‘बिटविन द लाईन्स’ शिकवणारे कुलदीप नय्यर!
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • कुलदीप नय्यर (१४ ऑगस्ट १९२३-२३ ऑगस्ट २०१८)
  • Thu , 23 August 2018
  • संकीर्ण. श्रद्धांजली कुलदीप नय्यर Kuldip Nayar

कालची सकाळ गुरुदास कामत तर, आजची सकाळ कुलदीप नय्यर यांच्या निधनाची बातमी घेऊनच उगवली.

कुलदीप नय्यर खासदार, राजदूत, लेखक होतेच, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे आमच्या पिढीचे आयडॉल पत्रकार, स्तंभलेखक, लढवय्या संपादक होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर ही जवळीक जास्त विषन्न करणारी आहे.

घटना १९८२ म्हणजे ३६ वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. आमचे कार्यकारी संचालक नरेश गद्रे हे एक उमदा माणूस आणि जबरी वाचक होते.

आमच्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक व्हाव्यात यासाठी नरेश गद्रे यांनी जी नियोजनबद्ध मोहीम राबवली, त्यात कुलदीप नय्यर यांची दोन व्याख्यानं झाली.

बातमी ‘बिटविन द लाईन्स’ कशी ओळखावी आणि वाचावी, हा ‘बिटविन द लाईन्स’सेन्स पत्रकारांना कसा असावा आणि तो विकसित कसा करावा, याबद्दल कुलदीप नय्यर खूप वेळ सोदाहरण अशा तळमळीनं बोलले. त्यांचं बोलणं थेट काळजालाच भिडलं.

तेव्हा त्यांचा ‘बिटविन द लाईन्स’ नावाचा स्तंभही लोकप्रिय होता. साधं-सोपं आणि रसाळ इंग्रजी हे त्यांचं वैशिष्ट्य भुरळ पाडणारं होतं.

छायाचित्राखालच्या ओळींत ‘अमुक तमुक छायाचित्रात दिसत आहेत’ असं लिहिण्याची गरज काय, कारण ते दिसत असतातच. म्हणून वाचकांना कळावं यासाठी त्यांची केवळ नावं ओळीत द्यावीत, असं त्यांनी सांगितलेलं मी कधीही विसरलो नाही. अजूनही माझ्याकडून ते पाळलं जातं आणि तोच संस्कार टीममधल्या सर्वांवर मी केला.

नंतरही अनेकदा त्यांच्या भाषणांचं वृत्तसंकलन करण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळाली. कोणताही ज्ञानताठा न बाळगता ते भेटत आणि बोलत.

त्याचं व्यक्तिमत्त्व, बोलणं आणि वागणं आश्वासक होतं.

क्रिकेट, पाकिस्तान, भारतीय राजकारण हे त्यांच्या आवडीचे आणि भारतीय लोकशाही हा चिंतेचा विषय असायचा. आणीबाणीचे ते कट्टर विरोधक होते.

एकूण माणूस बहुपेडी विद्वान होता आणि पत्रकार, लेखक म्हणून या समाजाला जितकं काही देता येईल तेवढं देऊन गेला. त्याबद्दल नय्यर याचं माझ्या पिढीला कायम स्मरण राहील.

कुलदीप नय्यर नावाचं पान पिकलं होतं, आज ते गळून पडलं...

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......