टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • संदर्भ - सेना-भाजप काडीमोड (चित्र - सतीश सोनवणे)
  • Sat , 28 January 2017
  • विनोदनामा टपल्या संजय लीला भन्साळी Sanjay Leela Bhansali नारायण राणे Narayan Rane शरद पवार Sharad Pawar उद्धव ठाकरे Uddhav Thackeray व्ही. षणमुगनाथन V. Shanmuganathan

१. जर्मनीत जाऊन हिटलर विरोधात चित्रपट बनवण्याची हिंमत संजय लीला भन्साळी करू शकतात का, असा सवाल राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांनी केला आहे. या सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पद्मावती चित्रपटाच्या सेटवर जाऊन मोडतोड केली आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही मारहाण केली. जे इतिहासात घडलेच नाही, ते चित्रपटात दाखवले जाऊ नये. आमच्या राजपूत भूमीवर येऊन आमच्या देखतच इतिहासाची मोडतोड केली जात आहे, असेही ते म्हणाले.

कालवी यांना इतिहासरत्न पुरस्कार देता येईल का? राणी पद्मिनीची व्यक्तिरेखा संपूर्णपणे काल्पनिक आहे, राजपूत इतिहासात तिचा काही उल्लेखही नाही, त्या व्यक्तिरेखेचा इतिहास ते सांगतायत. त्यांना दिव्यदृष्टी पुरस्कारही द्यायला हवा. ज्या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालेलं नाही, त्यात काय दाखवलंय, ते त्यांच्या या दिव्यदृष्टीला दिसतंय. भन्साळींना जर्मनीला पाठवण्याऐवजी त्यांनी खुद्द जर्मनीत जाऊन असले माकडचाळे करून पाहायला काय हरकत आहे. आठवून आठवून यांना हिटलर हाच 'महापुरुष' आठवला, हेच पुरेसं बोलकं आहे.

......................................

२. गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये वाहत असलेले नाराजीचे वारे कायम असून त्यात आता यात पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भर पडली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि प्रचारापासून अलिप्त राहण्याचे अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस गुरुसाद कामत यांनी जाहीर केले होते. त्यापाठोपाठ आता नारायण राणेदेखील मुंबईतील प्रचारात सहभागी होणार नाहीत, असं सांगितलं जातं.

अरेरे, त्यामुळे आता कोकणातल्या पंजाच्या झंझावाताप्रमाणे मुंबईतही काँग्रेसचे वादळ उठवून महानगरपालिकेत एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न भंगलेच म्हणायचे. काँग्रेसच्या प्रचारात दादा नाहीत म्हटल्यावर स्वबळावर बहुमत मिळवण्याची शक्यताच संपली काँग्रेसची. अरेरे!  

......................................

३. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी युती न करण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाने राज्य सरकार अस्थिर बनले आहे. या स्थितीत शिवसेना सत्तेत राहणार नाही, ती सत्तेत राहिली तर सत्तेसाठी शिवसेना काहीही करते असा संदेश जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत.

पवार नेहमी जे बोलतात त्यात शब्दार्थापेक्षा भावार्थ महत्त्वाचा असतो. तो अगदी साधा आहे. शिवसेना सत्तेसाठी वाट्टेल त्या तडजोडी करण्यासाठीच प्रसिद्ध आहे. ते सत्ता सोडणार नाहीत. राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाहीत. निवडणुकीनंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग खुला ठेवतील. मध्यावधी निवडणुकांची शक्यताच नाही, हे पवार सांगतायत.

......................................

४. तामिळनाडूत जलिकट्टूसाठी सर्व जण एकत्र आले आणि केंद्र सरकारला नमवले, अशी एकजूट आपल्याला हवी आहे. जलिकट्टूप्रमाणेच भाजपचा बैल उधळतोय. या बैलाला रोखा आणि रस्त्यावर उतरून लढा, असे आवाहन शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले. 

एकाच गोठ्यात ढवळ्याशेजारी उभा राहून मनसोक्त चारा चरणारा पवळ्या म्हणतोय ढवळ्याला आवरा! खिशात राजीनामे घेऊन फिरतात म्हणे!! अहो हे कमालीचे हास्यस्फोटक विनोद आवरा!!!

......................................

५. मेघालयाच्या राजभवनातील सुमारे १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी थेट राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे आरोप करणारं पत्र थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्यानंतर राज्यपाल व्ही. षणमुगनाथन यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या षणमुगनाथन यांनी राजभवनाचा यंग लेडिज क्लब बनवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. राज्यपालांच्या आदेशाने मुली थेट राजभवनात येतात. अनेक मुलींची पोहोच राज्यपालांच्या बेडरूमपर्यंत आहे. रात्रपाळीला दोन जनसंपर्क अधिकारी, एक आचारी आणि एक नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व महिला कर्मचारी आहेत.

त्यांच्यावर आयुष्य कोणत्या ना कोणत्या कार्याला वाहून टाकण्याचे संस्कार आहेत. आता ६८ वर्षांचं वय झाल्यामुळे वानप्रस्थाश्रमात त्यांनी उर्वरित आयुष्य महिला सबलीकरणासाठी वाहून टाकायचं ठरवलं असणार आणि मग वाहणे आणि वाहवणे यातला फरक नष्ट झाला असणार.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......