदेबटाटे सडले...

आता बिचाऱ्या संघी-भाजपाईंना रामरथयात्रेच्या खेळाचाच आधार उरलाय. जिथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भगवे फडकावत, नावाला एक तिरंगा ठेवत मोहल्ल्यांतून खोट्या कारणांनी दंगे भडकावले जाऊ शकतात, तिथे रामरथयात्रा हा साक्षात दंगल भडकावण्याचा परवानाच. हिंदू ध्रुवीकरणासाठी मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या, पुरोगाम्यांच्या, निधर्मींच्या आणि झालेच तर कुठल्याही विरोधकाच्या रक्ताचा भोवराच फिरवावा लागतो. रथचक्राच्या आऱ्या त्या भोवऱ्याला गती देतीलच.

जगभरात ‘प्रेम दिन’ म्हणून साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेन्टाइन’ दिनाची निवड टाळून त्याच्या आदल्या दिवशीचा मुहूर्त निघाला आहे, या अयोध्या ते कन्याकुमारी यात्रेसाठी. आज (गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी) बाबरी मशीद-रामजन्मभूमी विवादाच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होत आहे. न्या. दीपक मिश्रा, अशोक भूषण आणि अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठासमोर ही प्रलंबित सुनावणी सुरू होत आहे. यांना अपेक्षेप्रमाणे निकाल लागण्याची खात्री असल्यासारखी- ती सुरू असतानाच ही राम रथयात्रा निघते आहे. ही आगळ्याच दर्जाची खेळी शासकीय आशीर्वादाने होत आहे. महाराष्ट्रातील कुणा श्री रामदास मिशन युनिव्हर्सल सोसायटीने या यात्रेचे आयोजन केले असून त्यांचे कार्य सिद्धीस न्यायला विश्व हिंदू परिषद, रास्वसंघ, भारतीय जनता पक्ष आणि भाजपची राज्य सरकारे समर्थ आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्या राज्यांतून ही यात्रा जाणार त्या- उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना ही यात्रा ‘व्यवस्थित’ पार पडावी म्हणून मार्गावर सहकार्य द्यावे असे लेखी कळवले आहे.

एकूण चाळीस दिवसांच्या या यात्रेची अखेर रामेश्वरमला २३ मार्च रोजी होईल. आणि पुढल्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी माती मळली वा रंगली जाईल. ‘राम मंदिर बनाएंगे’चा पुनरुच्चार कसाकसा वाजवला जाईल ते दिसेलच. (दै. ‘जागरण’ या हिंदुत्व बोंबाबोंब-कटिबद्ध असलेल्या माध्यमाने मात्र ही रथयात्रा २०२०पर्यंत चालणार असल्याचे लिहिले आहे. ‘रामराज्य’ आणण्यासाठी असलेली ही यात्रा ‘भाजपराज्य’ आणण्यासाठी काय वाट्टेल तो उत्पात करू शकेल!)

कारसेवकरपुरम् या विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्येतील मुख्यालयातून ही यात्रा मुख्यमंत्री आदित्यनाथ बिश्त यांच्या हस्ते झेंडा हलवून निघेल. संघाच्या दोन पडछाया संघटना- विश्व हिंदू परिषद आणि मुस्लिम राष्ट्रीय मंच यांनी या यात्रेची सर्व पूर्वतयारी केली आहे. या यात्रेचा रथ मुंबईमध्ये तयार होतो आहे, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे अवध प्रांताचे समन्वयक अनिलकुमार सिंग यांनी सांगितले. हा मंदिराची प्रतिकृती असलेला रथ १० फेब्रुवारीला अयोध्येत पोहोचेल.

आदित्यनाथच्या हस्ते ही रथयात्रा निघते आहे याचा अर्थ तसा स्पष्ट आहे. एका हिंदू मठाधिपतीला घटनात्मक पदी बसवण्याची चाल संघ उगाच खेळलेला नाही. वरवर पाहता ‘हिंदू युवा वाहिनी’ ही संघाशी फटकून असलेली संघटना चालवणारा आदित्यनाथ तेवढासा आमचा नाही असा देखावा करायचा. प्रत्यक्षात त्याची बांधणी हिंदूंचा प्रमुख म्हणून करायची. हिंदू राष्ट्राची तालिबानी घाई लागलेली ही संघटना आता या थराला पोहोचली आहे. आदित्यनाथांच्या विरुद्ध नोंदले गेलेले गुन्हे पाहता, त्यांची अतिरेकी वक्तव्ये पाहता, त्यांनी केलेली पोरकट रामागमनाची नौटंकी पाहता कोणतीही नैतिक शुद्ध असलेली राजकीय संघटना असल्या माणसाला विनाकारण जवळ करणार नाही. त्यांची निवड केली तेव्हाच त्यांचा व्यूह स्पष्ट होता. तुप्पट युक्तीवाद करणारे शाखासंघी हे मान्य करणार नाहीत, कदाचित् त्यांना ते वावगेही वाटत असेल मनातल्या मनात- पण व्यूह आहे तो जहरी हिंदू राजकारण, कसलीही चाड न बाळगता गोध्रापेक्षाही क्रूरकर्म करू शकेल असाच नेता त्यांना भविष्यासाठी पटावर आणायचा आहे.

