टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मुंबई मेट्रो ३, हार्दिक पटेल, चंद्रकांत पाटील, नवाज शरीफ आणि नोटबंदी
  • Sat , 25 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नोटाबंदी Demonetisation चंद्रकांत पाटील Chandrakant Pati नवाज शरीफ Nawaz Sharif हार्दिक पटेल Hardik Patel

१. मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो ३ प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यावर घातलेली बंदी उठवण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी पुढील दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. वृक्षतोड केल्याशिवाय मेट्रो ३ प्रकल्पाची उभारणी करणे शक्य नसल्याचे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आल्यावर ‘बेसुमार वृक्षतोड होत असल्यास आपल्याला दुसऱ्या ग्रहाचा शोध घ्यावा लागेल,’ अशा शब्दांमध्ये मुख्य न्यायाधीशांनी वृक्षतोडीवर भाष्य केले.

अहो न्यायाधीश महाराज, हळु बोला. झाडंझुडपं, वातावरण वगैरे असलेल्या एखाद्या ग्रहाने हे ऐकलं तर काय होईल, याचा विचार करा. पृथ्वीवरचा नादान मानव आपल्याकडे यायला निघालाय, हे त्याला कळलं तर बिचारा त्या धास्तीने त्याची जी कोणती सूर्यमाला असेल ती स्वखुशीने सोडून डोक्यात राख घालून घेऊन धूमकेतू बनून फिरायला तयार होईल.

………………………………………………

२. मुंबई महानगरपालिकेत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी आधी शिवसेनेने भाजपसोबत राज्यातील सत्तेत राहायचे की नाही, ते निश्चित करावं, अशी अट काँग्रेसने पुढे केली आहे. त्याचवेळी शिवसेनेने काँग्रेसबरोबर अभद्र युती करू नये, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उधोजीराजे, हे कायम लक्षात ठेवा की,

पप्पूची पप्पी… भद्र असते

तडीपार अध्यक्ष… भद्र असतो

पीडीपीची झप्पी… भद्र असते

राष्ट्रवादीच्या गुंडांना प्रवेश… भद्र असतो…

फक्त काँग्रेसशी युती तेवढी अभद्र!! शिव शिव शिव!!!

………………………………………………

३. पाकिस्तान आणि भारत यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण व्हायला हवेत. त्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कटकारस्थाने करणे टाळायला हवे. निवडणूक प्रचारात मी भारतविरोधी भूमिका घेतली नव्हती. : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ

शरीफमियाँ, तुम्ही इकडे हे बोलत असताना तिकडे कुणी तुमच्या खुर्चीखाली बॉम्ब लावत नाहीये ना, ते पाहा. कारगिल विसरलात का? तुमच्या देशाचं सगळं अस्तित्त्व भारतद्वेषावर उभारलेलं आहे. ते एका रात्रीत बदलणार आहे का? ठेविले लष्करे तैसेचि राहावे, या स्थितीतून तुमची लोकशाही आधी बाहेर काढा, मग शांततेची प्रवचनं झोडा.

………………………………………………

४. नोटाबंदीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नोटांचा वेगाने पुरवठा करावा आणि ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये गरज वाटल्यास जुन्या नोटा पुन्हा चलनात आणाव्यात, अशी महत्त्वाची सूचना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे. एखादे व्हॅक्यूम क्लीनर असावे, तशा पद्धतीने नोटाबंदीने बाजारातील रोकड खेचून घेतली असून नोटाबंदीमुळे भारताच्या विकासदरावरही गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशातील बँकांवरील बुडीत कर्जाचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. शिवाय नोटाबंदीमुळे ज्या उद्योगांचे नुकसान झाले आहे, त्यावरही सरकारने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे असे आयएमएफने नमूद केले आहे.

अरे या आयएमएफचा कोण पंटर आहे भारतात त्याला जरा अमितभाईंकडे पाठवा, ते खर्चापानी देतील त्याला कोपच्यात घेऊन. म्हणजे समजावून सांगतील की, हा सगळा कसा विरोधकांचा अपप्रचार आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनता कशी खूष आहे ते इथल्या निवडणुकांच्या निकालांवरून दिसतंच आहे. आता आम्हाला मत देणारी जनता हुशार की तुम्ही तज्ज्ञ लोक हुशार? आपल्या औकातीत राहा, जरा चांगले पॉझिटिव्ह सर्व्हे वगैरे करा.

………………………………………………

५. उत्तर प्रदेशमधून सुरू झालेली गुजरातच्या गाढवांची लाट आता फिरून गुजरातमध्ये पोहोचली आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने गुजरात विधानसभेतल्या ४४ पाटीदार आमदारांना गाढवाची उपमा देऊन नवा वाद निर्माण केला आहे. तो म्हणाला, भाजपच्या सांगण्यावरून मला साथ न देणाऱ्यांच्या डीएनएमध्येच काहीतरी कमतरता आहे. मला लोक नेहमी विचारतात की, एवढ्या मोठ्या आंदोलनामुळे तुम्हाला काय मिळाले. तर मी त्यांना सांगतो की, या आंदोलनामुळे मला ४४ पाटीदार गाढव आमदार मिळाले, जे १४ पाटीदार युवकांच्या मृत्यूनंतरही गूपचूप बसले.

ही एक वेगळीच गंमत आहे बरं का गुजराती नेत्यांची. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अमिताभ बच्चन यांना 'गुजरातच्या गाढवांची' जाहिरात न करण्याचा सल्ला दिल्यानंतर खरं तर गुजराती माणसांना गाढव म्हटल्याचा निषेध आणि प्रतिकार व्हायला हवा होता त्यांच्याकडून. पण, पंतप्रधानांनीही 'अखिलेश गुजरातच्या गाढवांनाही का घाबरतात,' अशा वक्तव्य केलं; आता हार्दिक तर आपल्याच समाजाच्या आमदारांना स्वत:च गाढव म्हणतोय. ये माजरा क्या है भाई? लगता है किसी गधे से पूछना पडेगा.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......