‘बिटविन द लाईन्स’ शिकवणारे कुलदीप नय्यर!
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • कुलदीप नय्यर (१४ ऑगस्ट १९२३-२३ ऑगस्ट २०१८)
  • Thu , 23 August 2018
  • संकीर्ण. श्रद्धांजली कुलदीप नय्यर Kuldip Nayar

कालची सकाळ गुरुदास कामत तर, आजची सकाळ कुलदीप नय्यर यांच्या निधनाची बातमी घेऊनच उगवली.

कुलदीप नय्यर खासदार, राजदूत, लेखक होतेच, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे आमच्या पिढीचे आयडॉल पत्रकार, स्तंभलेखक, लढवय्या संपादक होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर ही जवळीक जास्त विषन्न करणारी आहे.

घटना १९८२ म्हणजे ३६ वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. आमचे कार्यकारी संचालक नरेश गद्रे हे एक उमदा माणूस आणि जबरी वाचक होते.

आमच्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक व्हाव्यात यासाठी नरेश गद्रे यांनी जी नियोजनबद्ध मोहीम राबवली, त्यात कुलदीप नय्यर यांची दोन व्याख्यानं झाली.

बातमी ‘बिटविन द लाईन्स’ कशी ओळखावी आणि वाचावी, हा ‘बिटविन द लाईन्स’सेन्स पत्रकारांना कसा असावा आणि तो विकसित कसा करावा, याबद्दल कुलदीप नय्यर खूप वेळ सोदाहरण अशा तळमळीनं बोलले. त्यांचं बोलणं थेट काळजालाच भिडलं.

तेव्हा त्यांचा ‘बिटविन द लाईन्स’ नावाचा स्तंभही लोकप्रिय होता. साधं-सोपं आणि रसाळ इंग्रजी हे त्यांचं वैशिष्ट्य भुरळ पाडणारं होतं.

छायाचित्राखालच्या ओळींत ‘अमुक तमुक छायाचित्रात दिसत आहेत’ असं लिहिण्याची गरज काय, कारण ते दिसत असतातच. म्हणून वाचकांना कळावं यासाठी त्यांची केवळ नावं ओळीत द्यावीत, असं त्यांनी सांगितलेलं मी कधीही विसरलो नाही. अजूनही माझ्याकडून ते पाळलं जातं आणि तोच संस्कार टीममधल्या सर्वांवर मी केला.

नंतरही अनेकदा त्यांच्या भाषणांचं वृत्तसंकलन करण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळाली. कोणताही ज्ञानताठा न बाळगता ते भेटत आणि बोलत.

त्याचं व्यक्तिमत्त्व, बोलणं आणि वागणं आश्वासक होतं.

क्रिकेट, पाकिस्तान, भारतीय राजकारण हे त्यांच्या आवडीचे आणि भारतीय लोकशाही हा चिंतेचा विषय असायचा. आणीबाणीचे ते कट्टर विरोधक होते.

एकूण माणूस बहुपेडी विद्वान होता आणि पत्रकार, लेखक म्हणून या समाजाला जितकं काही देता येईल तेवढं देऊन गेला. त्याबद्दल नय्यर याचं माझ्या पिढीला कायम स्मरण राहील.

कुलदीप नय्यर नावाचं पान पिकलं होतं, आज ते गळून पडलं...

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......