‘हक्कसोड’ : तुटत चालेल्या भावभावनांचं सावत्रपण ठसठसत्या खवंदासारखं होतं. त्यातून नात्यातल्या कोरडेपणाची जाणीव होते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
हनुमान व्हरगुळे
  • ‘हक्कसोड’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Thu , 09 February 2023
  • ग्रंथनामा शिफारस हक्कसोड Hakkasod मिलिंद जाधव Milind Jadhao

‘हक्कसोड’ या कादंबरीतून मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्रं समाजात सर्वत्र दिसतात. कायदा न्याय मिळवून देण्यासाठी असतो, परंतु कायद्याच्या गैरवापर करून आपला स्वार्थ साधणाऱ्या स्वार्थकेंद्री मनोवृत्तीचं प्राबल्य वाढताना दिसतं. ‘स्व’च्या दीर्घ ‘मी’साठी आपण कोणाला त्रास देतोय, याचं भान हरपलेली अनेक नात्यातली माणसं आजूबाजूला दिसतात.

या कादंबरीत महिपतराव आणि जानकी ही प्रमुख पात्रं आहेत. त्यांनी आपलं घर उभं करण्यासाठी आयुष्य झिजवलंय. घरातील प्रत्येकाच्या वाट्याला चांगलं जगणं यावं म्हणून आयुष्यभर मेहनत केलीय. महिपतराव सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन बरीच वर्षे उलटलेली आहेत. काही शेती त्यांनी आधीच घेऊन ठेवली होती. ती त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावे असते. त्या पत्नीला सुलोचना व निलिमा अशा दोन मुली. त्या शेतीच्या वारसदार असतात. या मुलींची लग्नं महिपतराव-जानकी यांनी मोठ्या थाटामाटात लावलेली आहेत. जानकी या दोघींची सावत्र आई असली तरी, या मुलींना चांगलं घर मिळावं, त्यांच्या वाट्याला कष्टप्रद जगणं येऊ नये म्हणून धडपडणारी आई आहे. मुलांना चांगलं शिक्षण, त्यांना नोकरीसाठी मदत, घर बांधण्यासाठी मदत, आडल्यानडल्या प्रत्येक ठिकाणी मदत करते. त्यासाठी जानकीबाईंनी महिपतरावांना कधीच अडवलेलं नाही.

जानकी आणि महिपतरावांना दोन मुलं – सुधाकर, उमेश आणि एक मुलगी, नेहा. महिपतरावांना वाटतं आपल्या मुलींचे संसार चांगले स्थिर झालेले आहेत. त्यांचं आयुष्य सुखा-समाधानानं भरलेलं आहे, पण आपल्या मुलांना नोकऱ्या नाहीत. सुधाकर मुंबईला एका कंपनीत नोकरी करतो, पण तिचा भरवसा नाही. त्यामुळे शेत या मुलांच्या नावानं करून टाकू. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटेल, ते मार्गी लागतील आणि आपल्याला त्यांच्यासाठीही काहीतरी केल्याचं समाधान मिळेलं, असं महिपतरावांना वाटतं.

नवीन कायद्यानुसार आई-वडिलांच्या संपत्तीत मुलींनाही बरोबरीचा वाटा द्यायला हवा, असा नियम आहे. मुलींना आपण आधीच सर्व काही दिलेलं आहे. आता त्यांना या शेतात वाटा द्यायची गरज नाही. आपण त्यांच्याकडून हक्कसोड लिहून घ्यायला पाहिजे, म्हणून महितपराव मुलींच्या घरी चकरा मारतात. मात्र सह्या देण्यासाठी दोघीही चालढकल करत राहतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

मुली सह्या का देत नाहीत, हे कळल्यावर जीवाची लाहीलाही झालेले महिपतराव वकिलाचा सल्ला घेतात. वकील म्हणतात, ‘तुमच्या सेवा पुस्तिकेला पत्नी म्हणून कोणाचं नाव आहे’. त्यांना ते आठवत नाही. त्यामुळे ते पंचायत समिती – जिल्हा परिषदेच्या चकरा मारतात. अर्जावर अर्ज देऊनही सेवापुस्तिका पाहू दिली जात नाही.

इकडं मुलींशी तडजोडी चालूच राहतात. मुली रोज नवी काहीतरी मागणी करत राहतात. शेवटी मुली म्हणतील ते सगळं द्यायला महिपतराव तयार होतात. मोहोद्रींची जमीन आणि वरून चार लाख रुपये द्यायला तयार होतात. ही जमीन पिढीजात असल्यानं आणि विभागणी केलेली नसल्यानं त्यावरच्या हक्कसोडासाठी महिपतरावांची बहीण प्रयागबाईची सही लागणार असते. पण तिचा मुलगा शंकर तिला सही करू देत नाही.

