सर्व जात-धर्म-पंथांच्या लोकांना सोबत घेऊन राज्य कशा प्रकारे यशस्वीपणे चालवले जाते, याचं उत्तम उदाहरण म्हणजेच महाराजा सयाजीराव गायकवाड
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
निलोफर मुजावर
  • ‘महाराजा सयाजीराव यांच्या सुधारणा : धर्म आणि सामाजिक- भाग ७’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 02 April 2021
  • ग्रंथनामा शिफारस महाराजा सयाजीराव यांच्या सुधारणा : धर्म आणि सामाजिक महाराजा सयाजीराव

नुकतंच दिनेश पाटील यांनी लिहिलेलं ‘महाराजा सयाजीराव यांच्या सुधारणा : धर्म आणि सामाजिक- भाग ७’ वाचून पूर्ण केलं. आधीच इतिहास विषय कठीण आणि क्लिष्ट. त्यात पुन्हा धर्म आणि सामाजिक सुधारणा यांसारखा नाजूक विषय. पण तो लेखकानं अतिशय कुशलतेनं हाताळला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात महाराजा सयाजीराव गायकवाड या सुविद्य राजाचं धर्म आणि जात सुधारणेचं कार्य अलक्षित राहणं, ही अत्यंत खेदाची बाब आहे. पण बाबा भांड यांचे अथक प्रयत्न आणि महाराष्ट्र शासनाचं बहुमूल्य साहाय्य यातून सयाजीरावांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळत आहे.

या पुस्तकाला बाबा भांड यांची प्रस्तावना लाभली आहे. ती महाराजांचा परिचय ‘चालता-बोलता इतिहास’ या मथळ्याखाली वाचकांना करून देते. या पुस्तकात एकूण पाच प्रकरणं आहेत. अस्पृश्यांसाठीचं कार्य, सर्वधर्मियांसाठी केलेले कायदे, वेदोक्त, धर्म-साक्षरतेतून समाजपरिवर्तन, धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, महाराष्ट्रातील तत्कालीन समाजसुधारकांसह महाराजांचं सामाजिक सुधारणेचं अनुरूप कार्य, या आणि अशा वैशिष्ट्यपूर्ण घटकांचा समावेश या पुस्तकात आहे. लेखकाने वापरलेला धर्म आणि जात-‘साक्षरता’ हा शब्द या प्रकरणांचं सार सांगून जातो. ‘सुधारणा’ऐवजी ‘साक्षरता’ हा शब्द मनावर खोलवर परिणाम करतो. लेखकाला सापडलेलं लेखनाचं आणि सयाजीरावांच्या सुधारणांचं गमक या शब्दांत दिसून येतं.

या पुस्तकात लेखकानं महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात सर्व महापुरुषांमधील समन्वयाचा दुवा असलेल्या सयाजीरावांना केंद्रस्थानी ठेवून इतर समाजसुधारकांना त्यांच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न सयाजीरावांच्या तुलनात्मक धर्म-अभ्यास या संकल्पनेचा एक भाग होय. लेखकाने केलेल्या तत्कालीन महापुरुषांच्या तुलनात्मक अभ्यासाचं फलित म्हणजे या पुस्तकातून पुढे येणारा नवा इतिहास होय. तसंच धर्माच्या तुलनात्मक अभ्यासाचा हा स्तुत्य पायंडा आहे. महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकरांसोबत महाराजांचं नाव जोडलं जावं, असं वाटतं.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566

..................................................................................................................................................................

या पुस्तकातील सर्वांत वैशिष्टपूर्ण गोष्ट म्हणजे लेखकाची भूमिका सर्वसमावेशक आणि अनाग्रही आहे. केवळ अगणित पुराव्यांचा आणि संदर्भांचा ढीग वाचकांसमोर ठेवून त्यांना चकित करावं, असा त्यांचा उद्देश नसून मोजक्या शब्दांतून आणि प्रसंगांतून वाचकांना सुखद धक्के देत जुन्या गृहीतकांना फाटा देण्याचा, तसंच धर्म आणि नवा इतिहास सांगण्याचा लेखकाचा प्रयत्न यशस्वी ठरलेला दिसतो.

