पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार : संपूर्ण आयुष्य संस्कृतच्या प्रसारासाठी वाहून घेतलेले विद्वान, व्यासंगी पंडित
संकीर्ण - श्रद्धांजली
वसंत काळपांडे
  • पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार
  • Sat , 01 May 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार Pandit Ghulam Dastagir Birajdar संस्कृत Sanskrit

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे २२ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यासारख्या संपूर्ण आयुष्य संस्कृतच्या प्रसारासाठी वाहून घेतलेल्या विद्वान, व्यासंगी पंडितांचे हे जग सोडून जाणे विशेषच दुःखदायक आहे.

त्यांची माझी पहिली भेट १९८१मध्ये कोल्हापूरला झाली होती. पोस्टल इंडेक्स नंबरचे जनक दिवंगत श्री. भि. वेलणकर यांनी संस्कृतमध्ये अनुवादित केलेल्या ‘संगीत सौभद्र’ या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने ते आणि श्री. धुं. कवीश्वर तिथे आले होते. नाटक पाहायला केवळ २० प्रेक्षक होते. मराठीतील संगीत नाटकांच्या लोकप्रियतेलाही उतरती कळा लागली असतानाच्या त्या काळात संस्कृतमधली संगीत नाटके प्रदर्शित करण्याचा या तिघांचा उत्साह कौतुकास्पद होता. १९८६पासून माझा त्यांच्याशी संबंध आला. गुलाम दस्तगीर बिराजदार आणि श्री. धुं. कवीश्वर या उत्साही जोडीने स्वतःला आयुष्यभर  संस्कृतप्रसाराच्या कार्यासाठी वाहून घेतले होते.

१९८६मध्ये महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांना १०० गुणांचा हिंदीचा पेपर अनिवार्य केला होता. त्यामुळे मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्कृत, पाली, अर्धमागधी अशा अभिजात भाषा शिकण्याची सोय राहिली नव्हती. बिराजदार आणि कवीश्वर या दोघांनी शासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘अभ्यासक्रम, विषय योजना, भाषा योजना, परीक्षा पद्धती आणि एकूणच मंडळाच्या नियमावलीत बदल करणे किंवा नवीन नियमांचा अंतर्भाव करणे, याबाबत राज्य मंडळाला निर्देश देण्याचे अधिकार शासनाला आहेत आणि ते शासनाने वापरले’, अशी शासनाने बाजू मांडली होती. परंतु उच्च न्यायालयाने शासनाची बाजू अमान्य केली. शासनाला हे अधिकार असले तरी मंडळाचा सल्ला घेतल्यानंतरच शासनाला हे अधिकार वापरता येतात. मंडळाचा सल्ला शासनाला बंधनकारक नसला, तो योग्य त्या कारणांसह नाकारता येत असला, तरी सल्लाच न घेणे बेकायदेशीर होते. आणीबाणीच्या परिस्थितीत मंडळाचा सल्ला घेतला नाही तरी चालते, परंतु या निर्णयाच्या बाबतीत अशी कोणतीही परिस्थिती नव्हती. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी महाराष्ट्र शासनाचा निर्णय रद्दबातल ठरवला. आज मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आठवीपासून संस्कृत, पाली, अर्धमागधी शिकता येते. याबद्दल गुलाम दस्तगीर बिराजदार आणि श्री. धुं. कवीश्वर यांचे ऋण विसरता येणार नाहीत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पंडित बिराजदारांनी महाराष्ट्र शासनाचे मानद संस्कृत संघटक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पंडित बिराजदारांनी शेवटच्या क्षणापर्यंत संस्कृतच्या प्रसारासाठी केलेले कार्य अजोड, कधीही विसरता येणार नाही, असेच आहे. १९८०च्या दशकात त्यांनी काढलेल्या ‘पप्पू गच्छति शिशुशाला’, ‘मोटारयान’ अशा बालगीतांची ध्वनिफीत मला अजूनही आठवते.

गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्याशी माझे काही महिन्यांपूर्वी फोनवर बोलणे झाले होते. त्या वेळी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. या वयातही त्यांच्या मनात संस्कृतच्या प्रचारासाठी अनेक कल्पना होत्या. त्यांनी कुराणचे संस्कृतमध्ये भाषांतर केले होते. त्याचे प्रकाशन व्हायचे होते. अभ्यासक्रमात इयत्ता सहावीपासून संस्कृतचा एक ऐच्छिक विषय म्हणून समावेश व्हावा, हे त्यांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न अपूर्णच राहिले होते. संस्कृतचे मोठ्या प्रमाणावर मोफत ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्याचा त्यांचा विचार होता. ही स्वप्ने त्यांच्या काळात पूर्ण होऊ शकली नाहीत. पण मोठी स्वप्ने जगणाऱ्या, सतत क्रियाशील राहणाऱ्या व्यक्तींची काही स्वप्ने अपुरी राहणे, हेच त्यांच्या कार्याची थोरवी दर्शवणारे महत्त्वाचे लक्षण असते. ही अपुरी स्वप्नेच त्यांचे कार्य पुढे नेणाऱ्यांना दिशा दाखवतात.

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Sun , 02 May 2021

I heard of Pandit Birajdar almost 50 years ago in an editorial in Loksatta under the title मुसलीमान्ची संस्कृत मुहब्बत. In the editorial I read about Panditji's Sanskrit scholarship. At the bottom of the editorial there was this verse which was in invitation to his daughter or son's wedding. गमनागमनेचापि त्रासो भवति यद्यपि । सम्मानो वर्धतेस्माकमवश्यमुपस्थातव्यम ।। I still remember this verse for its simplicity and humility. I am very sorry to hear about his death.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......