सहीसाठी पैसे मागणारी बहीण आणि संपत्तीत नुसता वाटा मागून न थांबता सतत बापाला छळणाऱ्या मुली, या कात्रीत महितपतराव सापडतात. जरी मुलींना वाटा देण्याचा कायदा असला तरी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागृत ठेवून निर्णय घेता आला पाहिजे. आपल्या वागण्याचे परिणाम नात्याच्या वितुष्टापेक्षा काळजावरचे न बुजणारे घाव असतात. आपण मुलगा-मुलगी समान मानून मुलीला आधीच सगळं दिलेलं आहे, त्यामुळे आता त्यांनी उरलेल्या संपत्तीत वाटा न मागता बेकारी अनुभवणाऱ्या भावाच्या पाठीशी उभं राहून नात्याच्या परिघाचा विस्तार करावा, असं महिपतरावांना वाटतं.

पैसे - शेत नावावर केल्यावरही तलाठ्याच्या मदतीनं त्रास देत राहणाऱ्या मुली जशा ठळक होतात, तशाच आपापल्या नवऱ्याच्या मागे ठामपणे उभा राहणाऱ्या स्त्रियाही दिसतात. महिपतरावांच्या मागे जानकी, सुधाकरच्या मागे उजा खंबीरपणे उभ्या राहतात, पण त्यांना टोचणाऱ्या वेदना आणि त्यांचा मुका झालेला संसार ‘हक्कसोड’ या एकाच विषयाभवती फिरत राहतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

महिपतरावांना वाटत राहतं- आपण जीवंत आहोत, तोपर्यंत आपल्या मुलांना न्याय मिळावा, पण तसं होत नाही. ते तलाठ्याला भेटतात, पण तलाठी आपल्या हातात काहीच नसल्याचं स्पष्ट सांगतो. तेव्हा आपल्यालाच मुलींनी आपल्याला फसवल्याचा घाव महिपतरावांच्या जिव्हारी लागतो. सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून सरकत जातो. पहिली बायको, या मुलींची आई आठवते. तिचं पत्र आठवतं. त्यातले ‘पोरी घरी कधी येणार म्हणून इचारून इचारून पोरी मला रडकुंडीला आणतात. तुम्हाला ठाऊक हाय, पोरी तुमच्याबिगर राहत नाहीत. त्याह्यले येकापरिस माय नसली तं चालती, पन बाप पाह्यजे आस्तो’, हे शब्द मायेच्या सर्व कंगोऱ्यांना पुसत जातात. छातीत तीव्र कळ अन् ते जगाचा-जगण्याचा, आपल्याच लेकीबाळीकडून फसवल्याच्या दाहक अनुभवातून झालेली तडफड - फडफडीसह शांत होतात.

या कादंबरीची भाषा संवादी असल्यामुळे संवाद थेट मनाला भिडणारे आणि दुःख जाणीवेच्या तीव्र संवेदना स्पर्श करणारे आहेत. कादंबरी आटोपशीर असल्यामुळे कथानक कुठलेही आडेवेढे न घेता हृदयाला स्पर्श करणारं आणि जगण्याच्या तीव्रतम असह्यतेला वाचा फोडणारं आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

मध्येच भावाला फसवणाऱ्या भावाविषयीही लेखक लिहितो. ही कादंबरी ‘स्त्री’ या नात्यातून फसल्या जाण्याच्या एकाच गोष्टीवर बोलत नाही, तर अनेक वेगवेगळ्या नात्यातून फसल्या जाण्याच्या जाणिवेनं तिचा पट विस्तृत होत जातो आणि मानवी पातळीवरून बदलत चाललेला नात्याच्या गुंतागुंतीचा पीळ उकलत जाण्यास सुसह्य ठरतो.

शेत, त्यातली पीकं, पिंकलर, रस्त्याच्या-रानाच्या आसपासची पाखरं या सगळ्या नोंदी घेत लेखक नात्यांच्या सर्व बाजूंवरही लिहितो. नात्यातलं सहवेदन संपून व्यवहारीपणाच्या बोहल्यावर चढलेल्या माणसांच्या भोगवादी जगण्याचं, त्यातून निर्माण झालेल्या आणि तुटत चालेल्या भावभावनांचं सावत्रपण ठसठसत्या खवंदासारखं होतं. ते मानवी मनाचं अंतरंग कुरतडत राहतं. त्यातून नात्यातल्या कोरडेपणाची जाणीव होते.

‘हक्कसोड’ - मिलिंद जाधव

लोकवाङ्मय गृह, मुंबई | पाने  - ९२ | मूल्य – १०० रुपये.

.................................................................................................................................................................

हनुमान व्हरगुळे | hanumanvhargule@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......