‘बिघडलेले होकायंत्र’ हा कवितासंग्रह दिशादर्शकाचं काम करतो
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
हेमंत दिनकर सावळे
  • ‘बिघडलेले होकायंत्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 August 2020
  • ग्रंथनामा शिफारस बिघडलेले होकायंत्र Bighadlele Hokayantra शेषराव पिराजी धांडे Shesharao Piraji Dhande

एखादं योग्य दिशा दाखवणारं होकायंत्र बिघडलं तर आपण दिशा हरवून भरकटत राहतो, पण कवी शेषराव पिराजी धांडे यांचा ‘बिघडलेले होकायंत्र’ हा कवितासंग्रह दिशादर्शकाचं काम करतो. यातील कविता वास्तव जीवनाचं दर्शन घडवतात. या कवितेत सामाजिक भान असून मनाच्या तळापर्यंतचा विद्रोह मांडला आहे. आजूबाजूचं वातावरण प्रतिकूल असूनही कवी आपल्या कवितेतून वास्तविकता मांडतो -

कितीही सांभाळतो म्हटलं मनाला 

आवरत नाही मेंदूतील चीड, येत राहते शब्दात 

बर्बाद झालेल्या कुटुंबाची उजळणी होते

पुन्हा पुन्हा हिंसकवृत्तीने जाळतील घरे 

तरीही मी तुमचा आदरच करू?

या कवीमध्ये दोन व्यक्तिमत्त्वं वावरताना दिसतात. त्यातील एक सतत दुर्लक्ष करत राहतो, पण दुसरा विद्रोहाचा गाठोडं घेऊन निघाला आहे. स्वस्थ बसत नाही, तो प्रश्न विचारतो. या कवीला अन्याय आणि अन्याय करणाऱ्यांचे हात दिसतात. इतर व्यक्ती सत्तेसोबत असल्या तरी कवी अन्यायाविरुद्ध बंड करून आपली व्यथा मांडतो आहे. कवी आशावादी आहे. तो म्हणतो, ‘आम्ही सारे एक आहोत.’

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

आपल्याला विसाव्याची हक्काची जागासुद्धा नाही. वरती आभाळ मोकळं आहे, असं वाटत असलं तरी त्यावर शत्रूचा ताबा आहे. आपलीच पाखरं दिशाहीन झाली आहेत. इथं रोज नवे नवे प्रश्न जन्म घेत आहेत. आपल्याच प्रश्नावर संधिसाधूंनी पोळी भाजली आहे. ती खाऊन ते ढेकर देत आहेत, पण आपल्या भाकरीचं काय? कुठलातरी स्वयंघोषित नेता येतो आणि त्याचा स्वार्थ साधून शत्रूला मिळतो, मग समाजानं कोणाकडे बघावं?

कोमात गेलेली चळवळ पडून आहे खाटेवर 

हताश झालेली बुढी निरखून पाहते संविधानाचा शब्द नि शब्द….

आपल्या स्वार्थासाठी माणसाला नागवलं जातं, नाचवलं जातं, हवं तसं वागवलं आणि वाकवलं जातं. इथले वंचित खऱ्या अर्थानं गुलाम आहेत. त्यांना मानसिक गुलाम बनवून ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अन्याय त्यांना दिसत नाही, कळत नाही. इथल्या नाकारलेल्या वर्गाला पुढे जाऊच दिलं जात नाही. इथल्या अंधारावर मात करण्यासाठी कवी म्हणतो – ‘झोपडीत अंगार घेऊन जगत आहे एक म्हातारा.’

सत्ताधाऱ्यांनी समाजात काहीही चित्र उभं केलेलं असलं तरी कवी सांगतो, मतांसाठी लोकांना जाती-धर्मात वाटलं, धर्माचं राजकारण वाढवलं, धर्माच्याच चर्चा केल्या, मग आपण धर्मनिरपेक्ष कशावरून आहोत?

