राजे-राजवाडे व श्रीमंतांपर्यंत सीमित असलेला जुगार गरिबांच्या झोपड्यांपर्यंत नेण्याचा चमत्कार रतन खत्रीने घडवला!
संकीर्ण - श्रद्धांजली
अन्वर राजन
  • मटका किंग रतन खत्री
  • Tue , 12 May 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली मटका किंग Matka King रतन खत्री Ratan Khatri सट्टा Satta

आणीबाणी जाहीर झाली, विरोधकांनी त्या विरोधात आवाज उठवला. २७ जूनला आणीबाणीच्या विरोधात देशातील पहिला सत्याग्रह पुण्यात झाला. प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहात सहभागी व्हायची मला संधी मिळाली. पहिल्या दिवशी आम्हाला येरवडा तुरुंगात फाशी गेट जवळच्या अंधेरी यार्डमध्ये ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासाठी आम्हाला ती खोली रिकामी करायला लावली. आम्हाला टिळक यार्डच्या बराकीत हलवण्यात आले.

सकाळी संडाससाठी गेलो. लाईन होती. संडासला अर्धा दरवाजा असायचा. आतील माणूस उभा राहिला की दिसायचा. एका संडासातला माणूस उठला. मी पाहिले, तर तो ओळखीचा वाटला. त्याचे छायाचित्र पाहिल्यासारखे वाटत होते, पण लक्षात येत नव्हते. शेजारी उभ्या असलेल्या कैद्याला मी विचारले. तो म्हणाला, ‘ये तो अपने रतन खत्री साब है’.

डोक्यावर साईबाबासारखे फडके बांधलेले हीच त्याची ओळख होती.

आणीबाणीत जसे राजकीय कैद्यांना स्थानबद्ध केले होते, तसेच गुन्हेगारीच्या जगातील अनेक दादांनाही स्थानबद्ध करण्यात आले होते. त्या काळात दारूभट्टी, मटका व स्मगलिंग यात फार मोठ्या प्रमाणात लोक गुंतलेले होते. याशिवाय काळाबाजार व सावकारीनेही उच्छाद मांडला होता.

मटका हा त्या काळातील अत्यंत लोकप्रिय जुगार होता, बेकायदेशीर होता पण विश्वासार्ह होता. दररोज स्थानिक पातळीवरच्या बुकीकडे हजारो रुपयांचे पेमेंट व्हायचे. चार आण्यापासून हजारो रुपये त्यात लावले जायचे. मोबाईल, STD इत्यादी कोणतीही सोय नसताना मुंबईत काढलेला आकडा देशातल्या कानाकोपऱ्यात पोचायचा. आकडा काढायचे काम रतन खत्रीचे असायचे. ही व्यवस्था कार्यक्षम व बिनचूक असायची.

पोलीस आणि मटका यांचे संबंध मैत्रीपूर्ण असायचे. आकड्यांची बुकिंग स्वीकारणारा व विजेत्यांना पेमेंट करणारा प्रत्येक बुकी आपल्या अड्ड्यावर दहापासून शंभरापेक्षा जास्त पंटर ठेवायचा. पोलिसांना नियमित हप्ते पोचवले जातात अशी वदंता होती. या अड्ड्यावर अधूनमधून पोलीस धाड टाकायचे. काही वेळा पूर्वसूचना पण असायची. धाड पडली की दोन-चार पंटरांना अटक व्हायची. त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी अड्ड्याचा मालक घ्यायचा. अड्डा ज्या वस्तीत असेल तेथील अडचणीत असलेल्यांना अड्ड्याचा मालक मदत करी.

मटक्याचा नाद लागलेल्या पुरुषांना त्यांच्या घरातील बाया वैतागाच्या. अनेक महाभाग कमाईचा मोठा हिस्सा आकड्यात घालवायचे. कोणता आकडा येणार हे सांगणाऱ्या बाबा-बुवांची बक्कळ कमाई होत असे. वर्तमानपत्र मागील आठवड्यात लागलेले व पुढचे संभाव्य आकडे छापायचे. काही सायंदैनिके तर केवळ मटक्यावरच चालायची. पुण्यात ‘संध्या’ व ‘भोंगा’ ही सायंदैनिके आकड्यासाठी लोकप्रिय होती. न लागलेल्या आकड्यांची शक्यता वाढते, असा तर्क करत एखादा आकडा धरून त्यावर दर दिवशी दुप्पट पैसे लावणारे दर्दी दिसायचे.

येरवडा तुरुंगात रतन खत्रीबरोबर काहींनी मैत्री जुळवली. बेकायदा व्यवसाय करणारे एरवी चांगले असतात, असू शकतात. रतन खत्रीने निर्माण केलेला व त्यात दोन मिनिटांची भूमिका केलेला ‘रंगीला रतन’ या हिंदी सिनेमाचा एक खास शो आमच्यासाठी तुरुंगात आयोजित केला गेला. माझ्या पंधरा महिने वीस दिवसाच्या तुरुंगवासात हा आणि ‘आंधी’ हे सिनेमे पाहिल्याचे आठवते.

आणीबाणी संपल्यावर मटक्याऐवजी लॉटरी सुरू झाली. सुरुवातीला सणावारी असलेली लॉटरी दररोज व दिवसांतून पाच-सहा वेळा सोडतीपर्यंत आली.

आता गल्लीबोळात आकडे लावायची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाइन, टीव्ही चॅनेल्सवर जुगार खेळता येतो. जुगार खेळण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून आहे. महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे.

राजे-राजवाडे व श्रीमंत लोकांपर्यंत सीमीत असलेला हा जुगार पार गरिबांच्या झोपड्यांपर्यंत नेण्याचा चमत्कार रतन खत्री घडवला. त्याने सुरू केलेली ही कामगिरी चढत्या कमानीने पुढे जात आहे.

..................................................................................................................................................................

लेखक अन्वर राजन सामाजिक कार्यकर्ते आहेत.

rajanaaa@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......