‘भावे आणि सुकथनकरांचा सिनेमा’ हे मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणारं पुस्तक लवकरात लवकर पूर्ण करणं, हीच सुमित्रामावशीला खरी आदरांजली… 
संकीर्ण - श्रद्धांजली
अक्षय शेलार
  • सुमित्रा भावे (१२ जानेवारी १९४३- १९ एप्रिल २०२१). छायाचित्र सौजन्य - श्रीराम पत्की
  • Tue , 27 April 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली सुमित्रा भावे Sumitra Bhave सुनील सुकथनकर Sunil Sukthankar

या महिन्यात १५ ते १७ एप्रिल दरम्यान मी काहीसा अस्वस्थ होतो. कारण, सुमित्रामावशी(भावे)ची तब्येत पुन्हा एकदा खालावली होती. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये त्यांची तब्येत खालावण्याची ही दुसरी-तिसरी वेळ असावी. अंतर्ज्ञान म्हणा किंवा काहीही म्हणा, पण या वेळी मी ही बातमी कळण्याच्या काही दिवस आधीपासूनच अस्वस्थ होतो. शेवटी १९ तारखेला काही जवळच्या लोकांच्या फोन कॉल्स आणि मेसेजेसने दिवसाची सुरुवात झाली. सर्वांना जोडणारा समान दुवा एकच होता, तो म्हणजे सुमित्रा भावे यांचे निधन… 

मी सुमित्रामावशीच्या कामाशी बऱ्याच आधीपासून परिचित असलो तरी त्या आणि सुनील सुकथनकर यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला, तो काही काळापूर्वी. गेला काही काळ मी ‘भावे आणि सुकथनकरांचा सिनेमा’ या विषयावरील एका संशोधनपर पुस्तकाच्या लेखन आणि निर्मितीच्या प्रक्रियेत गुंतलो आहे. त्यामुळे त्यांचे सहजासहजी उपलब्ध नसलेले सिनेमे त्यांच्याकडून मिळवणे, सर्व चित्रपटांचा आणि त्यामागील निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास करून त्यावर लिहिणं, सुमित्रामावशी आणि सुकथनकर यांच्या मुलाखतीची तयारी करणं, अशी अनेक कामं गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू होती. अनेक गोष्टींमध्ये सुकथनकर स्वतः मदत करत होते. आणखी काही मदत लागली तर अवश्य कळव, असंही आवर्जून सांगत होते. पण आजारी असूनही आपल्या संपूर्ण कामावर अशा प्रकारचं पुस्तक निर्माण होत आहे, हे ऐकून सुमित्रामावशीही खूप आनंदी होत असल्याचं मला वेळोवेळी कळवलं जात होतं. 

सुमित्रामावशीच्या कामाविषयी मराठी प्रेक्षक आणि भारतीय प्रेक्षक तितकासा जागरूक नाही, हे मला वेळोवेळी वाटत राहिलं आहे. ‘विविध संस्थांकडून निधी मिळवून फक्त पुरस्कारांसाठी चित्रपट बनवणारे लोक’ असं म्हणून त्यांची केली जाणारी हेटाळणीसुद्धा मी अनेकदा पाहिली आहे. त्यामुळेच मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांच्यावर एक विस्तृत पुस्तक लिहिलं जावं, असं मला बऱ्याच काळापासून वाटत होतं. शेवटी या प्रकल्पाला सुरुवात झाल्यानं मला स्वतःला जितका आनंद होत होता, तितकाच आनंद आणि समाधान सुमित्रामावशी आणि सुकथनकर या दोघांनाही वाटल्यानं काम करण्यास अधिक हुरूप यायचा. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पुस्तकातील काही भाग लिहून झाल्यावर मी तो सुमित्रामावशी आणि सुकथनकर यांना पाठवला. अशातच एके दिवशी सुकथनकर यांच्याशी बोलणं झाल्यावर त्यांनी सुमित्रामावशींनी माझ्या पुस्तकासाठी म्हणून एक मनोगत लिहून दिल्याचं कळवलं. मी ते पुनःपुन्हा वाचलं. त्यातून सुमित्रामावशीची स्वतःच्या कामाचा जागरूकपणे विचार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. स्वतःला कुठल्या प्रकारचं काम उत्तमरीत्या करता येतं नि कुठल्या कामाकरता इतर लोकांची मदत घ्यायची, हे त्यांना उत्तम प्रकारे समजत होतं. यात ना कमीपणाचा विचार होता, ना अहंकाराचा लवलेश. सिनेमाप्रतीचं प्रेम मात्र जरूर दिसतं… स्वतःच्या सहकाऱ्यांच्या कामाची त्यांना असलेली कदरदेखील त्यात दिसते.

सुमित्रामावशी आणि सुनील सुकथनकर यांचं दिग्दर्शकीय साहचर्य तब्बल १५ चित्रपट, काही मालिका आणि असंख्य लघुपट निर्माण होईतो टिकून राहण्यामागील कारण इथंच तर आहे! त्यामुळे स्वतःच्या कामाकडे इतक्या सजगपणे पाहू शकणारी व्यक्ती जेव्हा माझ्यासारख्या एखाद्या तरुणाच्या प्रकल्पाबाबत उत्सुकता दाखवते, तेव्हा त्यात मी खुश व्हावं, असं बरंच काही असतं. 

भारतात गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करणं, महत्त्वाच्या कलाकृतींचं जतन करणं, याबाबत अनेकदा अनास्था दिसून येते. अशीच अनास्था महत्त्वाच्या कलाकारांच्या कामाच्या दस्तऐवजीकरण करण्याबाबतही दिसते. सुमित्रामावशी आणि सुनील सुकथनकर यांच्यासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकद्वयीच्या कामाबाबत एकही मोनोग्राफ किंवा पुस्तक लिहिलं गेलेलं नसणं, याच गोष्टीचं द्योतक आहे. डॉ. आनंद नाडकर्णी लिखित ‘देवराईच्या सावलीत’ हे भावे-सुकथनकरांच्या ‘देवराई’ सिनेमाविषयीचं पुस्तक किंवा एन. मनु चक्रवर्ती या बंगाली चित्रपट समीक्षकानं ‘मुव्हिंग इमेजेस, मल्टिपल रिॲलिटीज’ या पुस्तकासाठी दोघांची घेतलेली दीर्घ मुलाखत, असे काही अपवाद वगळता फारसं काही उपलब्ध नाही. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सध्या मी लिहीत असलेल्या ‘भावे आणि सुकथनकरांचा सिनेमा’ या पुस्तकाच्या माध्यमातून या द्वयीच्या कामाच्या दीर्घ समीक्षेसोबतच त्यांच्या कामाचं दस्तऐवजीकरण होईल, अशीही अपेक्षा आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणारं हे पुस्तक लवकरात लवकर पूर्ण करणं, हीच सुमित्रामावशीला दिलेली खरी आदरांजली ठरेल… 

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......