कवीला गुलामी मान्य नाही, तो म्हणतो,

गुलाम म्हणून जगत आले माझे पूर्वज 

इतिहासाचा ठेवा सांभाळत 

मी जगू पाहतो यापासून वेगळा…

..................................................................................................................................................................

हेही वाचा : रा. ना. चव्हाण हे ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या ज्ञानपरंपरेतील ‘विचारनिष्ठा’ असलेलं महत्त्वाचं नाव!

..................................................................................................................................................................

सत्य सांगणं, मांडणं सोपी गोष्ट नाही. सत्ताधाऱ्यांना तर सत्य अजिबात आवडत नाही. कारण सत्यामुळे सिंहासनं सोडावी लागतात. सत्याची बाजू घेणं खूपच दुःखदायक झालं आहे, तरीही कवी संकटांना घाबरत नाही. तो म्हणतो - 

कालपर्यंत बोललो नाही 

शत्रू ठरलो नाही जगाचा 

आज सत्य मांडलं समाजासमोर 

कर्दनकाळ ठरलो जगाचा 

दुनिया बदलेलं या इराद्याने 

रोपांना घातले पाणी….

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हल्ली शत्रू आणि मित्र यात फरक उरला नाही. पाय मागे खेचण्याचे काम मित्र करू लागले आहेत. नीतिमत्ता मातीत मिसळवली आहे आणि एकमेकांना पाण्यात पाहण्याची स्पर्धाच चालू झाली आहे. दुसऱ्याच्या अपयशासाठी स्वतःचं नुकसान करून घेणाऱ्या माणसांकडून नात्यातील प्रेम टिकवण्याची आशा का करावी? हल्ली स्वतःच्या लाभासाठी माणसं खालच्या पातळीला जात आहेत. ते कवी दररोज बघतो.

पूर्वीसारखा ओलावा उरला नाही नात्यात 

धुसफूस कशाने वाढली हेदेखील कळत नाही 

समधर्मीय, समव्यवहारी एकाच बाजारपेठेत चालू झाली स्पर्धा…

दोन समाजाच्या स्थितीत आणि विचारप्रणालीत खूप मोठं अंतर आहे. देशात संविधानामुळे समानता आली खरी, पण ती कायद्यापुरतीच मर्यादित राहिली. हजारो वर्षांचा जुलूम काही वर्षांत कमी होऊ शकत नाही. लोकांची मानसिकता बदलणं खूप कठीण काम आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य नाही. तरीही इथला प्रस्थापित वर्ग ते चिमूटभर स्वातंत्र्यसुद्धा हिरावून घेण्याच्या विचारात आहे. इथल्या वंचितांना मिळणाऱ्या हक्कामुळे उच्चवर्णीयांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे कवी त्यांना म्हणतो की, ‘पोटात दुखणाऱ्यांनी उपचार करावा मेंदूचा…’

कवी वंचितांच्या, शोषितांच्या, विस्थापितांच्या बाजूनं उभा आहे. त्यांचे प्रश्न, जीवन-मरण, हाल-अपेष्टा, सुख-दुःख स्वतः जगत आहे, भोगत आहे. म्हणूनच त्याच्या कवितेला एक विलक्षण खरेपणाची धार आहे. तो म्हणतो,

कुठलंच आकाश नव्हतं माझ्या वाट्यावर 

तुमच्या आभाळाचे गुणवंत कशासाठी गाव?

हे ‘बिघडलेले होकायंत्र’ आपल्याला खरी दिशा दाखवण्याचं काम करतं. या कवितासंग्रहातील सर्वच कविता वस्तुस्थिती मांडतात.

..................................................................................................................................................................

बिघडलेले होकायंत्र - शेषराव पिराजी धांडे

सृजन प्रकाशन, मुंबई

पाने - ६४, मूल्य - १५० रुपये.

..................................................................................................................................................................

हेमंत दिनकर सावळे

hemantsawale15@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......