‘बिटविन द लाईन्स’ शिकवणारे कुलदीप नय्यर!
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • कुलदीप नय्यर (१४ ऑगस्ट १९२३-२३ ऑगस्ट २०१८)
  • Thu , 23 August 2018
  • संकीर्ण. श्रद्धांजली कुलदीप नय्यर Kuldip Nayar

कालची सकाळ गुरुदास कामत तर, आजची सकाळ कुलदीप नय्यर यांच्या निधनाची बातमी घेऊनच उगवली.

कुलदीप नय्यर खासदार, राजदूत, लेखक होतेच, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे आमच्या पिढीचे आयडॉल पत्रकार, स्तंभलेखक, लढवय्या संपादक होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर ही जवळीक जास्त विषन्न करणारी आहे.

घटना १९८२ म्हणजे ३६ वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. आमचे कार्यकारी संचालक नरेश गद्रे हे एक उमदा माणूस आणि जबरी वाचक होते.

आमच्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक व्हाव्यात यासाठी नरेश गद्रे यांनी जी नियोजनबद्ध मोहीम राबवली, त्यात कुलदीप नय्यर यांची दोन व्याख्यानं झाली.

बातमी ‘बिटविन द लाईन्स’ कशी ओळखावी आणि वाचावी, हा ‘बिटविन द लाईन्स’सेन्स पत्रकारांना कसा असावा आणि तो विकसित कसा करावा, याबद्दल कुलदीप नय्यर खूप वेळ सोदाहरण अशा तळमळीनं बोलले. त्यांचं बोलणं थेट काळजालाच भिडलं.

तेव्हा त्यांचा ‘बिटविन द लाईन्स’ नावाचा स्तंभही लोकप्रिय होता. साधं-सोपं आणि रसाळ इंग्रजी हे त्यांचं वैशिष्ट्य भुरळ पाडणारं होतं.

छायाचित्राखालच्या ओळींत ‘अमुक तमुक छायाचित्रात दिसत आहेत’ असं लिहिण्याची गरज काय, कारण ते दिसत असतातच. म्हणून वाचकांना कळावं यासाठी त्यांची केवळ नावं ओळीत द्यावीत, असं त्यांनी सांगितलेलं मी कधीही विसरलो नाही. अजूनही माझ्याकडून ते पाळलं जातं आणि तोच संस्कार टीममधल्या सर्वांवर मी केला.

नंतरही अनेकदा त्यांच्या भाषणांचं वृत्तसंकलन करण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळाली. कोणताही ज्ञानताठा न बाळगता ते भेटत आणि बोलत.

त्याचं व्यक्तिमत्त्व, बोलणं आणि वागणं आश्वासक होतं.

क्रिकेट, पाकिस्तान, भारतीय राजकारण हे त्यांच्या आवडीचे आणि भारतीय लोकशाही हा चिंतेचा विषय असायचा. आणीबाणीचे ते कट्टर विरोधक होते.

एकूण माणूस बहुपेडी विद्वान होता आणि पत्रकार, लेखक म्हणून या समाजाला जितकं काही देता येईल तेवढं देऊन गेला. त्याबद्दल नय्यर याचं माझ्या पिढीला कायम स्मरण राहील.

कुलदीप नय्यर नावाचं पान पिकलं होतं, आज ते गळून पडलं...

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......