फायबर केबलमार्फत देण्यात येणार्‍या इंटरनेट सेवेवर नियंत्रण समाजाचेच असले पाहिजे
ग्रंथनामा - झलक
मिलिंद बेंबळकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 30 December 2021
  • पडघम तंत्रनामा मोबाईल फोन Mobile Phoneफाइव्ह जी 5G रेडिओ फ्रीक्वेन्सी रेडिएशन Radio Frequency Radiation मोबाईल रेडिएशन Mobile Radiation मोबाईल टॉवर Mobile Tower

महाराष्ट्रात ‘मोबाईल टॉवर ग्रीव्हन्स फोरम’ची स्थापना करणारे आणि ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या पुस्तकाचे सहलेखक मिलिंद बेंबळकर यांचं ‘5G वायरलेस तंत्रज्ञान - दुष्परिणाम आणि उपाय’ हे नवं पुस्तक लवकरच ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले हे मनोगत...

..................................................................................................................................................................

वायरलाईन सेवा - लॅंडलाईन टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबलचे महत्त्व नागरिक आणि धोरणकर्ते यांच्यासमोर मांडणे आणि भारतातील पायाभूत सुविधांमध्ये वायरलाईन सेवांचे महत्त्व विशद करणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे.

वायरलाईन सेवा (लॅंडलाईन टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबल) आणि वायरलेस सेवा (3G, 4G, 5G सेवा) यांमधील फरक, सुस्पष्ट धोरणे आणि त्याच्या अंमलबजावणीअभावी खाजगी कंपन्यांनी ग्राहक आणि बाजारपेठेवर मिळवलेला कब्जा, याविषयीची चर्चा या पुस्तकात करण्यात आलेली आहे.

डेटाची गोपनीयता, सुरक्षितता, नेट न्युट्रॅलिटी, डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचा समानाधिकार, खाजगी कंपन्यांपासून सर्व सामान्य जनतेच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सरकारला आलेले अपयश, खाजगी कंपन्यांची एकाधिकारशाही, वायरलेस सेवांसाठीचा वीजेचा प्रचंड वापर, वायरलेस सेवांमुळे होणार्‍या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, याचा परामर्ष या पुस्तकात घेण्यात आलेला आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वायरलेस सेवांपेक्षा कित्येक पटीने वेगवान सेवा देणार्‍या फायबर ऑप्टिक केबलचे, कॉपर केबलचे, इथरनेट जोडणीचे समर्थन या पुस्तकात केलेले आहे. ज्याप्रमाणे पाणी, रस्ते, पूल, रेल्वे सेवा या पायाभूत सुविधांवर जनतेचा अधिकार आणि नियंत्रण असते (शासनयंत्रणेमार्फत), त्याचप्रमाणे ब्रॉडबॅंडमार्फत अतिवेगवान इंटरनेट सेवा देणार्‍या फायबर ऑप्टिक केबलवर जनतेचा अधिकार आणि नियंत्रण असले पाहिजे, खाजगी कंपन्यांचे नियंत्रण असू नये. फायबर ऑप्टिक केबलचे जाळे देशभर अंथरणे आणि त्याचे नियंत्रण आणि देखभाल स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत झाले पाहिजे. कारण ही सेवा अतिशय सुरक्षित, विश्वसनीय, टिकाऊ, सर्वांना परवडणारी आहे.

मागील दोन दशकांमध्ये वायरलेस सेवा (2G, 3G, 4G इ.), सेल्युलर फोन (मोबाइल फोन), इत्यादीस प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सेवा देणार्‍या कंपन्यांची वाढ आणि त्यांची आर्थिक प्रगती अतिशय वेगाने झाली. वायरलाईन सेवा - लॅंडलाईन टेलिफोन सेवा कालबाह्य झालेल्या आहेत, असा समज सगळीकडे झाला. इंटरनेट आधारित वायरलेस सेवांनाच (2G, 3G, 4G इ.) फक्त उज्ज्वल भवितव्य आहे, असे वातावरण निर्माण केले गेले. परंतु राजकारण्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असणार्‍या खाजगी कंपन्यांच्या दबावगटाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे, वायरलेस सेवांच्या कल्पनातीत प्रगतीस आक्रमक व्यापारी नीती, नियामक संस्थांचे आणि शासनाचे पक्षपाती धोरण कारणीभूत आहे. त्यामध्ये कोणतेही जनहित नाही.

वायरलेस उद्योगाची व्यावसायिक नीती, त्यांचा दृष्टीकोन, त्यांच्या बाजारपेठेविषयीच्या अवास्तव कल्पना आणि गैरसमज, त्यांची आक्रमक प्रचार यंत्रणा, कायदेमंडळांचे अपयश, नियामक संस्थांचे पक्षपाती धोरण, राजकारण्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असणारी खाजगी उद्योगांना अनुकुल धोरणे, यामुळे नागरिकांच्या वायरलेस सेवांविषयी अतिअपेक्षा निर्माण झालेल्या आहेत आणि पर्यायाने वायरलाईन सेवांकडे (लॅंडलाईन टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबल) अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यासंबंधीचा ऊहापोह या पुस्तकात केलेला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

उत्तम दर्जाची प्रशासकीय यंत्रणा राबवण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारला आपल्या विविध सेवा आणि योजना उदा. ई-ग्रामपंचायत, ई-प्रशासन, ई-शिक्षण, ई-आरोग्य, ई-औषधे, ई-तक्रार निवारण, ई-शेती, ई-नागारिक सुविधा कमीत कमी वेळात थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि डिजिटल इंडिया, मेक इन  इंडिया, स्टार्ट अप इंडिया या महत्त्वाच्या सरकारी योजना यशस्वी करण्यासाठी फायबर ऑप्टिक केबलद्वारे इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही इंटरनेट सेवा वेगवान, सहजपणे परवडणारी, तटस्थ, टिकाऊ, शाश्वत, सुरक्षित, योग्य दर्जाची असावी. हे साध्य करण्यासाठी सर्व प्रशासकीय पातळ्यांवर प्रयत्न झाले पाहिजेत, परंतु त्याचे नियमन आणि अंमलबजावणी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत स्थानिक  पातळीवरच झाली पाहिजे.

आपण अशा एका वळणावर उभे आहोत, जेथे आपली संस्कृती, परंपरा, आचार-विचार स्वातंत्र्य, यावरच बंधने घालण्याचा काही मूठभर लोकांचा इंटरनेटमार्फत प्रयत्न चालू आहे. त्यास आव्हान देण्याची गरज आहे. म्हणूनच फायबर केबलमार्फत देण्यात येणार्‍या इंटरनेट सेवेवर नियंत्रण समाजाचेच असले पाहिजे, हे प्रतिपादन करण्यासाठी हा पुस्तकप्रपंच.  

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

‘रेडिओ फ्रीक्वेन्सी रेडिएशनसंबंधीची १९९६मधील मानके कोणतेही बदल न करता सध्याच्या काळात, २०२१मध्ये कशी लागू होऊ शकतात?’ 

युनायटेड किंगडममध्ये 5Gसंबंधीचे कोणतेही निर्णय नागरिकांच्या संमतीने घेण्यात आलेले नाहीत. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे

.................................................................................................................................................................

लेखक मिलिंद बेंबळकर यांनी महाराष्ट्रात ‘मोबाईल टॉवर ग्रीव्हन्स फोरम’ची स्थापना केली आहे. तसेच ते ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या पुस्तकाचे सहलेखकही आहेत.

milind.bembalkar@gmail.com

...............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......