या यात्रेच्या प्रस्थानानंतर रामेश्वरमपर्यंतच्या मार्गावर मार्गसभा, प्रचारसभा घेण्याची जबाबदारी विहिंप सांभाळणार आहे (यात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी पैसा वाहवला जाईल. रोजगार रोजगार!!!).

अडवाणीजी, अखेर तुम्हाला केरात टाकले तरी तुमच्या मार्गावरच चिखलाची पावले चालत राहतील हो. फक्त तुमचा रथ तेव्हा अडवला होता. आता रथ अडवणारे कारावासात आहेत आणि तुमचे वारसदार मोकळे. आताच्या रथयात्राकारांना कसलीच चाड बाळगण्याचे कारण नाही.

सामर्थ्य आहे नागरी युद्धाचे, आधी रथयात्रा काढलीच पाहिजे.

तिरडी के साथसाथ

राम नाम सत्य है...

.............................................................................................................................................

लेखिका मुग्धा कर्णिक यांची ‘अॅटलास श्रग्ड’, ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ इत्यादी अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

mugdhadkarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 08 February 2018

मुग्धाताई, तुमची एकेक विधानं पाहूया. १. >> हिंदू ध्रुवीकरणासाठी मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या, पुरोगाम्यांच्या, निधर्मींच्या आणि झालेच तर कुठल्याही विरोधकाच्या रक्ताचा भोवराच फिरवावा लागतो. << रामजन्मभूमीत उत्खनन केल्यावर तिथे मंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे न्यायालयात सिद्ध झालेलं आहे. काफिरांच्या पूजास्थळी मशीद बांधणे हा इस्लामचा घोर अवमान आहे. त्यामुळे मुस्लिमांना त काहीच स्वारस्य नसायला पाहिजे. मुस्लिमांचा दावा आपोआप निकालांत निघतो. मग तुम्हाला काय अडचण आहे? हिंदू-मुस्लिम तेढ कशाला वाढवताय? २. >>जगभरात ‘प्रेम दिन’ म्हणून साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेन्टाइन’ दिनाची निवड टाळून त्याच्या आदल्या दिवशीचा मुहूर्त निघाला आहे << सेंट व्ह्यालेंटाईन ख्रिश्चन संत होता. भारत सेक्युलर देश आहे. सबब भारताचा प्रेमपोळ्याशी संबंध नाही. प्रेमपोळा हा बैलपोळ्यासारखा सण आहे. 'सण एक दिन, बाकी वर्षंभर, ओझे मरमर, वाहायचे' ही कवी यशवंत यांची रचना आठवंत असेलंच तुम्हांस. असाच प्रकार प्रेमपोळ्याच्या बाबतीत घडतो. ३. >> हिंदू राष्ट्राची तालिबानी घाई लागलेली ही संघटना आता या थराला पोहोचली आहे. << हिंदूंना तालिबान्यांच्या लायनीत बसवणारे साप समजून भुई धोपटीत आहेत. यामागील खरं कारण आम्हांस माहितीये. हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करून तुम्हाला नक्षलवाद पुढे रेटायचा आहे. ४. >> आदित्यनाथांच्या विरुद्ध नोंदले गेलेले गुन्हे पाहता,... << योगी आदित्यनाथांविरुद्ध नोंदवले गेलेले गुन्हे अत्यंत किरकोळ स्वरुपाचे आणि सांगोवांगीचे आहेत. कुठलंसं आंदोलन आणि पोलिसांचा किरकोळ लाठीमार इत्यादि प्रकरणे आहेत. असल्या फालतू गोष्टींना महत्त्व द्यायची मला आवश्यकता वाटंत नाही. ५. >> गोध्रापेक्षाही क्रूरकर्म करू शकेल असाच नेता त्यांना भविष्यासाठी पटावर आणायचा आहे. << या जावईशोधाबद्दल अभिनंदन! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......