‘शि-वा-जी’ या तीन अक्षरांबद्दल प्रेम, आदर, आपलेपणा, खरं तर ‘भक्ती’ निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपति’ने केलं
संकीर्ण - श्रद्धांजली
सुश्रुत वैद्य
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या ‘राजा शिवछत्रपति’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 16 November 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली शिवशाहीर Shivshahir बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare शिवाजी महाराज Shivaji Maharaj राजा शिवछत्रपति Raja Shivchhatrapati

मी शाळेत असताना जे लेखक वाचत मोठा झालो, ज्यांची पुस्तकं वेड्यासारखी वाचली, परत-परत वाचली, ज्यांनी माझं लहानपण अक्षरश: घडवलं, त्या हाताच्या बोटांवर मोजण्यासारख्या चार-पाच लेखकांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. त्यांचं ‘राजा शिवछत्रपति’ मी इतक्या वेळा वाचलंय की, त्याला गणतीच नाही. माझ्याकडे आज असलेली त्याची प्रत, ही तिसरी प्रत आहे. त्याच्या पहिल्या दोन प्रती मी इतक्या वेळा वाचल्या आहेत, की वाचून-वाचून त्याचं पान अन् पान सुटं होऊन त्या खराब झाल्या. तिसर्‍या प्रतीचीही अवस्था काही फार वेगळी नाहीये.

इतिहास म्हणजे काय? इतिहासाचा अभ्यास कसा करायचा असतो? त्याच्यातलं खरं-खोटं काय? पुरावे कोणते? त्याच्या मागच्या राजकीय विचारधारा काय आहेत? इतर सिद्धान्त कुठले? हा सगळा विचार खूप-खूप नंतर आला. या सगळ्याच्या आधी ‘शि-वा-जी’ या तीन अक्षरांबद्दल प्रेम, आदर, आपलेपणा, खरं तर भक्ती निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपति’ने केलं. शिवाजी महाराजांना आमच्या आयुष्याचाच नाही तर, व्यक्तिमत्त्वाचा, अगदी रक्ताचा भाग बनवण्याचं काम या पुस्तकानं केलं. त्या काळात वाचलेल्या कुठल्याही खऱ्या किंवा काल्पनिक, ऐतिहासिक किंवा अद्भुत कथेच्या नायकानं मनावर इतकं गारूड केलं नव्हतं. त्या गारुडामागची सत्यता, दार्शनिकता, त्याचं मूल्य, तेव्हा कळलं नव्हतं, पण आता कळतंय.

शास्त्रकाट्याच्या कसोटीवर न उतरणारी नुसतीच भावनिकता फार स्पृहणीय नव्हे हे तर खरंच; पण आपल्या स्व‍त्वाचीच जाणीव नसलेला, आपल्याला, आपल्या समाजाला, आपली विशिष्ट ओळख देणार्‍या गोष्टींनाही ‘आपले’ न मानणारा, नुसताच भावनाविहीन शास्त्रकाटा होणंही चांगलं नाही. स्वतःची ओळख शाबूत ठेवून जगाला भिडावं, आणि मग बाकीच्यांना बरोबरीच्या नात्यानं वागवावं हे चांगलं. पण ही स्वतःची ओळखच जर शाबूत नसेल तर आपल्यात एक बेगडीपणा येतो. अशी सगळ्याची तार्किक चिरफाड करायची सुरी हाती घेऊन, स्वतःच्या अहंकाराच्या, स्वार्थाच्या अभिनिवेशी पवित्र्यात ‘तय्यार’ असलेले बेगडी ‘विचार-योद्धे’ बनणं चांगलं नव्हे. ते व्हायला नको असेल तर काही गोष्टी संस्कारक्षम वयातच घडाव्या लागतात. मनाच्या गवताच्या पेंडीचा आळा सुटण्याआधीच हे व्हावं लागतं. एकदा तो आळा सुटून गवताच्या काड्या वाऱ्यावर इकडेतिकडे पांगल्या की, कितीही धडपड केली तरी ती पेंडी पुन्हा पहिल्यासारखी एकसंध कधीच होत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खुद्द श्रीशिवछत्रपतींच्या आयुष्यात, त्यांच्या कार्यात ही स्वतःच्या सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक, भौगोलिक ओळखीबद्दलची स्पष्टता दिसतेच. त्यांची इतरांबद्दलची सहिष्णुता या स्पष्टतेच्या मजबूत पायावर उभी होती आणि म्हणूनच ती इतकी प्रामाणिक होती. ही स्व‍त्वाची जाणीव, त्या स्व‍त्वाचं रक्षण, पोषण, भरण करणारा श्रीशिवछत्रपतींचा पराक्रम, त्या सामर्थ्यातून आलेली त्यांची उदारमनस्कता हे आपलं सांस्कृतिक संचित आहे. आजच्या ‘आधुनिक’ आणि ‘आधुनिकोत्तर’ काळात, वैचारिक ध्रुवीकरणाच्या जमा‍न्यात तर या संचिताचं मोल पूर्वी कधी नव्हतं इतकं अधिक आहे.

