गंगारामभाऊ म्हस्के या एका दुर्लक्षित महानायकाचे वाचनीय चरित्र
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नामदेव आवताडे
  • ‘महानायक गंगारामभाऊ म्हस्के’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 28 May 2021
  • ग्रंथनामा शिफारस गंगारामभाऊ म्हस्के Gangarambhau Mhaske महात्मा फुले Mahatma Phoole सत्यशोधक समाज Satyashodhak Samaj

काही व्यक्तींनी समाजजीवनात आणि सामाजिक सुधारणात भरीव योगदान देऊनसुद्धा त्यांच्याविषयी जनमानसात अत्यल्प माहिती असते. असे अनेक नायक इतिहासाच्या पानांआडच राहिले आहेत. त्यांच्या वैचारिक आणि कौटुंबिक वारसदारांचेही अशा नायकांच्या कार्यकर्तृत्वाकडे दुर्लक्ष झाले. त्यांच्या कार्याचा परिचय देणारी चरित्रेही लिहिली गेली नाहीत. त्यामुळेच त्यांना प्रसिद्धीविन्मुख राहावे लागले. अशाच महनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या यादीत पुण्यातील गंगारामभाऊ म्हस्के यांचा समावेश होतो.

नाशिक जिल्ह्यातील रंगराव ओढे या खेडेगावातून म्हस्के कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी १८३३-३४मध्ये पुण्याला स्थलांतर केले. याच कुटुंबातील गंगारामभाऊंनी उच्चशिक्षण घेतले. त्याचबरोबर ज्या समाजात आपण वाढलो\घडलो, त्या समाजाचे काहीएक देणे लागतो, या भावनेतून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी ही सर्व कामे नोकरी करत केली. प्रारंभीच्या काळात महात्मा जोतीबा फुले यांच्या कार्यात सामील होऊन लोकांच्या मनातील अज्ञानरूपी अंधःकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढे ‘सत्यशोधक समाजा’ला मदत केली. शिक्षणसंस्थांची स्थापना केली. वाचनालय, सार्वजनिक बाग, ड्रेनेज सिस्टीम, दुष्काळग्रस्त लोकांना मदत, टाऊन हॉल, धर्मशाळा, अशी अनेक लोकोपयोगी कामे केली. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक शिवजयंतीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. एवढी कामे करून गंगारामभाऊ थांबले नाहीत. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन वकिलीचा अभ्यास केला. अनेक राष्ट्रीय नेत्यांचे खटले चालवले. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

गंगारामभाऊंना समाजोन्नतीसाठी शिक्षण महत्त्वपूर्ण वाटत होते. त्यासाठी त्यांनी काही विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या शिष्यवृत्ती देणे सुरू केले; परंतु या मदतीच्या मर्यादा त्यांच्या लगेच लक्षात आल्या. ही मदत मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू करणे गरजेचे वाटल्याने त्यांनी १८८३ मध्ये ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ या संस्थेची स्थापन केली. पुढे न्यायमूर्ती रानडे आणि इतर मित्रांच्या मदतीने या संस्थेला बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांचा राजाश्रय मिळवला. संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेकांना शिष्यवृत्ती दिली. त्यातून शिक्षण घेतलेल्या तत्कालीन पदवीधरांनी आपापल्या भागात शिक्षण संस्था सुरू केल्या. त्यामध्ये महर्षी वि.रा. शिंदे, कोल्हापूर संस्थानातील भास्करराव जाधव, दाजीराव विचारे यांचा समावेश होता. ही नामावली बरीच मोठी आणि सर्वक्षेत्रीय आहे. गंगारामभाऊंमुळे अनेकांना शिक्षण घेता आले.

महात्मा जोतीबा फुले, महाराजा सयाजीराव, राजर्षी शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले या समाजधुरिणांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. वरील सर्व मंडळी अडचणीच्या वेळी त्यांचा सल्ला घेत.

त्यामुळे डॉ. राजेंद्र मगर यांनी एवढा मोठा वैचारिक आणि सामाजिक पैस असणाऱ्या गंगारामभाऊ म्हस्के यांचे चरित्र लिहून मोठेच काम केले आहे. अर्थात हे काम सोपे नव्हते. कारण चरित्र नायकाचा मृत्यू होऊन जवळपास १२० वर्षे होऊन गेली आहेत. त्यामुळे चरित्रासाठी आवश्यक असणारी अत्यावश्यक साधनसामग्री मिळणे दुरापास्त होते; परंतु चरित्रकारांनी दुर्मीळ साधनसामग्रीचा शोध घेत अत्यंत चिकाटीने हे चरित्र साकारले आहे. गंगारामभाऊंनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे अहवाल, इतिहास आणि त्या संस्थेची आजची परिस्थिती याविषयी माहिती जमा करून त्यासंबंधीचे निवेदन केले आहे. यातून गंगारामभाऊंचे अफलातून व्यक्तिमत्त्व उभे राहते.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गंगारामभाऊंनी सत्यशोधक समाजाला केलेली मदत, महात्मा जोतीबा फुले यांच्याशी त्यांचा असलेला स्नेह, राष्ट्रीय सभा स्थापनेतील सहभाग, राष्ट्रीय सामाजिक परिषद, पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये दिलेली साक्ष, प्लेगच्या साथीत लोकांना केलेले सहाय्य, द नॅशनल इंडियन असोसिएशनमधील सहभाग, आर्थर कॉफर्ड कमिशनमधील सहभाग, अशा अनेक राष्ट्रीय स्तरांवरील कार्यात त्यांचा असणारा सहभाग हा या चरित्राचा गाभा आहे.

त्या तुलनेत या चरित्रात गंगारामभाऊंच्या कौटुंबिक जीवनाविषयी कमी माहिती आली; तरीसुद्धा त्यांच्या सर्वव्यापक क्षेत्रातील व्यापक परिचयामुळे लेखक प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे ‘कार्यात्मक चरित्र’ खरोखरच सत्यनिष्ठ आणि तटस्थ झाले आहे. चरित्र नायकाच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंतचा सामान्य ते असामान्य असा जीवनप्रवास चरित्रकारांनी उलगडला आहे. यामध्ये सर्वाधिक भाग डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचा असला तरी या संस्थेच्या माध्यमातून गंगारामभाऊंनी सर्वाधिक काम केले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गंगारामभाऊ म्हस्केंचा महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने परिचय करून देण्याचे श्रेय बाबा भांड यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीतील संशोधक डॉ. राजेंद्र मगर यांनी केले आहे. या चरित्रात सतरा प्रकरणे, सात परिशिष्टे आणि एकोणवीस छायाचित्रे आहेत. आवर्जून वाचावे असे हे चरित्र आहे.

‘महानायक गंगारामभाऊ म्हस्के’ : डॉ. राजेंद्र मगर

महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद

पाने - २३२, मूल्य – २५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......