‘छत्रपती शिवाजी महाराज’ हाच जीवनमंत्र बनलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची थोडक्यात ओळख करून देणारा लघुपट
कला-संस्कृती - चलत्-चित्र
टीम अक्षरनामा
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील लघुपटातील एक दृश्य
  • Tue , 16 November 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र शिवशाहीर Shivshahir बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare शिवाजी महाराज Shivaji Maharaj राजा शिवछत्रपति Raja Shivchhatrapati

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं काल पुण्यात वयाच्या ९९व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं. लहानपणापासूनच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रानं झपाटून गेले होते. पुढे तोच त्यांचा ध्यास, श्वास बनला. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांनी ‘राजा शिवछत्रपति’ (१९५७) हे शिवाजी महाराजांचं रसाळ, शाहिरी चरित्र लिहिलं. या चरित्रानं महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना शिवचरित्राची गोडी लावली. शिवाजी महाराजांची ओळख करून दिली. महाराष्ट्रात आजही या चरित्राचा लोकप्रिय पुस्तकांमध्ये समावेश केला जातो. त्याच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हाच जीवनमंत्र बनलेल्या बाबासाहेबांची थोडक्यात ओळख करून देणारा हा लघुपट...

२०१५ साली बाबासाहेबांना महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्तानं ११ मिनिटे ५ सेकंदांचा हा लघुपट नरेंद्र बेडेकर यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयासाठी बनवला होता. या लघुपटाचं लेखन सागर देशपांडे यांनी केलं आहे. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध)

जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते.......