संस्कृतीचं हे संचित एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला निरपेक्ष, सहज पद्धतीने निरागस वयातच जायला हवं. आपण ‘आधुनिक’ व्हायच्या आधीच्या काळात कदाचित ते तसं जातही असेल. पण या ‘आधुनिक’ काळातही ते कसं द्यावं, याचा वस्तुपाठ बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये होता. आणि ते पुस्तक असंच योगायोगानं ‘झालेलं’ नव्हतं. ते तसं होण्यामागे स्वतः बाबासाहेबांना असलेली या स्व‍त्वाची जाणीव व त्यामुळे निर्माण झालेली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली भक्तीची भावना - भक्तीच म्हणायला पाहिजे - वैचारिक आकर्षण, आदर, आश्चर्य, तुलना, मूल्य, अभ्यास, व्यासंग, ध्यास, चिकित्सा हे सगळं असूनही या सगळ्याच्या पलीकडे गेलेली भक्तीची भावना - होती, म्हणूनच ती त्यांच्या लेखनातून आमच्यापर्यंत पोहोचली. माझ्यासारख्या लाखो, कदाचित करोडो, मुला-मुलींपर्यंत पोहोचली. त्या मुला-मुलींनी, आजच्या पालकांनी, आपल्या मुलांना जर मराठी शिकवलं, तर ती इथून पुढेही पोहोचत राहील.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मोठमोठे लेखक आपल्याला नानाविध गोष्टींची ओळख करून देतात, आपले वैविध्यपूर्ण अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवतात. पण या परक्यांच्या ओळखीपेक्षा, बाहेरच्या अनुभवांपेक्षा फार अधिक मोलाची गोष्ट बाबासाहेबांनी केली. आम्हाला आमची स्वत:चीच ओळख करून दिली. स्वत्व म्हणजे काय याची अनुभूती दिली. छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना मुजरा करणारा हेन्री ऑक्झेंडन आणि त्या चित्राला बाबासाहेबांनी दिलेलं ‘वाकल्या गर्विष्ठ माना, यश तुझे हे आसमानी’ हे शीर्षक पुढच्या काळात, गोऱ्यांच्या देशात असताना त्यांच्या नजरेला नजर भिडवणाऱ्या स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा स्रोत होतं. अजून आहे.

बाबासाहेबांनी आम्हाला समृद्ध करणारे इतके दरवाजे उघडून दिले की, त्याची आम्हाला तर तेव्हा कल्पना नव्हतीच, पण कदाचित त्यांना स्वत:लाही नसेल. पण त्याहीपेक्षा आधुनिकतेच्या रेट्याखाली तुटत चाललेली आमची नाळ त्यांनी आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडून ठेवली. या उपकारांचे उतराई कोणत्या शब्दात व्हायचे? ते शक्य तरी आहे का? ही कृतज्ञतेची भावना अशीच आयुष्यभर कायम राहो, इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना.

..................................................................................................................................................................

लेखक सुश्रुत वैद्य संगणक-तज्ज्ञ असून त्या क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत. ‘नव्या तंत्रज्ञानांचा व्यावसायिक व सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कसा उपयोग करता येईल’ या विषयाचे अभ्यासक आहेत. तसेच ते प्राचीन भारतीय संस्कृती व संगीताचेही अभ्यासक आहेत. 

sushrut.vaidya@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......