टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मुंबईतील ट्रम्पपूजा, जेएनयू, पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आणि सुभाषचंद्र गोयल
  • Tue , 08 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात पिस्तुल आणि काडतुसं सापडली.

हिंदी सिनेमांमध्ये खूप वेळा पाहिलेली गोष्ट आहे ही… आता जेएनयूमध्ये लवकरच रॉकेट लाँचर, मिग २१ विमानं आणि दोन-चार अण्वस्त्रधारी पाणबुड्याही सापडतील!

...

२. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय व्हावा म्हणून मुंबईत होमहवन.

ट्रम्पच्या मुलाने तिकडे आरती केली, इकडे होमहवन! लवकरच व्हाइट हाऊसमध्ये सत्यनारायणाची पूजा होण्याचा योग दिसतोय. अब की बार, ट्रम्प सरकार!

...

३. केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ या प्रचारमोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर खुद्द नरेंद्र मोदी; त्यांच्या विदेशवाऱ्यांच्या ध्वनिचित्रफिती वापरणार...

नेमकी गडबड काय आहे? ही अतुल्य भारताची जाहिरात मोहीम आहे ना? मग तो सोडून पंतप्रधान वारंवार परदेशांत जातात, असं चित्रण का दाखवणार आहेत जाहिरातींमध्ये? त्यांनी देशांतर्गत पर्यटन काय कमी केलंय का?

...

४. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपद स्वीकारावं, काँग्रेस कार्यकारिणीची गळ

ते मागे कोण बरं म्हणतंय की, रोज रोज मरने से एक ही बार आत्महत्या अच्छी!!

...

५. एनडीटीव्हीवर एक दिवसाची नाही, कायमची बंदी हवी; झी टीव्हीवर यूपीएने बंदी घातली होती, तेव्हा कुठे होते बंदीविरोधक विचारवंत‌? : झीसम्राट सुभाषचंद्र

खासदारकी बोलू लागली. यूपीएच्या काळात घडलेल्या त्या प्रकरणाची पाठराखण कशी झाली असती झीचंद्रसाहेब? त्यात खुद्द आपण आणि आपले वरिष्ठ संपादक यांच्यावर उद्योगसमूहाकडून १०० कोटी रुपयांची लाच मागितल्याचे आरोप होते. तुरुंगवाऱ्याही घडल्या होत्या. तुमचाही चॅनेल टीव्हीवरच दिसतो आणि त्यांचाही टीव्हीवरच दिसतो, यापलीकडे काही साम्य आहे का तुमच्यात?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......