या पुस्तकातून लेखकाच्या संशोधनाची आणि व्यासंगाची कल्पना येते. महात्मा फुल्यांपासून कॉम्रेड शरद् पाटील यांच्यापर्यंत तत्कालीन महापुरुषांचा इतिहास जोडून सांगण्याचं काम लेखकानं कुशलतेनं केलं आहे. ही तर्कसंगती या पुस्तकाला खऱ्या अर्थानं सुंदरता प्राप्त करून देते. लेखकानं महाराजांची ‘भूमिपुत्र’ म्हणून दखल न घेता; महाराज आणि तत्कालीन महापुरुषांचा एकांगी अभ्यास न करता सयाजीरावांच्या अनुषंगाने महाराष्ट्राची समाजसुधारणेची परंपरा आणि महापुरुषांचं प्रेरणास्थान उजागर करण्याचा प्रयत्न केला आहे.

अलौकिक शब्दसौंदर्य, सहज आणि सुंदर शब्दरचना या पुस्तकाची वाचनीयता वाढवतात. लेखकाच्या लेखणीत कमालीची सहजता जाणवते. ऐतिहासिक लिखाण म्हणजे भारदस्त शब्द ही संकल्पना दूर सारून सामान्य वाचकाच्या मनात घर करेल, अशी भाषा वापरल्यानं पुस्तक वाचनीय झालं आहे.

महाराजांच्या लक्ष्मी पॅलेसवरील कोरलेली सर्वधर्मीय चिन्हं या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पहावयास मिळतात; तर आतमध्ये सयाजीरावांनी ज्यूबिली बागेत बसवलेल्या बुद्धांच्या पुतळ्याचं आणि महाराजांचे प्राण वाचवणार्‍या अर्जुन व हरी कोळी या आदिवासी बंधुंच्या पुतळ्याचं छायाचित्र आहे. तसंच महात्मा फुले यांच्या बैठकीच्या खोलीत लावलेलं सयाजीरावांचं छायाचित्रही आहे. यातून महाराजांचं महात्मा फुल्यांच्या आयुष्यातील स्थान अधोरेखित होतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आज एकविसाव्या शतकात भारतासारख्या बहुधर्मीय आणि बहुभाषिक देशामध्ये सतत घोंगावणार्‍या जातीयतेच्या वादळाला शांत करण्याचं काम हे पुस्तक करेल. सर्व जात-धर्म-पंथांच्या लोकांना सोबत घेऊन राज्य कशा प्रकारे यशस्वीपणे चालवलं जातं, याचं उत्तम उदाहरण म्हणजेच महाराजा सयाजीराव गायकवाड होय. अशी सुविद्य व्यक्ती जेव्हा आपल्या पुत्रासमान प्रजेला सोडून गेली, तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उद्गार काढले होते- “अस्पृश्यांचा कैवारी गेला आणि सामाजिक सुधारणांचा पुढारी नाहीसा झाला.”

‘फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र’ असं म्हणताना आपण या महापुरुषांना वेगवेगळ्या जाती-धर्माच्या गटात बंदिस्त करतो आणि एकात्मतेच्या विचाराला बाधा पोहोचवतो. पण या पुस्तकातील लेखकाचा तुलनात्मक धर्म आणि महापुरुषांचा अभ्यास ही बाधा संपवण्याचं काम करेल. महाराजांच्या कार्यातून वर्तमानकालीन राजसत्तेला हे पुस्तक एक आदर्श वस्तुपाठ घालून देईल. त्याचबरोबर या राजसत्तेचे रागरंग बदलण्याची ताकदही या पुस्तकामध्ये आहे. सयाजीरावांच्या धर्म-साक्षरतेच्या कार्याची अवहेलना करणाऱ्या तथाकथित इतिहासकारांना हे तुलनात्मक अभ्यासाचं सत्य स्वीकारावंच लागेल. त्यातून महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासाचा अभ्युदय होईल. महापुरुषांच्या स्तुतीपाठकांना नवा दंडक घालून देण्याचं काम या पुस्तकातून घडेल. तसंच जुन्या गृहीतकांवरील कोळीष्टकं हटवली जातील आणि तथाकथित इतिहासाला नवी कलाटणी मिळेल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......